शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

काँग्रेस मेलेल्या माणसांवरूनही राजकारण करतोय; सुषमा स्वराज यांची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 17:14 IST

राज्यसभेत निवेदन देण्यासाठी गेलेल्या सुषमा स्वराज यांना काँग्रेसच्या विरोधाचा सामना करावा लागला.

नवी दिल्ली: इराकमध्ये असताना आयसिसने अपहरण केलेल्या 39 भारतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. मात्र, त्यानंतर लोकसभेत निवेदन देण्यासाठी गेलेल्या सुषमा स्वराज यांना काँग्रेसच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे सुषमा स्वराज चांगल्याच संतापल्या. काँग्रेस लोकांच्या मृत्यूचेही राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली. राज्यसभेत मी बोलत असताना प्रत्येकाने शांतपणे माझे म्हणणे ऐकून घेतले. लोकसभेतही असचे होईल, असे मला वाटत होते. परंतु, मी तेथे गेल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने घोषणा देऊन गोंधळ माजवायला सुरूवात केली. हा प्रकार खूपच दुर्देवी होता. काँग्रेसचे हे राजकारण अत्यंत खालच्या दर्जाचे आहे. राज्यसभेत मी बोलत असताना थोडाही गोंधळ कसा झाला नाही, हा प्रश्न काँग्रेस अध्यक्षांना पडला असावा. त्यामुळेच त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना लोकसभेत विरोध करण्याचे आदेश दिले. हे म्हणजे मेलेल्या व्यक्तींवरून राजकारण करण्याचा प्रकार आहे, अशी टीका सुषमा स्वराज यांनी केली. इराकमध्ये भारतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे, याची खातरजमा करण्यासाठी मी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी जातीने बोलले होते. मी त्यांच्याकडे पुरावे देण्यासाठी विनंती केली होती. एखादी व्यक्ती हरवली म्हणजे तिचा मृत्यू झाला, असा आमच्या सरकारचा कारभार नाही. यापूर्वी कोणीही परदेशात हरवलेल्या व्यक्तींविषयी अशाप्रकारे संसदेत स्पष्टीकरण दिले नव्हेत. मात्र, मी हे स्वत:चे कर्तव्य समजत असल्यामुळे त्याविषयी संसदेपुढे माहिती दिली. कोणत्याही व्यक्तींचे मृतदेह आमच्याच लोकांचे आहे, असे सांगून आम्ही ही फाईल बंद केली असती तर ते खूप मोठे पाप ठरले असते. मात्र, आम्ही या मृत व्यक्तींचे डीएनए तपासून त्या भारतीय व्यक्तीच असल्याची खातरजमा केल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली. 

तीन वर्षापूर्वी इसिस या दहशतवादी संघटनेने मोसुलचा ताबा घेतल्यानंतर सर्व भारतीयांचे अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. मोसुलमधून भारतीय मजुरांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा इसिसने त्यांचे अपहरण केलं होतं.  

काय म्हणाल्या सुषमा स्वराज ? 

हरजीत मसीह यांनी सांगितलेला प्रकार खोटा आहे. मोसुलमध्ये 39 भारतीय मारले गेले. एका केटररने सांगितले की, सर्वांना इसिसने टेक्सटाइल फॅक्टमध्ये घेऊन गेले होते. तेथे बांगलादेशी आणि भारतीय नागरींकाना वेगळं ठेवण्यात आलं. हरजीतला बांगलादेशचा अली म्हणून बाहेर काढल्याचे केटररने सांगितले. यापूर्वी संसदेत याविषयावर मी निवेदन दिले होते, त्यावेळी इराकचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आले होते. व्ही.के सिंह यांच्यासह अन्य आधिकारी इराकमध्ये बेपत्ता भारतीयांचा शोध घेत होते त्यावेळी तिथे 'डीप पेनिट्रेशन' मागितले होते. जमिनीमध्ये भारतीयांना गाढल्याची आमची शंका होती. सध्या भारतीयांना मारल्याचे पुरावे मिळाले आहे. डोंगर खोदून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यामध्ये लोकांचा सापळा मिळाला आहे. डीएनए टेस्टमध्ये सर्वात प्रथम संदीप नावाच्या भारतीयाचे नाव समोर आले. काल आणखी 38 भारतीयांचा डीएनए मॅच झाला आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्हीके सिंग यांची मी आभारी आहे. त्यांनी ध्येर्याने हे सर्व प्रकरण हाताळले. असे झाले अपहरण - इराकमध्ये अपहरण झालेल्या 38 भारतीयांमध्ये पंजाबमधील लोक आधिक आहेत. ते सर्व मोसुल आणि त्याच्या जवळील शहरामध्ये मजुरी करत होते.  2014मध्ये  इसिस या दहशतवादी संघटनेने मेहसुलचा ताबा घेतल्यानंतर सर्व भारतीयांचे अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. मोसुलमधून भारतीय मजुरांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा इसिसने त्यांना एका तुरुंगात ठेवलं होते. त्यावेळी तिथे बांगलादेशी आणि भारतीय नागरिकांना वेगळं ठेवण्यात आलं होतं.  यावेळी इसिसने त्यांच्याकडून मजुरी करुन घेतली होती.  

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजParliamentसंसद