शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हिंसाचारावरून गोंधळ; सभागृहांचे कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 06:24 IST

दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : दिल्लीच्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी उमटले. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. अर्थसंकल्पी अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू झाले तेच या विषयावरील गोंधळामुळे.या गोंधळामुळे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा घोषणा देतच विरोधी सदस्य सभागृहात आले. दिल्लीच्या हिंसाचाराचा पंतप्रधान मोदी यांनी जबाब द्यावा आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी होती. त्यांच्या हातात या मागण्यांची पोस्टर्स आणि बॅनर्सही होते. त्यांच्या घोषणा सुरू असतानाच ओम बिर्ला यांनी कामकाज चालविण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे विरोधक अधिक संतापले. त्यातच भाजपचे संजय जयस्वाल यांनी सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. त्यामुळे संतप्त विरोधक जागेवर उभे राहून पोस्टर्स आणि बॅनर्स फडकावू लागले. त्यांच्या घोषणा सुरू असताना भाजपचे रमेश विधुडी व अन्य सदस्यांनी विरोधकांच्या हातातील बॅनर्स खेचण्यास सुरुवात केली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात धक्काबुक्की सुरू झाली. त्याचे पर्यावसन मारामारीत होईल, असे दिसताच घाईघाईत ओम बिर्ला यांनी संपूर्ण दिवसासाठी लोकसभेचे कामकाज तहकूब नेले.आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे पाहून विरोधकांनी कागद फाडून अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने फेकले. त्यात काँग्रेसचे हरिदास राम्या, गौरव गोगोई, सपाचे शफिक उर रहमान, बसपाचे दानिश अली आणि तृणमूलच्या महुआ मोईत्रा पुढे होते. हा गोंधळ एवढा वाढत गेला की, काँग्रेसतर्फे अधीर रंजन चौधरी आणि भाजपतर्फे स्मृती इराणी व रविशंकर प्रसाद यांनी त्यांना एकमेकांपासून दूर केले.त्याचवेळी काँग्रेसच्या हरिदास राम्या यांच्या हातातील बॅनर जबरदस्तीने काढून घेण्यासाठी भाजपचे काही सदस्य पुढे सरसावले. महिला सदस्याच्या जवळ पुरुष सदस्य गेल्याने वातावरण आणखी बिघडले; पण कामकाज आधीच तहकूब केले गेल्याने गोंधळ शमला. भाजप सदस्यांच्या या वागण्याबद्दल काँग्रेस व तृणमूलच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी दिल्लीतील हिंसाचारावर सभागृहात पंतप्रधानांकडून उत्तराची आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक जोरात लावून धरण्याचे ठरविले आहे.राज्यसभेतही विरोधी सदस्यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली होती. सध्याच्या वातावरणात सर्व सदस्यांनी दिल्लीत शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून सभापती व्यंकय्या नायडू यांनी चर्चेस परवानगी नाकारली.त्यामुळे गोंधळ सुरू होताच त्यांनी सभागृहाचे कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केले. त्याआधी विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्लीत हिंसाचार सुरू असताना सरकार निष्क्रिय होते, असा आरोप केला.>लोकसभाध्यक्षांकडे तक्रारकाँग्रेसच्या सदस्य हरिदास राम्या यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे भाजपच्या जसकौर मीना यांनी आपणास सभागृहात मारहाण केल्याची लेखी तक्रार केली आहे.श्रीमती मीना यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली आहे. आपण दलित व महिला असल्याने आपल्याला सभागृहात सतत वाईट वागणूक दिली जात असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.