शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 10:56 IST

काँग्रेसने पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाला कोंडीत पकडलं आणि पुढील विधानसभा निवडणुका काँग्रेस एकट्याने लढवणार असल्याचं स्पष्ट केलं.

दिल्लीमध्ये एकत्र लोकसभा निवडणूक लढवणारे काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पुन्हा एकदा वेगळे झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत दोन्ही पक्षांच्या झालेल्या दारूण पराभवानंतर ते पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

आम आदमी पक्षाने याला प्रत्युत्तर देत विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, तर काँग्रेसनेपाणीटंचाईच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाला कोंडीत पकडलं आणि पुढील विधानसभा निवडणुका काँग्रेस एकट्याने लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. आज काँग्रेस दिल्लीतील विविध भागात आम आदमी पक्षाविरोधात मडकी फोडून आंदोलन करणार आहे. 

दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने उन्हाळ्याचे तापमान वाढत आहे त्यामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणीटंचाई वाढली आहे. अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची परिस्थिती आहे. मात्र टँकर वेळेवर येत नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. काँग्रेस सकाळी 11 वाजता युसूफ सराय गोविंदपुरी आणि दिल्लीच्या जवळपास 280 ब्लॉकमध्ये आम आदमी पार्टीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.

भाजपाने साधला काँग्रेसवर निशाणा 

पाणीटंचाईवर काँग्रेसने ‘आप’च्या विरोधात आंदोलन करण्याची जी घोषणा केली आहे त्यावर भाजपाने ताशेरे ओढले आहेत. दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख प्रवीण शंकर कपूर यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसने आम आदमी पार्टीच्या विरोधात घोषणा दिल्याने, दिल्लीतील लोकांनी "नौ सौ चूहे खा कर बिल्ली हज को चली" असं म्हटलं आहे. 

केवळ दहा दिवसांपूर्वी आम आदमी पक्षासोबत जय आणि वीरू यांसारखी मैत्री असल्याचं सांगणारी काँग्रेस आता त्याच आम आदमी पक्षात भ्रष्टाचार होताना दिसत असल्याचं म्हणत असल्याने दिल्लीतील जनतेला आश्चर्य वाटत असल्याचं प्रवीण शंकर कपूर यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते आता आम आदमी पक्षाला हवा तसा विरोध करण्याचं नाटक करू शकतात, पण दिल्लीतील आणि देशातील जनता ‘आप’च्या भ्रष्टाचाराची पापं माफ करणार नाही असं भाजपाने म्हटलं आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीWaterपाणीcongressकाँग्रेसAAPआप