शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

‘एपी’मुळे गोंधळ; विद्यार्थी गेला अरुणाचलऐवजी आंध्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 04:41 IST

आद्याक्षरांबद्दलची डोक्यात असलेली पूर्वीची माहिती व निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला ९३० किलोमीटरचा प्रवास करून मनस्ताप सोसावा लागला. अर्थात त्याला शिक्षणसंस्थेने घातलेला गोंधळही कारणीभूत आहे.

नवी दिल्ली : आद्याक्षरांबद्दलची डोक्यात असलेली पूर्वीची माहिती व निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला ९३० किलोमीटरचा प्रवास करून मनस्ताप सोसावा लागला. अर्थात त्याला शिक्षणसंस्थेने घातलेला गोंधळही कारणीभूत आहे.दानियाल खान या विद्यार्थ्याला नॅशनल इन्स्टिस्ट्यूट आॅफ इंडियात (एनआयटी) प्रवेशाची संधी मिळाल्याचे पत्र मिळाल्यावर तो आणि त्याचे कुटुंबीय हरखून गेले. त्याचे वडील आणि त्याच्या काही मित्रांनी एपीमधील एनआयटीच्या परिसरात रस्त्याने प्रवास करून जायचे ठरवले. महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यांचा प्रवास करून आंध्र प्रदेशात पोहोचण्यास १६ तास लागले. पण तेथे पोहोचल्यावर त्यांना धक्काच बसला. दानियालला ज्या एनआयटीने प्रवेश मंजूर केला होता ती एनआयटी आंध्र प्रदेशातील नव्हतीच. प्रवेशपत्रावर जे ‘एपी’ असा जो उल्लेख होता, तो आंध्र प्रदेशशी नव्हे, तर अरुणाचल प्रदेशशी संबंधित होता. दानियालने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यात तो म्हणतो की, एवढा प्रवास करून गेल्यानंतर समन्वयकांनी तुमचा गैरसमज झाल्याचे सांगितले. मला आलेल्या पत्रावर मला ‘एनआयटी-एपी’मध्ये प्रवेश मंजूर झाल्याचे म्हटले होते. आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशचा उल्लेख ‘एपी’ असा केला जातो. मी आंध्र प्रदेशचा ९३० किलोमीटरचा प्रवास केला. आमच्यापैकी कोणालाही एपी म्हणजे ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश असेल, असे वाटलेही नव्हते.दानियालने गुगलवर एनआयटी-एपी असे सर्च केल्यावर जी माहिती मिळाली ती एनआयटी आंध्र प्रदेशची होती. त्याला आलेल्या पत्रातही अरुणाचलचा उल्लेख नव्हता. विद्यार्थी मध्य प्रदेशचा आहे. मध्य प्रदेश ते अरुणाचल हे अंतर २,५७५ किलोमीटर असून, तो सलग प्रवास ५१ तासांचा आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी