शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

महाराष्ट्रातील कंपनी, तीन माजी पदाधिकारी दोषी; कोळसा घोटाळा, विशेष न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 12:02 IST

या खटल्यात सीबीआयच्या वतीने अतिरिक्त कायदे सल्लागार संजयकुमार व विशेष सरकारी वकील ए.पी. सिंह, एन.पी. श्रीवास्तव, ए.के. पाठक यांनी बाजू मांडली.

नवी दिल्ली : २००५ साली महाराष्ट्रातील तीन कोळसा ब्लॉक मिळविण्याच्या व्यवहारात फसवणूक केल्याच्या, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील एक कंपनी व तिच्या तीन माजी पदाधिकाऱ्यांना दोषी ठरविले आहे.

टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल्स लिमिटेड असे या कंपनीचे नाव असून पूर्वी श्री वीरांगना स्टील्स लिमिटेड या नावाने ओळखली जात असे. तिचे माजी पदाधिकारी अनिलकुमार सक्सेना, मनोज माहेश्वरी, आनंद नंदकिशोर सारडा यांना या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. हा निकाल विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी दिला. महाराष्ट्रातील उमरेड येथील कोळसा खाणीचे मार्की मंगली-२, ३ आणि ४ क्रमांकाचे ब्लाॅक मिळविण्यासाठी या कंपनीने गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. तसेच, त्यांना शिक्षा सुनावण्याच्या मुद्यावर येत्या ११ जानेवारी रोजी दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद न्यायालय ऐकणार आहे. हे तीन कोळसा ब्लॉक सदर कंपनीला देण्यात आले तेव्हा तीनही आरोपी सदर कंपनीचे पदाधिकारी होते. श्री वीरांगना स्टील्स लिमिटेड ही कंपनी टॉपवर्थ ग्रुपला विकण्यात आल्यानंतर तिचे नाव बदलण्यात आले होते. 

या खटल्यात सीबीआयच्या वतीने अतिरिक्त कायदे सल्लागार संजयकुमार व विशेष सरकारी वकील ए.पी. सिंह, एन.पी. श्रीवास्तव, ए.के. पाठक यांनी बाजू मांडली. १९९३ व २००५ साली कोळसा ब्लॉकच्या झालेल्या वाटपाबाबत केलेल्या प्राथमिक चौकशीतून हे प्रकरण उजेडात आले होते, असे सीबीआयने सांगितले. टॉपवर्थ ऊर्जा अँड मेटल्स लिमिटेडला मिळालेल्या तीन कोळसा ब्लॉकच्या प्रकरणात सीबीआयने कंपनीशी संबंधित नागपूर, यवतमाळ, मुंबई येथील ठिकाणांवर धाडी घातल्या होत्या. वीरांगना स्टील्स कंपनी अस्तित्वात नसताना तिच्या नावे लीज डीड तयार करण्यात आल्याचे या तपासातून उजेडात आले. 

नाव बदलण्याची विनंती अमान्यवीरांगना स्टील्स कंपनीचे नाव बदलून ते टॉपवर्थ करावे, अशी केलेली विनंती कोळसा मंत्रालयाने मान्य केली नाही. कंपनीच्या शेअर होल्डिंग प्रकारात बदल झाल्याचे कारण देत हा नकार देण्यात आला होता, असे सीबीआयने म्हटले आहे. या कंपनीने सध्याच्या स्पंज आयर्न प्लांटची क्षमता न वाढवता, नियमांचे उल्लंघन करून जास्त प्रमाणात खाणकाम केले, असाही दावा सीबीआयने केला.

टॅग्स :Courtन्यायालय