शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

India China FaceOff: चीनला अद्दल घडविण्याचे सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य; प्रसंगी सीमेवर गोळीबाराचीही मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 04:00 IST

दोन्ही देशांची अनौपचारिक सीमा मानली जाणा-या ३,५०० किमी लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून कोणतेही दुस्साहस केल्यास त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सैन्यदलांना देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवरील गवलान खोऱ्यात सीमेवर गस्त घालणाºया २० भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी मारहाण करून ठार मारल्यानंतर यापुढे चीनने सीमेवर कोणतीही आगळिक केल्यास जराही गय न करण्याचा खंबीर पवित्रा भारताने घेतला आहे. यासाठी दोन्ही देशांची अनौपचारिक सीमा मानली जाणा-या ३,५०० किमी लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून कोणतेही दुस्साहस केल्यास त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सैन्यदलांना देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात तणातणी झाल्यास बंदुकांचा वापर न करण्याचे बंधन यापुढे न पाळण्याचे भारकताने ठरविले असून वेळ पडल्यास सीमेवरील सैन्याला गोळीबार करण्याची मुभाही देण्यात आली आहे.संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तीन दिवसांच्या रशिया दौºयावर रवाना होण्याआधी रविवारी वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन सीमेवरील ताज्या स्थितीचा आठवडाभरात दुसºयादा आढावा घेतला. या बैठकीत वरीलप्रमाणे कठोर धोरण ठरल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या बैठकीत तिन्ही सैन्यदलांचे संयुक्त प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, नौदल प्रमुख अ‍ॅडनिरल करमबीर सिग व हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के. एस. भदुरिया यांनी भाग घेतला. सूत्रांनुसार केवळ भूसीमेवरच नव्हे तर हवाई हद्दीत व सामरिकदृष्ट्या महत्वाच्या सागरी मार्गांवर चीनच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना संर७णमंत्र्यांनी सैन्यदलांना दिल्या. सीमारक्षणाच्या बाबतीत भारताने खंबीर भूमिका घेतली असल्याने चीनच्या कोणत्याही दुस्साहसाला करारी प्रत्यत्तर देण्याचे सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य असेल, असेही राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. भारत व चीनमध्ये सीमेसंबंधी सन १९९६ व २००५ मध्ये झालेल्या करारांनुसार सीमेवर सैन्यांमध्ये तणातणीची वेळ आल्यास बंदुकांचा वापर न करण्याचे ठरले आहे. मात्र एका वरिष्ठ लष्करी अधिकाºयाने सांगितले की, आता दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असेल. प्राप्त परिस्थिती हाताळण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे स्वातंत्र्य प्रत्यक्ष सीमेवर तैनात असलेल्या लष्करी कमांडरना देण्यात आले आहे.गवलान खोºयातील घटनेनंतर भारताने सैन्याच्या जादा तुकड्या सीमेवर तैनात केल्या असून हवाईदलानेही गेल्या पाच दिवसांत लेह व श्रीमगर खेरीज सीमेवरील महत्वाच्या तळांवर सुखोई ३० एमकेआय, जग्वार व मिराज २००० या प्रबळ लढाऊ विमानांसह अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरही रवाना केली आहेत.>शस्त्रे, दारुगोळा खरेदीचे सैन्यदलांना विशेष अधिकारसीमेवर मर्यादित अथवा पूर्ण क्षमतेच्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड देण्यासाठी अत्यंत निकडीची अशी शस्त्रे व दारुगोळा तातडीने खरेदी करण्याचे विशेष वित्तीय अधिकारही सरकारने तिन्ही सैन्यदलांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यानुसार तिन्ही सैन्यदलांचे उपप्रमुख प्रत्येक वेळी 500 कोटी रुपयांपर्यंतची तातडीची खरेदी सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय करू शकतील. उरी येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरचे ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतरही सैन्यदलांना असे अधिकार देण्यात आले होते.

टॅग्स :chinaचीन