शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लुटा; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 07:12 IST

राहुल गांधी यांचे मोदी यांच्यावर सतत हल्ले सुरू आहेत. मंगळवारी मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर गांधी यांनी पुन्हा हल्ला केला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : सरकारने प्रत्येक गरीब व्यक्तीच्या खात्यात सहा महिने साडेसात हजार रुपये टाकावेत म्हणजे देशाची अर्थव्यवस्था परत रुळांवर आणता येईल, अशी सूचना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा केली आहे.

गांधी यांचे मोदी यांच्यावर सतत हल्ले सुरू आहेत. मंगळवारी मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर गांधी यांनी पुन्हा हल्ला केला. ते म्हणाले, ‘‘तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लुटा, मुझे रहजनों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है.’’राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावर सरकारविरोधात आघाडी सांभाळली तर पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारवर हल्ले करीत होत्या.

प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारने रोजगार देण्याच्या दिलेल्या आश्वासनांवर हल्ला करताना म्हटले की, ‘‘आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये जवळपास दीड लाख लोक आता मुंबईत परतले आहेत. राज्य सरकारने एका आयोजनाच्या माध्यमातून राज्यात असलेल्या भयंकर बेरोजगारीला झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु वस्तुस्थिती समोर आलीच. वस्तुस्थिती जाहिरातींच्या माध्यमांतून किती झाकून ठेवणार?’’ असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी विचारला.चीनच्या सैन्याला कसे हटविणार?

  • राहुल गांधी मोदी यांचे नाव घेऊन म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांत कोरोनाने हिंदुस्तानची अर्थव्यवस्था नष्ट केली. आम्ही सरकारला तीन-चार वेळा सूचना केल्या होत्या.
  • ‘न्याय’ योजनेसारखी एक योजना लागू करावी, कायमस्वरूपी जरी नसली तरी सहा महिन्यांसाठी राबवावी, प्रत्येक गरीब कुटुंबाच्या बँक खात्यात दरमहा साडेसात हजार रुपये टाकावेत. यामुळे मागणी निर्माण होईल व पुन्हा अर्थव्यवस्था सुरू होईल. सरकारने हे मान्य केले नाही.
  • एकदा नव्हे तर ३-४ वेळेस सरकारने नाही म्हटले. कारण सांगितले की, आमच्याकडे पैसे नाहीत. सरकारने सगळ्यात श्रीमंत १५ जणांचा कर माफ केला होता आणि गेल्या तीन महिन्यांत सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले आहेत. २२ वेळा सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवून तीन लाख कोटी रुपये सरकारकडे आले आहेत. त्यामुळे आमच्याकडे पैसा नाही असे म्हणणे योग्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
  • राहुल गांधी यांनी चीनवरून सरकारला नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन थेट प्रश्न विचारला की, ‘‘चीनने हिंदुस्तानची पवित्र जमीन हिसकावली आहे. आम्हाला सगळे माहीत आहे की, चीन लडाखमध्ये चार जागी आत येऊन बसला आहे. मोदी जी, तुम्ही देशाला सांगावे की, चीनचे सैन्य तुम्ही हिंदुस्तानमधून केव्हा आणि कसे काढणार?’’
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन