शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भरपाई हा कोरोना मृतांच्या नातेवाइकांचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 07:35 IST

उच्च न्यायालय : पोस्टाद्वारे व प्रत्यक्षात येणारे अर्जही स्वीकारण्याची मागणी

ठळक मुद्देभरपाईसाठी दावा करणारे बहुतांश लोक हे गरीब आहेत. त्यांना ऑनलाइन अर्जाबाबत माहिती नाही, अशी माहिती ॲड. सुमेधा राव यांनी दिली

मुंबई : कोरोना पीडितांच्या नातेवाइकांना सानुग्रह भरपाई ही हक्काची बाब आहे आणि त्यांना यापासून वंचित ठेवू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्षात दाखल केलेल्या नुकसानभरपाईचे दावे का फेटाळण्यात येत आहेत किंवा ते स्वीकारण्यास विलंब का करण्यात येत आहे, याबाबत सूचना घ्याव्यात, असे निर्देश मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक  यांच्या खंडपीठाने  सरकारी वकिलांना दिले. नुकसानभरपाईसाठी केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारू नये, तर पोस्टाद्वारे व प्रत्यक्षात अर्ज भरणाऱ्यांचे अर्जही स्वीकारावेत, असे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी प्रमेय वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेने जनहित याचिकेद्वारे केली आहे.  

भरपाईसाठी दावा करणारे बहुतांश लोक हे गरीब आहेत. त्यांना ऑनलाइन अर्जाबाबत माहिती नाही, अशी माहिती ॲड. सुमेधा राव यांनी दिली.त्यावर मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्यायालयाला सांगितले की, ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्या दावेदारांना नुकसानभरपाईची रक्कम राज्य सरकारने दिली आहे. ऑनलाइन अर्जासाठी तुम्ही इतके आग्रही का? सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना आणि केंद्र सरकारला कोरोना पीडितांपर्यंत पोहोचवून सानुग्रह भरपाई देण्याचे आदेश दिले असल्याची आठवण उच्च न्यायालयाने राज्य सरकारला करून दिली. तसेच न्यायालयाने गुरुवारी या याचिकेवर सुनावणी ठेवली.

मुंबईत निम्मे अर्ज बाहेरीलमहापालिकेच्या वकिलांनी सांगितले की, पालिकेकडे आतापर्यंत ३४,००० अर्ज आले. त्यापैकी १६,८८४ अर्ज आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला पाठविण्यात आले आहेत. बाकीच्यांनी अर्ज भरण्यात काही चुका केल्या आहेत. तसेच काही अर्ज मुंबई महापालिकेबाहेर राहणाऱ्या नागरिकांचेही आहेत, त्या नागरिकांचे अर्ज संबंधित प्रशासनाकडे पाठविण्यात येत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय