शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Budget 2021 गरिबांच्या हातात काहीच नाही; देशाची संपत्ती भांडवलदारांच्या हाती: राहुल गांधी

By देवेश फडके | Updated: February 1, 2021 17:07 IST

विरोधकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली असून, आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देकेंद्रीय अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रियाराहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली टीकासरकार सर्वकाही विकण्याच्या तयारीत - सलीम अली

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प कठीण काळात तयार करण्यात आला आहे, असे निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली असून, आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन, सरकारी योजना, धोरणे यांवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट करत पुन्हा एकदा जोरदार टीका केली. 

 

काय म्हणाले राहुल गांधी?

गरिबांच्या हातात रोख येईल, हे आता विसरून जा. मोदी सरकारने देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांच्या हाती सोपवण्याची योजना तयार केली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. तर, दुसरीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे काही राज्यांमधील निवडणुकांसाठी तयार केलेला मार्ग आहे. गरिबांच्या हातात रोख मिळेल, अशा काही तरतुदी यात करण्यात येतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, खासगीकरण आणि निर्गुंतवणूक करत देश विक्रीसाठी ठेवला पाहिजे, असे सरकारचे म्हणणे आहे का, असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला. 

हा अर्थसंकल्प होता की OLX, सरकार सर्वकाही विकण्याच्या तयारीत; CPM नेत्याची टीका

यंदाच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन

यंदाचा अर्थसंकल्प असाधारण असून, यात विकासाचा विश्वास आहे. कोरोनाने संपूर्ण मानवजातीला हादरुन सोडले. त्यामुळेच, यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या आत्मविश्वाला उजळणी देणारा असून जगभरात एक नवीन आत्मविश्वास वाढवणारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. 

देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाची आर्थिक स्थिती मजबूत करणारा आहे. हा अर्थसंकल्प देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे. तसेच, देशाला आर्थिक विकासाकडे घेऊन जाणारा हा समतोल आणि देशाला प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.

सरकार सर्वकाही विकण्याच्या तयारीत

या अर्थसंकल्पात रेल्वे, बँक, विमा, संरक्षण आणि स्टील या सर्वांची विक्री करण्याच्या तयारीत सरकार आहे. हा अर्थसंकल्प आहे की OLX असा सवाल सीपीएमचे नेते सलीम अली यांनी केला. तसेच त्यांनी या अर्थसंकल्पावर टीकाही केली. तर दुसरीकडे हा भांडवलदारांचा अर्थसंकल्प असल्याचे म्हणत सीताराम येचुरी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली. 

टॅग्स :budget 2021बजेट 2021Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी