शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

‘एपी’मुळे गोंधळ; विद्यार्थी गेला अरुणाचलऐवजी आंध्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 04:41 IST

आद्याक्षरांबद्दलची डोक्यात असलेली पूर्वीची माहिती व निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला ९३० किलोमीटरचा प्रवास करून मनस्ताप सोसावा लागला. अर्थात त्याला शिक्षणसंस्थेने घातलेला गोंधळही कारणीभूत आहे.

नवी दिल्ली : आद्याक्षरांबद्दलची डोक्यात असलेली पूर्वीची माहिती व निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला ९३० किलोमीटरचा प्रवास करून मनस्ताप सोसावा लागला. अर्थात त्याला शिक्षणसंस्थेने घातलेला गोंधळही कारणीभूत आहे.दानियाल खान या विद्यार्थ्याला नॅशनल इन्स्टिस्ट्यूट आॅफ इंडियात (एनआयटी) प्रवेशाची संधी मिळाल्याचे पत्र मिळाल्यावर तो आणि त्याचे कुटुंबीय हरखून गेले. त्याचे वडील आणि त्याच्या काही मित्रांनी एपीमधील एनआयटीच्या परिसरात रस्त्याने प्रवास करून जायचे ठरवले. महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यांचा प्रवास करून आंध्र प्रदेशात पोहोचण्यास १६ तास लागले. पण तेथे पोहोचल्यावर त्यांना धक्काच बसला. दानियालला ज्या एनआयटीने प्रवेश मंजूर केला होता ती एनआयटी आंध्र प्रदेशातील नव्हतीच. प्रवेशपत्रावर जे ‘एपी’ असा जो उल्लेख होता, तो आंध्र प्रदेशशी नव्हे, तर अरुणाचल प्रदेशशी संबंधित होता. दानियालने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यात तो म्हणतो की, एवढा प्रवास करून गेल्यानंतर समन्वयकांनी तुमचा गैरसमज झाल्याचे सांगितले. मला आलेल्या पत्रावर मला ‘एनआयटी-एपी’मध्ये प्रवेश मंजूर झाल्याचे म्हटले होते. आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशचा उल्लेख ‘एपी’ असा केला जातो. मी आंध्र प्रदेशचा ९३० किलोमीटरचा प्रवास केला. आमच्यापैकी कोणालाही एपी म्हणजे ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश असेल, असे वाटलेही नव्हते.दानियालने गुगलवर एनआयटी-एपी असे सर्च केल्यावर जी माहिती मिळाली ती एनआयटी आंध्र प्रदेशची होती. त्याला आलेल्या पत्रातही अरुणाचलचा उल्लेख नव्हता. विद्यार्थी मध्य प्रदेशचा आहे. मध्य प्रदेश ते अरुणाचल हे अंतर २,५७५ किलोमीटर असून, तो सलग प्रवास ५१ तासांचा आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी