शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

शेतकरी आत्महत्येची राहुल गांधीकडून दखल; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 12:28 IST

राहुल गांधी यांच्या वायनाड मतदार संघात एका शेतकऱ्यांने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. कर्जबाजीरपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी घेत पदाचा राजीनामा पक्षासमोर ठेवला. त्यांचा राजीनामा पक्षाने नाकारला असून अध्यक्षपदी राहण्याचा आग्रह केला आहे. या घडामोडी घडत असतानाच राहुल गांधी शेतकरी आत्महत्येवरून एक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे.

राहुल गांधी यांच्या वायनाड मतदार संघात एका शेतकऱ्यांने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. कर्जबाजीरपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. वायनाडचे नवनिर्वाचित खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आत्महत्येची तातडीने दखल घेतली असून केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पत्र पाठवून चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची देखील विनंती केली आहे.

राहुल यांनी पत्रात म्हटले की, वायनाड भागातील पनामारान पंचायत समितीतील नीरवरम गावात व्ही.डी. दिनेश कुमार यांनी आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर दु:ख झाले'. राहुल यांनी मयत शेतकऱ्यांच्या पत्नीशी फोनवरून चर्चा केली. राहुल यांनी पत्रात म्हटले की, केरळमध्ये कुमार यांची आत्महत्या एकमेव नाही. अनेक शेतकरी मृत्याला कवटाळत आहेत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांकडील कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यास ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील वसुली एजंटकडून शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे.

राहुल यांनी शेतकरी आत्महत्येवर दीर्घकालीन तोडगा काढण्याची विनंती राहुल यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. नुकतीच झालेली लोकसभा निवडणुक राहुल यांनी वायनाडमधून लढवली आहे. त्यांनी ४ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.