शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

७ वर्षात ७० वेळा पेपर फुटला, नीट व्यावसायिक परीक्षा बनवली - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 17:45 IST

राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले आहे. आता नवीन फॅशन नीट झाली आहे.

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संविधान, महागाई आणि अग्निवीर योजनेवरून हल्लाबोल केल्यानंतर राहुल गांधी यांनी नीट पेपर लीकवरूनही निशाणा साधला. सरकार पेपरफुटी थांबवू शकले नाही आणि सात वर्षात ७० वेळा पेपर फुटले, असे म्हणत सरकारने नीटला व्यवसायिक परीक्षा बनवल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्ही प्रत्येक व्यक्तीला भीतीचे पॅकेज दिले आहे. आता नवीन फॅशन नीट झाली आहे. तुम्ही प्रोफेशनल स्कीमचे कमर्शियल स्कीममध्ये रूपांतर केले आहे. नीट ही श्रीमंत मुलांसाठी करण्यात आली आहे. सरकारने प्रोफेशनल परीक्षा ही कमर्शियल परीक्षा केली आहे. विद्यार्थी ६ महिने नीट परीक्षेची तयारी करतात. नीटच्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेवर विश्वास राहिलेला नाही.

दरम्यान, राहुल गांधी यांनी लोकसभेत या चर्चेत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एका दिवशी म्हटले की, हिंदुस्तानने कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचं कारण आहे हिंदुस्तान अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असे म्हटले. 

भगवान शंकर म्हणतात डरो मत, डराओ मत आणि त्रिशुल जमीन रोवतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात, ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत, तुम्ही हिंदू असूच शकत नाही. हिंदू धर्मानं स्पष्टपणे म्हटले आहे की, सत्याची साथ द्या, असे राहुल गांधी म्हणाले. यानंतर भाजप नेते आक्रमक झाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप घेतला. 

नीटवर सभागृहात एक दिवस चर्चा व्हायला हवी : राहुल गांधीनीट परीक्षेतील अनियमिततेवर सभागृहात चर्चेची मागणी करताना राहुल गांधी म्हणाले, "आम्हाला वाटते की, नीट मुद्द्यावर एक दिवसीय चर्चा व्हायला हवी. गेल्या सात वर्षांत ७० वेळा पेपर फुटले आहेत. संसदेतून देशाला संदेश दिला जातो. आम्ही विद्यार्थ्यांना असा संदेश देऊ इच्छितो की, नीटचा मुद्दा संसदेसाठी किती महत्त्वाचा आहे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदlok sabhaलोकसभा