शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

महाराष्ट्रातील कंपनी, तीन माजी पदाधिकारी दोषी; कोळसा घोटाळा, विशेष न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 12:02 IST

या खटल्यात सीबीआयच्या वतीने अतिरिक्त कायदे सल्लागार संजयकुमार व विशेष सरकारी वकील ए.पी. सिंह, एन.पी. श्रीवास्तव, ए.के. पाठक यांनी बाजू मांडली.

नवी दिल्ली : २००५ साली महाराष्ट्रातील तीन कोळसा ब्लॉक मिळविण्याच्या व्यवहारात फसवणूक केल्याच्या, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील एक कंपनी व तिच्या तीन माजी पदाधिकाऱ्यांना दोषी ठरविले आहे.

टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल्स लिमिटेड असे या कंपनीचे नाव असून पूर्वी श्री वीरांगना स्टील्स लिमिटेड या नावाने ओळखली जात असे. तिचे माजी पदाधिकारी अनिलकुमार सक्सेना, मनोज माहेश्वरी, आनंद नंदकिशोर सारडा यांना या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. हा निकाल विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी दिला. महाराष्ट्रातील उमरेड येथील कोळसा खाणीचे मार्की मंगली-२, ३ आणि ४ क्रमांकाचे ब्लाॅक मिळविण्यासाठी या कंपनीने गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. तसेच, त्यांना शिक्षा सुनावण्याच्या मुद्यावर येत्या ११ जानेवारी रोजी दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद न्यायालय ऐकणार आहे. हे तीन कोळसा ब्लॉक सदर कंपनीला देण्यात आले तेव्हा तीनही आरोपी सदर कंपनीचे पदाधिकारी होते. श्री वीरांगना स्टील्स लिमिटेड ही कंपनी टॉपवर्थ ग्रुपला विकण्यात आल्यानंतर तिचे नाव बदलण्यात आले होते. 

या खटल्यात सीबीआयच्या वतीने अतिरिक्त कायदे सल्लागार संजयकुमार व विशेष सरकारी वकील ए.पी. सिंह, एन.पी. श्रीवास्तव, ए.के. पाठक यांनी बाजू मांडली. १९९३ व २००५ साली कोळसा ब्लॉकच्या झालेल्या वाटपाबाबत केलेल्या प्राथमिक चौकशीतून हे प्रकरण उजेडात आले होते, असे सीबीआयने सांगितले. टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल्स लिमिटेडला मिळालेल्या तीन कोळसा ब्लॉकच्या प्रकरणात सीबीआयने कंपनीशी संबंधित नागपूर, यवतमाळ, मुंबई येथील ठिकाणांवर धाडी घातल्या होत्या. वीरांगना स्टील्स कंपनी अस्तित्वात नसताना तिच्या नावे लीज डीड तयार करण्यात आल्याचे या तपासातून उजेडात आले. 

नाव बदलण्याची विनंती अमान्यवीरांगना स्टील्स कंपनीचे नाव बदलून ते टॉपवर्थ करावे, अशी केलेली विनंती कोळसा मंत्रालयाने मान्य केली नाही. कंपनीच्या शेअर होल्डिंग प्रकारात बदल झाल्याचे कारण देत हा नकार देण्यात आला होता, असे सीबीआयने म्हटले आहे. या कंपनीने सध्याच्या स्पंज आयर्न प्लांटची क्षमता न वाढवता, नियमांचे उल्लंघन करून जास्त प्रमाणात खाणकाम केले, असाही दावा सीबीआयने केला.

टॅग्स :Courtन्यायालय