शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

गंगा नदीतील मृतदेहांवरील कविता रचणे म्हणजे निव्वळ ‘अराजक’, गुजरात साहित्य अकादमीच्या संपादकीयात कवयित्रीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 06:40 IST

Ganga river : ज्या लोकांनी त्या कवितेवर चर्चा केली किंवा ती इकडे तिकडे पाठवली त्यांचे वर्णन संपादकीयात ‘साहित्यिक नक्सल्स’ असे करण्यात आले आहे.

अहमदाबाद : कोरोना विषाणूची बाधा होऊन मरण पावल्याचा संशय असलेले मृतदेह गंगा नदीत वाहत आल्यानंतर त्या विषयावर गुजराती कवयित्री पारूल खाखर यांनी लिहिलेल्या कवितेवर गुजरात साहित्य अकादमीने टीका केली आहे. ही कविता म्हणजे ‘अराजक’ पसरवणे होय, अशा शब्दांत अकादमीचे अधिकृत प्रकाशन ‘शब्दसृष्टी’ने जून महिन्याच्या आवृत्तीच्या संपादकीयात म्हटले. हे मृतदेह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीत वाहत आल्याचे आढळले होते. ज्या लोकांनी त्या कवितेवर चर्चा केली किंवा ती इकडे तिकडे पाठवली त्यांचे वर्णन संपादकीयात ‘साहित्यिक नक्सल्स’ असे करण्यात आले आहे.

कवितेचे वर्णन संपादकीयात ‘मनात खळबळ निर्माण झाली असताना निरर्थक अस्वस्थता व्यक्त करण्यात आली आहे’ असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारविरोधी आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रवादी विचारसरणींच्या विरोधात असलेल्या शक्तींनी शब्दांचा गैरवापर केला आहे. तीच कविता अशा शक्तींनी टीका करण्यासाठी खांदा म्हणून वापरली. या शक्तींनी कट रचायला सुरूवात केली. या शक्तींची बांधिलकी ही भारताशी नाही तर इतर कोणाशी म्हणजे ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही ते डावे, तथाकथित उदारमतवादी यांच्याशी आहे.

या लोकांना भारतात ताबडतोब गोंधळ पसरावा, असे वाटते आणि ते अराजक निर्माण करतात. हे लोक सगळ्या आघाड्यांवर सक्रिय आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांनी गलिच्छ हेतूंनी साहित्यात उडी घेतली आहे. साहित्यातील या नक्षलींचा हेतू हा या कवितेशी जे लोक स्वत:चे दु:ख आणि आनंद जोडतात त्या काही लोकांवर प्रभाव टाकण्याचा आहे.” गुजरातीत संपादकीयाने ‘लिटररी नक्सल्स’ असा शब्दप्रयोग केला आहे.

कविता अनेक भाषांत अनुवादितअकादमीचे अध्यक्ष विष्णू पंड्या यांनी संपादकीय लिहिल्याला दुजोरा दिला. त्यात ‘शववाहिनी गंगा’ असा विशिष्ट उद्देशाने उल्लेख नाही पण तसा हेतू मला वाटला, असेही पंड्या म्हणाले. या कवितेची बरीच प्रशंसा झाली आणि तिचा अनेक भाषांत अनुवाद करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या