शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सरकारने अहंकार सोडून कृषी कायदे रद्द करावेत; राहुल गांधींचा पुनरुच्चार

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 12:30 IST

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. कृषी कायदे मागे घ्यावेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींची पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकाकृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीचा पुनरुच्चारशेतकऱ्यांचे चक्का जाम शांततेत

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत कृषी कायदे रद्द केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन ०२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरू राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. (Rahul Gandhi Criticized Central Government over Farmers Law)

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. शेतकऱ्यांचा आता गांधी जयंतीपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा दृढ संकल्प आहे. मोदी सरकारवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही, हे यावरून स्पष्ट होते, असे सांगत मोदी सरकारने अहंकार सोडावा. आंदोलक शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्याव्यात आणि कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केंद्रीय कृषी कायद्यावरून टीका करत आहेत. काँग्रेसचा या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचे यापूर्वीच राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते. शेतकऱ्यांचे शांततेने सुरू असलेले आंदोलन देशहिताचे आहे. केंद्रीय कृषी कायदे केवळ शेतकऱ्यांसाठी नाही, तर देशासाठी घातक आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी यापूर्वी केला होता. 

टिकरी सीमेवर शेतकरी आंदोलकानं घेतला गळफास; 'सुसाइड नोट'मध्ये मोदींचा उल्लेख

दरम्यान, शेतकऱ्यांनी पुकारलेले चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडले. उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, उत्तराखंडमध्ये या भागांमध्ये चक्का जाम आंदोलन केले गेले नाही. मात्र, उर्वरित देशभरात आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरू, अमृतसर, संगरूर, जम्मू, पठाणकोट यांसारख्या अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलनात सक्रीय सहभागी होत शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरले. शनिवारी दुपारी १२ ते ०३ या कालावधीत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारFarmers Protestशेतकरी आंदोलन