शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

'सोनभद्रमधील मृतांबद्दल काँग्रेसला आलेला कळवळा निव्वळ नक्राश्रू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 06:18 IST

योगी आदित्यनाथ; हिंसाचारग्रस्त उंभा गावाचा केला दौरा

सोनभद्र : उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील उंभा या गावी जमिनीच्या वादातून उसळलेल्या हिंसाचारात १० जण ठार झाले होते. त्याप्रकरणी काँग्रेस नक्राश्रू ढाळत आहे, असा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. या हिंसाचारातील पीडितांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सोनभद्र येथे भेटायला चाललेल्या असताना पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवून ताब्यात घेतले. त्यामुळे प्रियांका गांधी यांनी या पीडितांची चुनार किल्ला गेस्ट हाऊसमध्येच भेट घेतली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उंभा गावाचा दौरा केला.

ते म्हणाले की, उंभामध्ये झालेल्या हिंसाचारात जे जखमी झाले त्यांच्यावरील उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकारकडून केला जाईल. या दौºयात योगी आदित्यनाथ यांच्या समवेत उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह, मुख्य सचिव अनुपचंद्र पांडे होते. जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून उंभा गावचा सरपंच यज्ञदत्त व त्याच्या समर्थकांनी केलेल्या गोळीबारात गोंड आदिवासी जमातीचे दहा जण ठार झाले होते.

बळी गेलेल्या कुटुंबियांना आवाज दडपण्याचे प्रयत्न उत्तर प्रदेश आदित्यनाथ सरकारकडून सुरू असून, त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही अशी टीका प्रियांका गांधी यांनी शनिवारी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, उंभा येथे झालेला हिंसाचार हे काँग्रेसचेच पाप असून त्यापासून हा पक्ष हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. 

बळींच्या वारसदारांना दहा लाखांची भरपाई द्याउंभा येथील हिंसाचारात बळी पडलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपये व जमीन देण्यात यावी, अशी मागणी या लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या दौºयाआधी केली. जे जखमी झाले त्यांना प्रत्येकी ७ लाख रुपयांची भरपाई व सहा बिघे जमीन द्यावी, अशीही मागणी झाली आहे.

या घटनेतील एक जखमी छोटेलाल याने सांगितले की, जनतेची सेवा करण्यासाठी सरपंचाला निवडून दिले जाते. मात्र, त्याने जनसेवा करण्याऐवजी आमच्यावरच गोळीबार केला. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी फासावर लटकवावे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथ