शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

भरपाई हा कोरोना मृतांच्या नातेवाइकांचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 07:35 IST

उच्च न्यायालय : पोस्टाद्वारे व प्रत्यक्षात येणारे अर्जही स्वीकारण्याची मागणी

ठळक मुद्देभरपाईसाठी दावा करणारे बहुतांश लोक हे गरीब आहेत. त्यांना ऑनलाइन अर्जाबाबत माहिती नाही, अशी माहिती ॲड. सुमेधा राव यांनी दिली

मुंबई : कोरोना पीडितांच्या नातेवाइकांना सानुग्रह भरपाई ही हक्काची बाब आहे आणि त्यांना यापासून वंचित ठेवू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्षात दाखल केलेल्या नुकसानभरपाईचे दावे का फेटाळण्यात येत आहेत किंवा ते स्वीकारण्यास विलंब का करण्यात येत आहे, याबाबत सूचना घ्याव्यात, असे निर्देश मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक  यांच्या खंडपीठाने  सरकारी वकिलांना दिले. नुकसानभरपाईसाठी केवळ ऑनलाइन अर्जच स्वीकारू नये, तर पोस्टाद्वारे व प्रत्यक्षात अर्ज भरणाऱ्यांचे अर्जही स्वीकारावेत, असे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी प्रमेय वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेने जनहित याचिकेद्वारे केली आहे.  

भरपाईसाठी दावा करणारे बहुतांश लोक हे गरीब आहेत. त्यांना ऑनलाइन अर्जाबाबत माहिती नाही, अशी माहिती ॲड. सुमेधा राव यांनी दिली.त्यावर मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्यायालयाला सांगितले की, ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्या दावेदारांना नुकसानभरपाईची रक्कम राज्य सरकारने दिली आहे. ऑनलाइन अर्जासाठी तुम्ही इतके आग्रही का? सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना आणि केंद्र सरकारला कोरोना पीडितांपर्यंत पोहोचवून सानुग्रह भरपाई देण्याचे आदेश दिले असल्याची आठवण उच्च न्यायालयाने राज्य सरकारला करून दिली. तसेच न्यायालयाने गुरुवारी या याचिकेवर सुनावणी ठेवली.

मुंबईत निम्मे अर्ज बाहेरीलमहापालिकेच्या वकिलांनी सांगितले की, पालिकेकडे आतापर्यंत ३४,००० अर्ज आले. त्यापैकी १६,८८४ अर्ज आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला पाठविण्यात आले आहेत. बाकीच्यांनी अर्ज भरण्यात काही चुका केल्या आहेत. तसेच काही अर्ज मुंबई महापालिकेबाहेर राहणाऱ्या नागरिकांचेही आहेत, त्या नागरिकांचे अर्ज संबंधित प्रशासनाकडे पाठविण्यात येत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय