शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गंगा नदीतील मृतदेहांवरील कविता रचणे म्हणजे निव्वळ ‘अराजक’, गुजरात साहित्य अकादमीच्या संपादकीयात कवयित्रीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 06:40 IST

Ganga river : ज्या लोकांनी त्या कवितेवर चर्चा केली किंवा ती इकडे तिकडे पाठवली त्यांचे वर्णन संपादकीयात ‘साहित्यिक नक्सल्स’ असे करण्यात आले आहे.

अहमदाबाद : कोरोना विषाणूची बाधा होऊन मरण पावल्याचा संशय असलेले मृतदेह गंगा नदीत वाहत आल्यानंतर त्या विषयावर गुजराती कवयित्री पारूल खाखर यांनी लिहिलेल्या कवितेवर गुजरात साहित्य अकादमीने टीका केली आहे. ही कविता म्हणजे ‘अराजक’ पसरवणे होय, अशा शब्दांत अकादमीचे अधिकृत प्रकाशन ‘शब्दसृष्टी’ने जून महिन्याच्या आवृत्तीच्या संपादकीयात म्हटले. हे मृतदेह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीत वाहत आल्याचे आढळले होते. ज्या लोकांनी त्या कवितेवर चर्चा केली किंवा ती इकडे तिकडे पाठवली त्यांचे वर्णन संपादकीयात ‘साहित्यिक नक्सल्स’ असे करण्यात आले आहे.

कवितेचे वर्णन संपादकीयात ‘मनात खळबळ निर्माण झाली असताना निरर्थक अस्वस्थता व्यक्त करण्यात आली आहे’ असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारविरोधी आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रवादी विचारसरणींच्या विरोधात असलेल्या शक्तींनी शब्दांचा गैरवापर केला आहे. तीच कविता अशा शक्तींनी टीका करण्यासाठी खांदा म्हणून वापरली. या शक्तींनी कट रचायला सुरूवात केली. या शक्तींची बांधिलकी ही भारताशी नाही तर इतर कोणाशी म्हणजे ज्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही ते डावे, तथाकथित उदारमतवादी यांच्याशी आहे.

या लोकांना भारतात ताबडतोब गोंधळ पसरावा, असे वाटते आणि ते अराजक निर्माण करतात. हे लोक सगळ्या आघाड्यांवर सक्रिय आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांनी गलिच्छ हेतूंनी साहित्यात उडी घेतली आहे. साहित्यातील या नक्षलींचा हेतू हा या कवितेशी जे लोक स्वत:चे दु:ख आणि आनंद जोडतात त्या काही लोकांवर प्रभाव टाकण्याचा आहे.” गुजरातीत संपादकीयाने ‘लिटररी नक्सल्स’ असा शब्दप्रयोग केला आहे.

कविता अनेक भाषांत अनुवादितअकादमीचे अध्यक्ष विष्णू पंड्या यांनी संपादकीय लिहिल्याला दुजोरा दिला. त्यात ‘शववाहिनी गंगा’ असा विशिष्ट उद्देशाने उल्लेख नाही पण तसा हेतू मला वाटला, असेही पंड्या म्हणाले. या कवितेची बरीच प्रशंसा झाली आणि तिचा अनेक भाषांत अनुवाद करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या