शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री भाजपाच्या संपर्कात

By admin | Updated: May 20, 2014 03:21 IST

लोकसभा निवडणुकीच्या आधी मी राष्ट्रवादीचे दोन आमदार फोडणार, असे सांगितले होते आणि तसेच झाले.

यदु जोशी/गजानन जानभोर, नवी दिल्ली - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मंत्री, आमदार भाजपामध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्या संपर्कात असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या आधी मी राष्ट्रवादीचे दोन आमदार फोडणार, असे सांगितले होते आणि तसेच झाले. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री आमच्याकडे येतील़ काहींशी तर आपली चर्चा सुरू आहे, असे मुंडे म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा आणि राज्यात मध्यावधी निवडणूक घ्यावी, अशी मागणी मुंडे यांनी या मुलाखतीत केली. प्रश्न - बीडच्या निकालाबाबत आपली प्रतिक्रिया काय? आपण जिंकलात, पण आपले मित्र आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा दारुण पराभव झाला; असे का झाले? मुंडे - पवार मला संपवायला निघाले होते. मी त्यांना पुरून उरलो, एवढाच त्याचा अर्थ आहे. बीडची जनता (पान १ वरून ) माझ्यासोबत आहे हे सिद्ध झाले. भुजबळ यांच्यावर निवडणूक लादण्यात आली होती. त्यांची लढण्याची इच्छा नव्हती; पण राज्यात अजित पवार यांच्या मार्गात अडथळा नको म्हणून त्यांना लोकसभेला लढविले गेले. भुजबळ, तटकरेंचा बळी दिला गेला; मग अजित पवारांना माढातून का उभे केले नाही? राज्यातील मतदारांनी या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला इतका मोठा कौल का दिला? राज्यात आता काय परिस्थिती असेल? मुंडे - मोदींच्या नेतृत्वावरचा हा विश्वास आहे. केंद्र आणि राज्य सरकारविरुद्धचा हा कौल आहे. महागाई, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारले. आता राज्यात मध्यावधी निवडणूक घेऊन त्यांनी नव्याने कौल घेतला पाहिजे. आमदारांचे संख्याबळ त्यांच्याकडे कितीही असले तरी त्यांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबद्दल आता प्रश्न केले जात आहेत. आपले याबाबत मत काय? मुंडे - राष्ट्रवादीने आता काँग्रेसमध्ये विलीन झालेले बरे. केवळ शरद पवार यांच्या नेतृत्वात निवडणुका जिंकता येतील, अशी परिस्थिती नाही, परवाच्या निकालाने हे सिद्ध केले आहे. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने विलीनीकरणाचा निर्णय राष्ट्रवादीने घ्यावा. राष्ट्रीय राजकारणात पवार यांना आता संधी दिसत नाही. सहकार क्षेत्र आणि सहकारी साखर कारखानदारीमुळे त्यांच्याभोवती असलेले मोहोळ आता राहील, असे वाटत नाही.