शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 06:29 IST

सीमाभागात सुरक्षा वाढवण्यात आली असून, याचा सर्वांत जास्त फटका पंजाबला बसू शकतो. ५३० किमीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून ४५,००० एकर शेती आहे.

अमृतसर/फिरोजपूर : भारत-पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांनी दोन दिवसांत पीक काढणी पूर्ण करावी व शेत रिकामे करावे, असे निर्देश सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दिले आहेत. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढलेला असताना बीएसएफने हे निर्देश दिले आहेत, हे विशेष.

सीमाभागात सुरक्षा वाढवण्यात आली असून, याचा सर्वांत जास्त फटका पंजाबला बसू शकतो. ५३० किमीच्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून ४५,००० एकर शेती आहे. अमृतसर, तरणतारण, फिरोजपूर आणि फाल्जिका जिल्ह्यांमध्ये याबाबत घोषणा करून शेतकऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. भांगला या सीमावर्ती भागातील शेतकरी राजबीर सिंग भांगला यांनी सांगितले की, दोनच दिवसांत काम पूर्ण करण्यासाठी बीएसएफने सांगितले आहे. वर्षभरासाठी जनावरांना चारा महत्त्वाचा असून, शांतता होताच आम्हाला तेथे काम करण्याची परवानगी दिली पाहिजे.

राष्ट्रीय सुरक्षा सर्वतोपरी

बीएसएफच्या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, दोन्ही देशांतील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे, हे खरे आहे.

आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या जाणतो.

परंतु, राष्ट्रीय सुरक्षा सर्वतोपरी आहे, असे बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शेतकऱ्यांनी भविष्यातील कोणतीही असुविधा टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्याने केले.

नेमकी कारणे कोणती?

शेतकऱ्यांना शेत लवकर रिकामे करण्यास सांगण्यामागे विविध कारणे आहेत, असे सुरक्षा दलांनी सांगितले.

उभे असलेले पीक सीमेवर गस्त घालताना शत्रू भागाची टेहळणी करण्यात अडथळा ठरू शकते.

घुसखोर याचा गैरफायदा घेऊ शकतात.

शेत रिकामे झाल्यास बीएसएफला या भागावर नजर ठेवण्यास सोपे जाईल.

यंत्रसामग्रीचा पुरवठा प्रशासनाकडून करावा

लवकर पीक काढणी करण्यासाठी प्रशासनाने जास्तीच्या यंत्रसामग्रीचा पुरवठा करावा, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे. लखविंदर सिंग यांनी सांगितले की, प्रशासनाने अशावेळी पुढे यावे व लवकर शेत रिकामे करण्यास मदत करावी.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दल