शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

फरार आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर येणार जप्ती; केंद्र सरकारचा वटहुकूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 03:26 IST

फौजदारी खटल्यांच्या तपासात अडथळे येतात, न्यायालयांचा वेळ वाया जातो व मुख्य म्हणजे कायदेशीर प्रक्रियेस सुरुंग लावला जातो

नवी दिल्ली : बँकांची कर्जे घेऊन ती बुडविणे यासह अन्य मोठे आर्थिक गुन्हे करून देशातून परागंदा होणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांच्या मुसक्या अधिक कसून आवळून त्यांना देशात परतणे भाग पडावे यासाठी अशा गुन्हेगारांच्या देशातील मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार केंद्र सरकाला देण्यासाठी वटहुकूम काढण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी  मंजुरी दिली होती. लगेच १२ मार्च रोजी ते विधेयक लोकसभेत मांडलेही गेले. परंतु विरोधकांच्या गोंधळात संपूर्ण अधिवेशन वाया गेल्याने ते विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते. आता तोच कायदा वटहुकूम काढून लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वीकृतीनंतर तो लगेच अंमलात येईल.हा वटहुकूम कोणकोणत्या स्वरूपाच्या आर्थिक गुन्ह्यांना लागू होईल त्याची यादी स्वतंत्र परिशिष्टात दिलेली आहे. त्यानुसार या परिशिष्टातील गुन्ह्यासाठी ज्याच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरन्ट जारी केले आहे व जी व्यक्ती देशाबाहेर पलायन करून किंवा मायदेशी परत येण्यास नकार देऊन खटल्याला सामोरे जाणे टाळत आहे, अशी व्यक्ती ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ मानली जाईल.अशा कारवाईसाठी संबंधित व्यक्तीला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून जाहीर करण्याचा अधिकार मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याखालील विशेष न्यायालयास असेल. मात्र न्यायालयांवर अनावश्यक ताण पडू नये यासाठी सरसकट सर्वच आर्थिक गुन्हेगारांऐवजी फक्त मोठ्या गुन्हेगारांना हा वटहुकूम लागू होईल. यासाठी आर्थिक गुन्ह्याची किमान मर्यादा १०० कोटी रुपये ठरविण्यात आली आहे.पळपुट्या आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तांवर टांच आणणे किंवा त्या जप्त करण्याचा अधिकार सरकारला देण्याखेरीज या वटहुकूमाने अशा गुन्हेगारांचा त्या मालमत्तांविषयी कोणताही दिवाणी दावा दाखल करण्याचा अधिकारही संपुष्टात येईल. जप्त केलेल्या मालमत्तांची देखभाल व विल्हेवाट यासाठी प्रशासकही त्यामुळे नेमता येईल.मात्र संबंधित व्यक्तीला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ जाहीर करण्याची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी ती व्यक्ती स्वत:हून भारतात परत आली तर तिच्याविरुद्धची ही प्रस्तावित कारवाई आपोआप संपुष्टात येईल.अशा व्यक्तीला भारतात किंवा परदेशात समन्स बजावणे, उत्तरासाठी वाजवी मुदत देणे, वकिलाकरवी बाजू मांडणे व होणाऱ्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणे हे सर्व कायदेशीर अधिकारही असतील.

१५० सहेतुक थकबाकीदारांचे पासपोर्ट ‘पीएनबी’कडून जप्त

बँकांना चुना लावून अनेकांनी काढला पळविजय मल्ल्या, निरव मोदी व मेहुल चोकसी यांच्यासह अनेक बड्या व्यावसायिकांनी बँकांना हजारो कोटींना चुना लावून देशातून पळ काढला. यामुळे फौजदारी खटल्यांच्या तपासात अडथळे येतात, न्यायालयांचा वेळ वाया जातो व मुख्य म्हणजे कायदेशीर प्रक्रियेस सुरुंग लावला जातो, त्यामुळे या विशेष व अधिक कडक तरतुदी करण्याची गरज भासल्याने हा वटहुकूम काढला जात असल्याचे सरकारने म्हटले आहे. यामुळे अशा गुन्हेगारांच्या मुसक्या अधिक कसून आवळल्या जातील व त्यांना देशात परत येऊन कायद्याला सामोरे जाणे भाग पडेल. शिवाय यामुळे अशा गुन्हेगारांकडील थकीत येणी वसूल करण्यास बँका व अन्य वित्तीय संस्थांना बळ मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असा सरकारला विश्वास वाटतो.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा