शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

"लढा सुरूच राहणार..."; दिल्लीतल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 22:16 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विरोधकांचा सुपडा साफ करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपने बहुमत मिळवत २७ वर्षांनी पुन्हा दिल्लीची सत्ता मिळवली. मात्र या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सत्ताधारी आपला २२ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. दिल्लीत सलग तिसऱ्यांदा दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने चमकदार कामगिरी केली आणि ४८ जागा जिंकल्या. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे खातेही उघडले नाही, हा पक्षासाठी मोठा धक्का आहे. मात्र निवडणूक निकालानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे आणि दिल्लीकरांचे आभार मानले. दिल्लीचा जनादेश आपण नम्रपणे स्वीकारतो आणि आपला पक्ष राष्ट्रीय राजधानीच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीकरांच्या हक्कांसाठी लढत राहील, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं.

“आम्ही नम्रपणे दिल्लीचा जनादेश स्वीकारतो. राज्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या समर्पणाबद्दल आणि सर्व मतदारांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार. प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्ध, दिल्लीच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीकरांच्या हक्कासाठी हा लढा सुरूच राहील," असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

त्याआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीतील जनतेचे आभार व्यक्त करताना पराभव स्वीकारला. "दिल्ली निवडणुकीत जनतेचा जो निर्णय असेल तो आम्ही पूर्ण नम्रतेने स्वीकारतो. जनतेचा निर्णय सर्वोच्च आहे. या विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे खूप खूप अभिनंदन करतो आणि जनतेने ज्या अपेक्षा आणि आशेने त्यांना बहुमत दिले आहे त्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा करतो," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

काँग्रेसच्या ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मात्र, काँग्रेसच्या मतांमध्ये दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. काँग्रेसला सुमारे ६.४ टक्के मते मिळाली आहेत. तर २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४.२६ टक्के मते मिळाली होती.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी