शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

'सोनभद्रमधील मृतांबद्दल काँग्रेसला आलेला कळवळा निव्वळ नक्राश्रू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 06:18 IST

योगी आदित्यनाथ; हिंसाचारग्रस्त उंभा गावाचा केला दौरा

सोनभद्र : उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील उंभा या गावी जमिनीच्या वादातून उसळलेल्या हिंसाचारात १० जण ठार झाले होते. त्याप्रकरणी काँग्रेस नक्राश्रू ढाळत आहे, असा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. या हिंसाचारातील पीडितांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सोनभद्र येथे भेटायला चाललेल्या असताना पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवून ताब्यात घेतले. त्यामुळे प्रियांका गांधी यांनी या पीडितांची चुनार किल्ला गेस्ट हाऊसमध्येच भेट घेतली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उंभा गावाचा दौरा केला.

ते म्हणाले की, उंभामध्ये झालेल्या हिंसाचारात जे जखमी झाले त्यांच्यावरील उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकारकडून केला जाईल. या दौºयात योगी आदित्यनाथ यांच्या समवेत उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह, मुख्य सचिव अनुपचंद्र पांडे होते. जमिनीचा ताबा घेण्याच्या वादातून उंभा गावचा सरपंच यज्ञदत्त व त्याच्या समर्थकांनी केलेल्या गोळीबारात गोंड आदिवासी जमातीचे दहा जण ठार झाले होते.

बळी गेलेल्या कुटुंबियांना आवाज दडपण्याचे प्रयत्न उत्तर प्रदेश आदित्यनाथ सरकारकडून सुरू असून, त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही अशी टीका प्रियांका गांधी यांनी शनिवारी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, उंभा येथे झालेला हिंसाचार हे काँग्रेसचेच पाप असून त्यापासून हा पक्ष हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. 

बळींच्या वारसदारांना दहा लाखांची भरपाई द्याउंभा येथील हिंसाचारात बळी पडलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपये व जमीन देण्यात यावी, अशी मागणी या लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या दौºयाआधी केली. जे जखमी झाले त्यांना प्रत्येकी ७ लाख रुपयांची भरपाई व सहा बिघे जमीन द्यावी, अशीही मागणी झाली आहे.

या घटनेतील एक जखमी छोटेलाल याने सांगितले की, जनतेची सेवा करण्यासाठी सरपंचाला निवडून दिले जाते. मात्र, त्याने जनसेवा करण्याऐवजी आमच्यावरच गोळीबार केला. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी फासावर लटकवावे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथ