शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 12:30 IST

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींची पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकाकृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चारशेतकऱ्यांचे चक्का जाम शांततेत

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत कृषी कायदे रद्द केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन ०२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. (Rahul Gandhi Criticized Central Government over Farmers Law)

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. शेतकऱ्यांचा आता गांधी जयंतीपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा दृढ संकल्प आहे. मोदी सरकारवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही, हे यावरून स्पष्ट होते, असे सांगत मोदी सरकारने अहंकार सोडावा. आंदोलक शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्याव्यात आणि कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केंद्रीय कृषी कायद्यावरून टीका करत आहेत. काँग्रेसचा या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे यापूर्वीच राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते. शेतकऱ्यांचे शांततेने सुरू असलेले आंदोलन देशहिताचे आहे. केंद्रीय कृषी कायदे केवळ शेतकऱ्यांसाठी नाही, तर देशासाठी घातक आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी यापूर्वी केला होता. 

टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलकानं घेतला गळफास; 'सुसाइड नोट'मध्ये मोदींचा उल्लेख

दरम्यान, शेतकऱ्यांनी पुकारलेले चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडले. उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, उत्तराखंडमध्ये या भागांमध्ये चक्का जाम आंदोलन केले गेले नाही. मात्र, उर्वरित देशभरात आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरू, अमृतसर, संगरूर, जम्मू, पठाणकोट यांसारख्या अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलनात सक्रीय सहभागी होत शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरले. शनिवारी दुपारी १२ ते ०३ या कालावधीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारFarmers Protestशेतकरी आंदोलन