शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

काँग्रेस आणि पाकिस्तानचे संगनमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 06:11 IST

पीयूष गोयल ; राम मंदिर उभारणीत कॉंग्रेसचा अडसर

मुंबई : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतात मोदींचे सरकार यावे, असे वक्तव्य केले आहे. काँग्रेस आणि पाकिस्तानची मिलीभगत असल्यामुळेच खान यांनी अशा प्रकारचे विधान केलेले आहे. पाकिस्तान मोदींना घाबरून आहे. पाकिस्तानला मोदींपासून धोका आहे, हे साऱ्या जगाला माहीत आहे. तरीही खान यांनी केलेले वक्तव्य म्हणजे काँग्रेसची खेळी असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी केला.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतात मोदी सरकार आल्यास चर्चा करता येईल, असे विधान केले होते. यावरून राजकीय आरोपप्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. या पार्श्वभूमीवर गोयल यांनी काँग्रेसला आरोपींच्या पिंजºयात उभे केले. खान यांचे वक्तव्य म्हणजे काँग्रेस आणि पाकिस्तानची खेळी आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी जवानांच्या कामावर, आमच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांचे राजकीय गुरू असलेले सॅम पित्रोदा हे दहशतवादासाठी पाकिस्तानला जबाबदार धरता येणार नसल्याचे विधान करतात. काँग्रेसने मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला उत्तर दिले नाही. मात्र आम्ही त्यांच्या घरात घुसून मारले त्यामुळे पाकिस्तान आज मोदींना घाबरत असल्याचेदेखील गोयल म्हणाले.

भाजपने आपल्या संकल्पपत्रात राम मंदिराची घोषणा केली. यावर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गोयल म्हणाले, आमच्यावर टीका करणाºया काँग्रेसला मुळात राम मंदिर व्हावे असे वाटत नाही. काँग्रेसचे नेते मंदिर उभारणीत कायदेशीर अडसर आणतात, असा आरोप करतानाच भाजप सरकारच राम मंदिर बांधेल, असा विश्वास व्यक्त केला. ही निवडणूक म्हणजे ५ वर्षे विरुद्ध ६५ वर्षे असा सामना आहे. एका इमानदार आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत बनवणाºया सरकारने पाच वर्षे पूर्ण केलीत. तसेच पाच वर्षांत आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या कामाचा रिपोर्ट दिला असून, आता आम्ही फायनल परीक्षेला उतरल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान