शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 06:29 IST

सीमाभागात सुरक्षा वाढवण्यात आली असून, याचा सर्वांत जास्त फटका पंजाबला बसू शकतो. ५३० किमीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून ४५,००० एकर शेती आहे.

अमृतसर/फिरोजपूर : भारत-पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांनी दोन दिवसांत पीक काढणी पूर्ण करावी व शेत रिकामे करावे, असे निर्देश सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दिले आहेत. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढलेला असताना बीएसएफने हे निर्देश दिले आहेत, हे विशेष.

सीमाभागात सुरक्षा वाढवण्यात आली असून, याचा सर्वांत जास्त फटका पंजाबला बसू शकतो. ५३० किमीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून ४५,००० एकर शेती आहे. अमृतसर, तरणतारण, फिरोजपूर आणि फाल्जिका जिल्ह्यांमध्ये याबाबत घोषणा करून शेतकऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. भांगला या सीमावर्ती भागातील शेतकरी राजबीर सिंग भांगला यांनी सांगितले की, दोनच दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी बीएसएफने सांगितले आहे. वर्षभरासाठी जनावरांना चारा महत्त्वाचा असून, शांतता होताच आम्हाला तेथे काम करण्याची परवानगी दिली पाहिजे.

राष्ट्रीय सुरक्षा सर्वतोपरी

बीएसएफच्या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, दोन्ही देशांतील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे, हे खरे आहे.

आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या जाणतो.

परंतु, राष्ट्रीय सुरक्षा सर्वतोपरी आहे, असे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शेतकऱ्यांनी भविष्यातील कोणतीही असुविधा टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्याने केले.

नेमकी कारणे कोणती?

शेतकऱ्यांना शेत लवकर रिकामे करण्यास सांगण्यामागे विविध कारणे आहेत, असे सुरक्षा दलांनी सांगितले.

उभे असलेले पीक सीमेवर गस्त घालताना शत्रू भागाची टेहळणी करण्यात अडथळा ठरू शकते.

घुसखोर याचा गैरफायदा घेऊ शकतात.

शेत रिकामे झाल्यास बीएसएफला या भागावर नजर ठेवण्यास सोपे जाईल.

यंत्रसामग्रीचा पुरवठा प्रशासनाकडून करावा

लवकर पीक काढणी करण्यासाठी प्रशासनाने जास्तीच्या यंत्रसामग्रीचा पुरवठा करावा, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे. लखविंदर सिंग यांनी सांगितले की, प्रशासनाने अशावेळी पुढे यावे व लवकर शेत रिकामे करण्यास मदत करावी.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दल