शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

काँग्रेस इतका छोटा पक्ष कधीच बनला नव्हता! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:12 IST

त्रिपुरातील भाजपचा नेत्रदीपक विजय म्हणजे आमच्या सरकारविरुद्ध पसरविण्यात आलेल्या ‘भीती, खोटेपणा व संभ्रम’ याला लोकांनी दिलेले चोख उत्तर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेस पक्ष आजच्याइतका छोटा कधीच नव्हता, असेही ते म्हणाले.

नवी दिल्ली : त्रिपुरातील भाजपचा नेत्रदीपक विजय म्हणजे आमच्या सरकारविरुद्ध पसरविण्यात आलेल्या ‘भीती, खोटेपणा व संभ्रम’ याला लोकांनी दिलेले चोख उत्तर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेस पक्ष आजच्याइतका छोटा कधीच नव्हता, असेही ते म्हणाले.ईशान्येकडील जनतेत तुटलेपणाची भावना होती. ती दूर करण्यासाठी आपल्या सरकारने ओव्हरटाइम केला आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, येथील एका राज्यातील प्रश्न सोडविण्याससाठी आधीच्या सरकारांमधील मंत्र्यांनी संपूर्ण कालखंडात जेवढा वेळ त्या राज्यांत घालविल्या त्यापेक्षा अधिक काळ आमच्या मंत्र्यांनी चार वर्षांत तेथे घालविला.मोदींचे भाषण सुरू असताना जवळच्या मशिदीतून अजान सुरू झाली. त्यावेळी मोदी यांनी भाषण थांबविले. अजान संपल्यानंतरच त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.राहुल गांधी यांच्यावर हल्ला करताना ते म्हणाले की, काही लोक जन्मजात पदे घेऊनच वाढले. तथापि, त्यांची उंची छोटी होत गेली. याउलट अमित शाह पक्षाला अनेक राज्यांत विजयी करीत मोठे झाले. पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना मी सांगितले की, तुम्ही भाग्यवान आहात. कारण जूनपर्यंत कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकारही जाणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा एकमेव नमुना म्हणून तुम्हीच शिल्लक राहाल. पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग ‘स्वतंत्र फौजी’ आहेत. ते काँग्रेसला मोजत नाहीत व काँग्रेसही त्यांना मोजत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी