शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकरी आत्महत्येची राहुल गांधीकडून दखल; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 12:28 IST

राहुल गांधी यांच्या वायनाड मतदार संघात एका शेतकऱ्यांने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. कर्जबाजीरपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेत पदाचा राजीनामा पक्षासमोर ठेवला. त्यांचा राजीनामा पक्षाने नाकारला असून अध्यक्षपदी राहण्याचा आग्रह केला आहे. या घडामोडी घडत असतानाच राहुल गांधी शेतकरी आत्महत्येवरून एक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे.

राहुल गांधी यांच्या वायनाड मतदार संघात एका शेतकऱ्यांने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. कर्जबाजीरपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. वायनाडचे नवनिर्वाचित खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आत्महत्येची तातडीने दखल घेतली असून केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पत्र पाठवून चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची देखील विनंती केली आहे.

राहुल यांनी पत्रात म्हटले की, वायनाड भागातील पनामारान पंचायत समितीतील नीरवरम गावात व्ही.डी. दिनेश कुमार यांनी आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर दु:ख झाले'. राहुल यांनी मयत शेतकऱ्यांच्या पत्नीशी फोनवरून चर्चा केली. राहुल यांनी पत्रात म्हटले की, केरळमध्ये कुमार यांची आत्महत्या एकमेव नाही. अनेक शेतकरी मृत्याला कवटाळत आहेत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांकडील कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यास ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील वसुली एजंटकडून शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे.

राहुल यांनी शेतकरी आत्महत्येवर दीर्घकालीन तोडगा काढण्याची विनंती राहुल यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. नुकतीच झालेली लोकसभा निवडणुक राहुल यांनी वायनाडमधून लढवली आहे. त्यांनी ४ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.