शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षात ७० वेळा पेपर फुटला, नीट व्यावसायिक परीक्षा बनवली - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 17:45 IST

राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले आहे. आता नवीन फॅशन नीट झाली आहे.

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संविधान, महागाई आणि अग्निवीर योजनेवरून हल्लाबोल केल्यानंतर राहुल गांधी यांनी नीट पेपर लीकवरूनही निशाणा साधला. सरकार पेपरफुटी थांबवू शकले नाही आणि सात वर्षात ७० वेळा पेपर फुटले, असे म्हणत सरकारने नीटला व्यवसायिक परीक्षा बनवल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले आहे. आता नवीन फॅशन नीट झाली आहे. तुम्ही प्रोफेशनल स्कीमचे कमर्शियल स्कीममध्ये रूपांतर केले आहे. नीट ही श्रीमंत मुलांसाठी करण्यात आली आहे. सरकारने प्रोफेशनल परीक्षा ही कमर्शियल परीक्षा केली आहे. विद्यार्थी ६ महिने नीट परीक्षेची तयारी करतात. नीटच्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेवर विश्वास राहिलेला नाही.

दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभेत या चर्चेत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एका दिवशी म्हटले की, हिंदुस्तानने कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचं कारण आहे हिंदुस्तान अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असे म्हटले. 

भगवान शंकर म्हणतात डरो मत, डराओ मत आणि त्रिशुल जमीन रोवतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात, ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत, तुम्ही हिंदू असूच शकत नाही. हिंदू धर्मानं स्पष्टपणे म्हटले आहे की, सत्याची साथ द्या, असे राहुल गांधी म्हणाले. यानंतर भाजप नेते आक्रमक झाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप घेतला. 

नीटवर सभागृहात एक दिवस चर्चा व्हायला हवी : राहुल गांधीनीट परीक्षेतील अनियमिततेवर सभागृहात चर्चेची मागणी करताना राहुल गांधी म्हणाले, "आम्हाला वाटते की, नीट मुद्द्यावर एक दिवसीय चर्चा व्हायला हवी. गेल्या सात वर्षांत ७० वेळा पेपर फुटले आहेत. संसदेतून देशाला संदेश दिला जातो. आम्ही विद्यार्थ्यांना असा संदेश देऊ इच्छितो की, नीटचा मुद्दा संसदेसाठी किती महत्त्वाचा आहे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदlok sabhaलोकसभा