शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

"या गुंडांच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय?" जंतर-मंतरवरील घोषणाबाजीवरून ओवेसी भडकले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 13:43 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी उपाध्याय यांनी या कार्यक्रमाचे आयोजित केले होते.

नवी दिल्ली - 'भारत जोडो आंदोलना'च्या पार्श्वभूमीवर काही कायदे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करत रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शन करण्यात आले. यावेळी शेकडो लोक येथे जमले होते. तसेच, यावेळी काही आक्षेपार्ह सांप्रदायिक घोषणाही देण्यात आल्या, असा आरोप आहे. यावर आता एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप घेतला आहे. (Communal slogans at jantar mantar AIMIM owaisi says whats the secret of increasing courage of these goons)

यासंदर्भात ओवेसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, "गेल्या शुक्रवारी द्वारका येथे हज हाऊसविरोधात एक 'महापंचायत' बोलावण्यात आली. हस्ब-ए-रिवायत, या पंचायतीतही मुस्लीम विरोधी घोषणा देण्यात आल्या. जंतर मंतर मोदींच्या महालापासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. काल तेथे 'जब मुल्ले काटे जाएंगे..' सारख्या वाईट घोषणा देण्यात आल्या."

ओवैसी म्हणाले, "या गुंडाच्या वाढत्या हिंमतीचे रहस्य काय? यांना माहीत आहे, की मोदी सरकार यांच्या पाठीशी उभे आहे. 24 जुलैला भारत सरकारने रासुका (NSA)अंतर्गत दिल्ली पोलिसांना कुण्याही व्यक्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार दिला होता. तरीही दिल्ली पोलीस शांतपणे तमाशा पाहत उभे होते. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की न्याय आणि कायदेशीर कारवाईची मागणी करणेही मजाक बनले आहे. यावर लोकसभेतही चर्चा व्हायला हवी. मी, या मुद्द्यावर लोकसभेच्या नियमानुसार स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे."

मुस्लिमविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी माजी भाजपा प्रवक्ते अश्विनी उपाध्यायसह 6 जणांना अटक

'भारत जोडो मूव्हमेंट'च्या नावाने एकत्र आले होते लोक -पोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे काही लोक 8 ऑगस्ट 1947 ला झालेल्या 'भारत छोडो आंदोलना'च्या धर्तीवर ‘भारत जोडो मूव्हमेंट’ नावाने एकत्र आले होते. लोकांना एकत्र आणण्यासाठी या आंदोलनाचा सोशल मीडियावर चांगलाच प्रचार करण्यात आला होता.  जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीत सिंह आणि महासचिव अरविंद त्यागी यांच्यासह सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ वकील अश्विनी उपाध्याय, नीरज नक्षत्र चौहान, लोकसंख्या समाधान फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल चौधरी, हिंदू रक्षा दलाचे भूपेंद्र चौधरी, आर्य निर्मात्री सभेचे सुनील आर्य, देवसेनेकडून वृजभूषण सैनी, मां कामधेनू फाउंडेशनचे दीपक तोमर, हिंदू सेनेचे विष्णु गुप्ता आणि देशभरातून शेकडो लोक आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी उपाध्याय यांनी या कार्यक्रमाचे आयोजित केले होते.

यासंदर्भात बोलताना अश्विनी उपाध्याय म्हणाले, त्यांचा कार्यक्रम यूनायटेड भारतासाठी होता. ज्यांनी धर्मविरोधी घोषणाबाजी केली, त्यांचा आमच्या संघटनेशी काहीही संबंध नाही. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीJantar Mantarजंतर मंतरHinduहिंदूMuslimमुस्लीमAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन