शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

काँग्रेस-भाजपालाही विजयाचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 02:27 IST

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना आहे. तथापि, भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस. येदीयुरप्पा यांनी असा दावा केला आहे की, त्यांचा पक्ष १२५ ते १३० जागा जिंकेल. काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले आहे की, एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत काळजी न करता कार्यकर्त्यांनी विकेंडचा आनंद घ्यावा. सिद्धरामय्या यांनी व्टिट केले आहे की, ‘विकेंडचा आनंद घ्या, आम्ही पुन्हा परत येत आहोत.’कर्नाटकातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलची चर्चा सुरु झाली असली तरी नागरिकांसाठी हे मनोरंजन ठरत आहे. भाजपचे नेते येदीयुरप्पा यांनी असा दावा केला आहे की, भाजपला १३० पर्यंत जागा मिळतील. तर, काँग्रेस ७० च्या पुढे जाणार नाही. जनता दलाला (एस) २४-२५ च्या पुढे जागा मिळणार नाहीत. भाजपच्या बाजूने राज्यात लाट होती. तर, सिद्धरामय्या यांच्या विरोधात नागरिकातून संताप व्यक्त होत होता. आम्हाला विजयाची खात्री आहे आणि १७ मे रोजी सरकार स्थापन करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.एक्झिट पोलनुसार, जनता दल (एस) किंंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एच. डी. देवेगौैडा म्हणाले की, सद्या कशाचाच स्वीकार किंवा अस्वीकार करता येणार नाही. लोकांनी निकालाच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करावी. १५ मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी वस्तुस्थिती समोर येणार आहे.ही माझी शेवटची निवडणूक : सिद्धरामय्याकर्नाटकात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त करतानाच ही आपली शेवटची निवडणूक होती, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे. चामुंडेश्वरी मतदारसंघात पत्रकारांशी ते बोलत होते.दलित मुख्यमंत्र्यांच्या शक्यतेबाबत प्रश्न केला असता ते म्हणाले की, जर पक्ष दलित मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेत असेल तर उत्तमच आहे. ते म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेवर येईल. तसेच, जनता दल (एस) सोबत आघाडी करण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावताना ते म्हणाले की, एक्झिट पोल दोन दिवसांसाठी मनोरंजन आहे. यावर विश्वास ठेवणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला पोहता येत नसताना सांख्यिकीशास्त्रज्ञावर विश्वास ठेऊन पायी नदी पार करण्यासारखे आहे.निवडणुकीत प्रमुख चेहरे झाले गायबकर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी प्रचार केला असला तरी, या निवडणुकीपासून काही चेहरे मात्र अलिप्त दिसून आले. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज या प्रकृतीच्या कारणास्तव प्रचारात सहभाग घेऊ शकल्या नाहीत. तथापि, अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी आणि केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांना राज्यात प्रचारासाठी आमंत्रित करण्यात आले नाही. काँगे्रसच्या सोशल मीडियाच्या प्रमुख आणि अभिनेत्री रम्या निवडणूक प्रचारात दिसल्या नाहीत.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे अन्य काही नेते स्टार प्रचाराच्या यादीत समाविष्ट होते. पण, तेही प्रचारात दिसले नाहीत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८