शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लुटा; पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 07:12 IST

राहुल गांधी यांचे मोदी यांच्यावर सतत हल्ले सुरू आहेत. मंगळवारी मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर गांधी यांनी पुन्हा हल्ला केला.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : सरकारने प्रत्येक गरीब व्यक्तीच्या खात्यात सहा महिने साडेसात हजार रुपये टाकावेत म्हणजे देशाची अर्थव्यवस्था परत रुळांवर आणता येईल, अशी सूचना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा केली आहे.

गांधी यांचे मोदी यांच्यावर सतत हल्ले सुरू आहेत. मंगळवारी मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर गांधी यांनी पुन्हा हल्ला केला. ते म्हणाले, ‘‘तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लुटा, मुझे रहजनों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है.’’राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्तरावर सरकारविरोधात आघाडी सांभाळली तर पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारवर हल्ले करीत होत्या.

प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारने रोजगार देण्याच्या दिलेल्या आश्वासनांवर हल्ला करताना म्हटले की, ‘‘आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमध्ये जवळपास दीड लाख लोक आता मुंबईत परतले आहेत. राज्य सरकारने एका आयोजनाच्या माध्यमातून राज्यात असलेल्या भयंकर बेरोजगारीला झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु वस्तुस्थिती समोर आलीच. वस्तुस्थिती जाहिरातींच्या माध्यमांतून किती झाकून ठेवणार?’’ असा प्रश्न प्रियांका गांधी यांनी विचारला.चीनच्या सैन्याला कसे हटविणार?

  • राहुल गांधी मोदी यांचे नाव घेऊन म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांत कोरोनाने हिंदुस्तानची अर्थव्यवस्था नष्ट केली. आम्ही सरकारला तीन-चार वेळा सूचना केल्या होत्या.
  • ‘न्याय’ योजनेसारखी एक योजना लागू करावी, कायमस्वरूपी जरी नसली तरी सहा महिन्यांसाठी राबवावी, प्रत्येक गरीब कुटुंबाच्या बँक खात्यात दरमहा साडेसात हजार रुपये टाकावेत. यामुळे मागणी निर्माण होईल व पुन्हा अर्थव्यवस्था सुरू होईल. सरकारने हे मान्य केले नाही.
  • एकदा नव्हे तर ३-४ वेळेस सरकारने नाही म्हटले. कारण सांगितले की, आमच्याकडे पैसे नाहीत. सरकारने सगळ्यात श्रीमंत १५ जणांचा कर माफ केला होता आणि गेल्या तीन महिन्यांत सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले आहेत. २२ वेळा सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवून तीन लाख कोटी रुपये सरकारकडे आले आहेत. त्यामुळे आमच्याकडे पैसा नाही असे म्हणणे योग्य नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
  • राहुल गांधी यांनी चीनवरून सरकारला नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन थेट प्रश्न विचारला की, ‘‘चीनने हिंदुस्तानची पवित्र जमीन हिसकावली आहे. आम्हाला सगळे माहीत आहे की, चीन लडाखमध्ये चार जागी आत येऊन बसला आहे. मोदी जी, तुम्ही देशाला सांगावे की, चीनचे सैन्य तुम्ही हिंदुस्तानमधून केव्हा आणि कसे काढणार?’’
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन