शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

जातनिहाय जनगणना १५ मार्चपूर्वी पूर्ण करा- केंद्र

By admin | Updated: February 11, 2015 23:40 IST

जनगणना पूर्ण करण्यास होत असलेल्या अकारण विलंबाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने राज्यांना १५ मार्चपूर्वी जातनिहाय जनगणना

नवी दिल्ली : जनगणना पूर्ण करण्यास होत असलेल्या अकारण विलंबाची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने राज्यांना १५ मार्चपूर्वी जातनिहाय जनगणना पूर्ण करण्याचा आदेश बुधवारी दिला. उपरोक्त मुदतीत ही प्रक्रिया पार न पाडल्यास ग्रामीण भागात घरे बांधणी तसेच कल्याण निवृत्ती योजनांना दिले जाणारे अर्थसाहाय्य थांबविण्याचा कडक इशाराही दिला आहे.पुढील महिन्यात सामाजिक-आर्थिक आणि जातनिहाय जनगणना (एसईसीसी)पूर्ण करण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. २०१५-१६ पासून पुढे एसईसीसी डाटा इंदिरा आवास योजनेच्या (आयएवाय)लाभार्थ्यांच्या निवडीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. ज्या राज्यांना सदर डाटाच्या आधारे लाभार्र्थींची निवड करणे शक्य होणार नाही, अशांना राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमांतर्गत (एनएसएपी)आर्थिक मदत दिली जाणार नाही, असे ग्रामीण विकास मंत्रालयाने स्पष्ट केले.योजनेला विलंबराष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची (एनएफएसए) अंमलबजावणी न होण्याचे मुख्य कारण अनेक राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी एसईसीसी प्रक्रिया(जातनिहाय जनगणना)पूर्ण न करणे हेच असल्याकडे पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज(पीयुसीएल)या स्वयंसेवी संघटनेने एका जनहित याचिकेद्वारे लक्ष वेधले होते. जून २०११पासून देशभरात दारोदार जाऊन जातनिहाय तसेच आर्थिक- सामाजिक घटकांचा समावेश करीत माहिती गोळा केली जात आहे. राज्यांनी ही प्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण न केल्यास इंदिरा आवास योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अंपगत्व निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना आणि अन्नपूर्णा या योजनांच्या लाभार्थ्यांना फटका बसेल. (वृत्तसंस्था)