शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाजपविरुद्ध एकत्र येण्याचे ममतांचे आवाहन काँग्रेस, डाव्यांनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 05:07 IST

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस व डाव्या पक्षांनी आपणास साथ द्यावी आणि एकत्रपणे भाजपला रोखू या, असे आवाहन केले आहे.

कोलकाता/नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर एका महिन्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस व डाव्या पक्षांनी आपणास साथ द्यावी आणि एकत्रपणे भाजपला रोखू या, असे आवाहन केले आहे.मात्र दोन्ही डाव्या पक्षांनी ममता बॅनर्जी यांचे आवाहन फेटाळून लावले असून, काँग्रेसनेही ममता बॅनर्जी अन्य पक्षांच्या सहकार्यासाठी किती गंभीर आहेत, अशी शंकाच व्यक्त केली आहे. भाजपशी संघर्ष कसा करायचा, हे आम्हाला ममता बॅनर्जी यांच्याकडून शिकण्याची गरज नाही, असे डाव्या पक्षांनी म्हटले आहे, तर ममता बॅनर्जी या भाजपशी लढण्याबाबत खरोखर गंभीर आहेत का, अशी शंका काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी व्यक्त केली.विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना ममता यांनी हे आवाहन केले होते. देशाची राज्यघटना बदलण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रभाव वाढण्यास ममता बॅनर्जी याच जबाबदार आहेत, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुजन चक्रवर्ती यांनीही असेच म्हटले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष व काँग्रेस एकत्र येणे शक्य नाही, हे स्पष्ट झाले आहे.ममता बॅनर्जी घाबरल्या : भाजपममता बॅनर्जी डावे व काँग्रेस यांना आपल्यासोबत येण्यास सांगतात, यावरून त्यांना एकट्याने लढण्याची आणि विजयी होण्याची भीती वाटू लागली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली आहे.एकट्या तृणमूलला सामना करणे अवघडपश्चिम बंगालमध्ये दोन वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत; पण आताच झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपने तब्बल १८ जागांवर विजय मिळाल्यामुळे त्या पक्षाने राज्यात आपले पाय भक्कम रोवले असल्याचे स्पष्ट झाले आहे.अशा स्थितीत एकट्या तृणमूल काँग्रेसला भाजपशी सामना करणे शक्य होणार नाही, अशी भीती ममता बॅनर्जी यांना वाटत असावी. कदाचित मतविभागणीचा फायदा भाजपला होऊ नये, या इच्छेमुळे त्यांनी डावे पक्ष व काँग्रेसला सहकार्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले असावे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल