शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या ६४ जागांचा निर्णय होणार दिल्लीत

By admin | Updated: September 12, 2014 02:16 IST

प्रचंड काथ्याकूट करून देखील आपल्या वाट्याच्या १७४ जागांपैकी ६४ मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवार ठरविण्यात काँग्रेसच्या छाननी समितीला अपयश आले आहे.

यदु जोशी, मुंबईप्रचंड काथ्याकूट करून देखील आपल्या वाट्याच्या १७४ जागांपैकी ६४ मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवार ठरविण्यात काँग्रेसच्या छाननी समितीला अपयश आले आहे. उर्वरित ११० ठिकाणचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीची शेवटची बैठक बुधवारी रात्री येथे आटोपली. समितीने गेले दहा-बारा दिवस तासन्तास खल केला. एकेका मतदारसंघात तीन-तीन नावे होती. ती कमीकमी करीत नेली. तरीही ६४ मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुकांची नावे आहेत. बहुतेक ठिकाणी दोन-दोन नावे यादीमध्ये आहेत.प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, छाननी समितीच्या पातळीवर चर्चेतून १०० हून अधिक नावे ठरविता आली हे मोठे यश आहे. आधी प्रदेश निवड मंडळाला आणि नंतर छाननी समितीला विश्वासात घेऊन ही प्रक्रिया करण्यात आली.छाननी समितीने निश्चित केलेली नावे १४ सप्टेंबरला केंद्रीय निवड मंडळासमोर ठेवली जातील आणि त्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली जाईल, अशी शक्यता आहे. ज्या मतदारसंघांमध्ये एकपेक्षा जास्त नावे आहेत त्या बाबतचा निर्णय केंद्रीय मंडळ करेल. छाननी समिती त्यासाठी सहकार्य करेल. सूत्रांनी सांगितले की, विद्यमान सर्व आमदारांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाही. फारतर चार-पाच आमदारांना वगळले जाईल, असे आधी म्हटले जात होते. तथापि, आता हा आकडा मोठाही असू शकेल. काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदारांना बदलून नवीन लोकांना संधी दिली आणि त्याचा फायदा झाल्याची गेल्या वर्षभरात काही राज्यांमधील उदाहरणे त्यांच्या समर्थनार्थ दिली जात आहेत, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाची पुढची चर्चा होण्याचा मुहूर्त अद्याप निघालेला दिसत नाही. आता सगळेकाही दिल्लीत ठरेल, असे ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीला ११४ पेक्षा एकही जागा वाढवून देऊ नये, अशी प्रदेश काँग्रेसची भूमिका असल्याचे ते म्हणाले. सूत्रांनी सांगितले की, ज्या ६४ मतदारसंघांमधील उमेदवार अद्याप ठरविण्यात आलेले नाहीत त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटू शकतील असे काही मतदारसंघ आहेत. काँग्रेस गेल्या तीन निवडणुकात जिंकू शकलेली नाही आणि तिथे राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार असेल तर ती जागा सोडण्याची पक्षाची तयारी असेल. उमेदवार न ठरण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, काही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कोण असतील यावर काँग्रेसचे उमेदवार निश्चित केले जातील.