शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: चीनला अद्दल घडविण्याचे सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य; प्रसंगी सीमेवर गोळीबाराचीही मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 04:00 IST

दोन्ही देशांची अनौपचारिक सीमा मानली जाणा-या ३,५०० किमी लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून कोणतेही दुस्साहस केल्यास त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सैन्यदलांना देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाख सीमेवरील गवलान खोऱ्यात सीमेवर गस्त घालणाºया २० भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी मारहाण करून ठार मारल्यानंतर यापुढे चीनने सीमेवर कोणतीही आगळिक केल्यास जराही गय न करण्याचा खंबीर पवित्रा भारताने घेतला आहे. यासाठी दोन्ही देशांची अनौपचारिक सीमा मानली जाणा-या ३,५०० किमी लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून कोणतेही दुस्साहस केल्यास त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सैन्यदलांना देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यात तणातणी झाल्यास बंदुकांचा वापर न करण्याचे बंधन यापुढे न पाळण्याचे भारकताने ठरविले असून वेळ पडल्यास सीमेवरील सैन्याला गोळीबार करण्याची मुभाही देण्यात आली आहे.संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तीन दिवसांच्या रशिया दौºयावर रवाना होण्याआधी रविवारी वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन सीमेवरील ताज्या स्थितीचा आठवडाभरात दुसºयादा आढावा घेतला. या बैठकीत वरीलप्रमाणे कठोर धोरण ठरल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या बैठकीत तिन्ही सैन्यदलांचे संयुक्त प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, नौदल प्रमुख अ‍ॅडनिरल करमबीर सिग व हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के. एस. भदुरिया यांनी भाग घेतला. सूत्रांनुसार केवळ भूसीमेवरच नव्हे तर हवाई हद्दीत व सामरिकदृष्ट्या महत्वाच्या सागरी मार्गांवर चीनच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना संर७णमंत्र्यांनी सैन्यदलांना दिल्या. सीमारक्षणाच्या बाबतीत भारताने खंबीर भूमिका घेतली असल्याने चीनच्या कोणत्याही दुस्साहसाला करारी प्रत्यत्तर देण्याचे सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य असेल, असेही राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. भारत व चीनमध्ये सीमेसंबंधी सन १९९६ व २००५ मध्ये झालेल्या करारांनुसार सीमेवर सैन्यांमध्ये तणातणीची वेळ आल्यास बंदुकांचा वापर न करण्याचे ठरले आहे. मात्र एका वरिष्ठ लष्करी अधिकाºयाने सांगितले की, आता दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असेल. प्राप्त परिस्थिती हाताळण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे स्वातंत्र्य प्रत्यक्ष सीमेवर तैनात असलेल्या लष्करी कमांडरना देण्यात आले आहे.गवलान खोºयातील घटनेनंतर भारताने सैन्याच्या जादा तुकड्या सीमेवर तैनात केल्या असून हवाईदलानेही गेल्या पाच दिवसांत लेह व श्रीमगर खेरीज सीमेवरील महत्वाच्या तळांवर सुखोई ३० एमकेआय, जग्वार व मिराज २००० या प्रबळ लढाऊ विमानांसह अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरही रवाना केली आहेत.>शस्त्रे, दारुगोळा खरेदीचे सैन्यदलांना विशेष अधिकारसीमेवर मर्यादित अथवा पूर्ण क्षमतेच्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली तर त्याला तोंड देण्यासाठी अत्यंत निकडीची अशी शस्त्रे व दारुगोळा तातडीने खरेदी करण्याचे विशेष वित्तीय अधिकारही सरकारने तिन्ही सैन्यदलांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यानुसार तिन्ही सैन्यदलांचे उपप्रमुख प्रत्येक वेळी 500 कोटी रुपयांपर्यंतची तातडीची खरेदी सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय करू शकतील. उरी येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरचे ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतरही सैन्यदलांना असे अधिकार देण्यात आले होते.

टॅग्स :chinaचीन