शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 11:03 IST

पुलवामा हल्ल्याला वर्ष पूर्ण; राहुल गांधींचे तीन प्रश्न

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण झालं आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. या जवानांच्या हौतात्म्याला देशभरातून वंदन केलं जात आहे. तर यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं आहे. राहुल यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधीनी ट्विटच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याबद्दल प्रश्न विचारले आहेत. 'पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? या हल्ल्याच्या तपासातून काय निष्पन्न झालं? ज्या त्रुटींमुळे दहशतवादी झाला, त्यासाठी भाजपा सरकारमधल्या कोणाला जबाबदार धरण्यात आलं?,' असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले आहेत. राहुल गांधींच्या या ट्विटवरुन भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. 'राहुल गांधींना लाज वाटायला हवी. पुलवामा हल्ल्याचा फायदा कोणाला झाला विचारता? इंदिरा-राजीव यांच्या हत्येचा फायदा कोणाला झाला असं देशानं विचारलं, तर काय उत्तर द्याल? घाणेरडं राजकारण करू नका. लाज बाळगा,' असं कपिल मिश्रांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदन केलं आहे. 'गेल्या वर्षी पुलवाम्यात झालेल्या भीषण हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करतो. ते सगळे असमान्य होते. त्यांनी देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. देश त्यांच्या हौतात्म्याला कधीही विसरणार नाही,' अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी