शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 11:03 IST

पुलवामा हल्ल्याला वर्ष पूर्ण; राहुल गांधींचे तीन प्रश्न

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण झालं आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. या जवानांच्या हौतात्म्याला देशभरातून वंदन केलं जात आहे. तर यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे शरसंधान साधलं आहे. राहुल यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधीनी ट्विटच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याबद्दल प्रश्न विचारले आहेत. 'पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला? या हल्ल्याच्या तपासातून काय निष्पन्न झालं? ज्या त्रुटींमुळे दहशतवादी झाला, त्यासाठी भाजपा सरकारमधल्या कोणाला जबाबदार धरण्यात आलं?,' असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले आहेत. राहुल गांधींच्या या ट्विटवरुन भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. 'राहुल गांधींना लाज वाटायला हवी. पुलवामा हल्ल्याचा फायदा कोणाला झाला विचारता? इंदिरा-राजीव यांच्या हत्येचा फायदा कोणाला झाला असं देशानं विचारलं, तर काय उत्तर द्याल? घाणेरडं राजकारण करू नका. लाज बाळगा,' असं कपिल मिश्रांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.  पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदन केलं आहे. 'गेल्या वर्षी पुलवाम्यात झालेल्या भीषण हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करतो. ते सगळे असमान्य होते. त्यांनी देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. देश त्यांच्या हौतात्म्याला कधीही विसरणार नाही,' अशा शब्दांत मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी