शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘एपी’मुळे गोंधळ; विद्यार्थी गेला अरुणाचलऐवजी आंध्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 04:41 IST

आद्याक्षरांबद्दलची डोक्यात असलेली पूर्वीची माहिती व निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला ९३० किलोमीटरचा प्रवास करून मनस्ताप सोसावा लागला. अर्थात त्याला शिक्षणसंस्थेने घातलेला गोंधळही कारणीभूत आहे.

नवी दिल्ली : आद्याक्षरांबद्दलची डोक्यात असलेली पूर्वीची माहिती व निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थ्याला ९३० किलोमीटरचा प्रवास करून मनस्ताप सोसावा लागला. अर्थात त्याला शिक्षणसंस्थेने घातलेला गोंधळही कारणीभूत आहे.दानियाल खान या विद्यार्थ्याला नॅशनल इन्स्टिस्ट्यूट आॅफ इंडियात (एनआयटी) प्रवेशाची संधी मिळाल्याचे पत्र मिळाल्यावर तो आणि त्याचे कुटुंबीय हरखून गेले. त्याचे वडील आणि त्याच्या काही मित्रांनी एपीमधील एनआयटीच्या परिसरात रस्त्याने प्रवास करून जायचे ठरवले. महाराष्ट्र आणि तेलंगण राज्यांचा प्रवास करून आंध्र प्रदेशात पोहोचण्यास १६ तास लागले. पण तेथे पोहोचल्यावर त्यांना धक्काच बसला. दानियालला ज्या एनआयटीने प्रवेश मंजूर केला होता ती एनआयटी आंध्र प्रदेशातील नव्हतीच. प्रवेशपत्रावर जे ‘एपी’ असा जो उल्लेख होता, तो आंध्र प्रदेशशी नव्हे, तर अरुणाचल प्रदेशशी संबंधित होता. दानियालने हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यात तो म्हणतो की, एवढा प्रवास करून गेल्यानंतर समन्वयकांनी तुमचा गैरसमज झाल्याचे सांगितले. मला आलेल्या पत्रावर मला ‘एनआयटी-एपी’मध्ये प्रवेश मंजूर झाल्याचे म्हटले होते. आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशचा उल्लेख ‘एपी’ असा केला जातो. मी आंध्र प्रदेशचा ९३० किलोमीटरचा प्रवास केला. आमच्यापैकी कोणालाही एपी म्हणजे ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश असेल, असे वाटलेही नव्हते.दानियालने गुगलवर एनआयटी-एपी असे सर्च केल्यावर जी माहिती मिळाली ती एनआयटी आंध्र प्रदेशची होती. त्याला आलेल्या पत्रातही अरुणाचलचा उल्लेख नव्हता. विद्यार्थी मध्य प्रदेशचा आहे. मध्य प्रदेश ते अरुणाचल हे अंतर २,५७५ किलोमीटर असून, तो सलग प्रवास ५१ तासांचा आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी