शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

काँग्रेसच्या ६४ जागांचा निर्णय होणार दिल्लीत

By admin | Updated: September 12, 2014 02:16 IST

प्रचंड काथ्याकूट करून देखील आपल्या वाट्याच्या १७४ जागांपैकी ६४ मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवार ठरविण्यात काँग्रेसच्या छाननी समितीला अपयश आले आहे.

यदु जोशी, मुंबईप्रचंड काथ्याकूट करून देखील आपल्या वाट्याच्या १७४ जागांपैकी ६४ मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवार ठरविण्यात काँग्रेसच्या छाननी समितीला अपयश आले आहे. उर्वरित ११० ठिकाणचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीची शेवटची बैठक बुधवारी रात्री येथे आटोपली. समितीने गेले दहा-बारा दिवस तासन्तास खल केला. एकेका मतदारसंघात तीन-तीन नावे होती. ती कमीकमी करीत नेली. तरीही ६४ मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुकांची नावे आहेत. बहुतेक ठिकाणी दोन-दोन नावे यादीमध्ये आहेत.प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, छाननी समितीच्या पातळीवर चर्चेतून १०० हून अधिक नावे ठरविता आली हे मोठे यश आहे. आधी प्रदेश निवड मंडळाला आणि नंतर छाननी समितीला विश्वासात घेऊन ही प्रक्रिया करण्यात आली.छाननी समितीने निश्चित केलेली नावे १४ सप्टेंबरला केंद्रीय निवड मंडळासमोर ठेवली जातील आणि त्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली जाईल, अशी शक्यता आहे. ज्या मतदारसंघांमध्ये एकपेक्षा जास्त नावे आहेत त्या बाबतचा निर्णय केंद्रीय मंडळ करेल. छाननी समिती त्यासाठी सहकार्य करेल. सूत्रांनी सांगितले की, विद्यमान सर्व आमदारांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाही. फारतर चार-पाच आमदारांना वगळले जाईल, असे आधी म्हटले जात होते. तथापि, आता हा आकडा मोठाही असू शकेल. काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदारांना बदलून नवीन लोकांना संधी दिली आणि त्याचा फायदा झाल्याची गेल्या वर्षभरात काही राज्यांमधील उदाहरणे त्यांच्या समर्थनार्थ दिली जात आहेत, असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाची पुढची चर्चा होण्याचा मुहूर्त अद्याप निघालेला दिसत नाही. आता सगळेकाही दिल्लीत ठरेल, असे ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादीला ११४ पेक्षा एकही जागा वाढवून देऊ नये, अशी प्रदेश काँग्रेसची भूमिका असल्याचे ते म्हणाले. सूत्रांनी सांगितले की, ज्या ६४ मतदारसंघांमधील उमेदवार अद्याप ठरविण्यात आलेले नाहीत त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटू शकतील असे काही मतदारसंघ आहेत. काँग्रेस गेल्या तीन निवडणुकात जिंकू शकलेली नाही आणि तिथे राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार असेल तर ती जागा सोडण्याची पक्षाची तयारी असेल. उमेदवार न ठरण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, काही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कोण असतील यावर काँग्रेसचे उमेदवार निश्चित केले जातील.