शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

"लढा सुरूच राहणार..."; दिल्लीतल्या दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 22:16 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विरोधकांचा सुपडा साफ करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपने बहुमत मिळवत २७ वर्षांनी पुन्हा दिल्लीची सत्ता मिळवली. मात्र या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सत्ताधारी आपला २२ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. दिल्लीत सलग तिसऱ्यांदा दारूण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने चमकदार कामगिरी केली आणि ४८ जागा जिंकल्या. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचे खातेही उघडले नाही, हा पक्षासाठी मोठा धक्का आहे. मात्र निवडणूक निकालानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे आणि दिल्लीकरांचे आभार मानले. दिल्लीचा जनादेश आपण नम्रपणे स्वीकारतो आणि आपला पक्ष राष्ट्रीय राजधानीच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीकरांच्या हक्कांसाठी लढत राहील, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं.

“आम्ही नम्रपणे दिल्लीचा जनादेश स्वीकारतो. राज्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या समर्पणाबद्दल आणि सर्व मतदारांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार. प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्ध, दिल्लीच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीकरांच्या हक्कासाठी हा लढा सुरूच राहील," असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

त्याआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीतील जनतेचे आभार व्यक्त करताना पराभव स्वीकारला. "दिल्ली निवडणुकीत जनतेचा जो निर्णय असेल तो आम्ही पूर्ण नम्रतेने स्वीकारतो. जनतेचा निर्णय सर्वोच्च आहे. या विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे खूप खूप अभिनंदन करतो आणि जनतेने ज्या अपेक्षा आणि आशेने त्यांना बहुमत दिले आहे त्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा करतो," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

काँग्रेसच्या ६७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागांवर काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मात्र, काँग्रेसच्या मतांमध्ये दोन टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. काँग्रेसला सुमारे ६.४ टक्के मते मिळाली आहेत. तर २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४.२६ टक्के मते मिळाली होती.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी