शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

काँग्रेस चारआण्याच्या पुढे गेली नाही - नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 14, 2016 13:32 IST

नोटा बंद केल्यानंतर काँग्रेसचे नेते मला कुठल्या कायद्याच्या आधारे नोटा बंदीचा निर्णय घेतला म्हणून प्रश्न विचारत आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

गाझीपूर, दि. १४ - मी ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा बंद केल्यानंतर काँग्रेसचे नेते मला कुठल्या कायद्याच्या आधारे नोटा बंदीचा निर्णय घेतला म्हणून प्रश्न विचारत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या सत्ताकाळात चारआणे बंद केलेते. त्यावेळी तुम्ही कुठला कायदा लावलात. तुम्ही २५ पैशाच्या पुढे गेला नाहीत. तुम्ही तुमच्या बरोबरीचे काम केले. आम्ही ५०० आणि १ हजारच्या नोटा बंद करुन मी आमच्या बरोबरीचे काम केले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेशातील गाझीपूर येथील सभेत काँग्रेसवर बोचरी टीका केली. 
 
काँग्रेसने १९ महिने देशात आणीबाणी लावली. या काळात तुमचे नेते, कार्यकर्त्यांनी जनतेचा पैसा हडप केला. संपूर्ण देशाला जेलखाना बनवून टाकला होता आणि तुम्ही माझ्यावर आरोप करता अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. सध्या गरीब, सर्वसामान्यांना जो त्रास होतोय त्यामुळे मलाही भरपूर वेदना होतायत. तुमचा त्रास कमी करण्यासाठी मला जे शक्य आहे ते सर्व मी करतोय. मला बदल घडवण्यासाठी फक्त ५० दिवस द्या अशी भावनिक साद त्यांनी जमलेल्या गर्दीला घातली. 
 
पाकिस्तानचे नाव न घेता ते म्हणाले सीमेपलीकडे बनावट नोटा छापल्या जात होत्या. हा पैसा दहशतवाद, नक्षलवाद पसरवण्यासाठी वापरला जात होता. देशाविरोधात सुरु असलेला पैशाचा हा वापर थांबवणे आवश्यक होते त्यासाठी हा निर्णय घेतला असे मोदींनी सांगितले. 
 
प्रत्येक भ्रष्टाचा-याच्या घरी जाऊन  भ्रष्टाचार संपवणे शक्य नाही. त्यामुळे एकाचवेळी ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा रद्द करुन सर्वांना समपातळीवर आणले असे मोदी म्हणाले. कुठलेही काम असो त्रास हा होणारच फक्त तुमचा उद्देश प्रामाणिक असला पाहिजे. ज्यांच्या विरोधात हे सर्व करतोय ते शक्तीशाली आहेत. त्यांच्याकडे सरकार उलथवण्याची क्षमता आहे. पण मी सत्याचा, प्रामाणिकपणाचा मार्ग सोडणार नाही तुमचा आशिर्वाद माझ्याबरोबर आहे असे मोदींनी सांगितले.