शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीतील कायदा रद्द करण्याची आयोगाची शिफारस

By admin | Updated: November 20, 2014 01:44 IST

अनेक कालबाह्य कायदे रद्द करण्याची शिफारस करणाऱ्या कायदा आयोगाने आता सन १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली एक विशेष तरतूद

नवी दिल्ली : अनेक कालबाह्य कायदे रद्द करण्याची शिफारस करणाऱ्या कायदा आयोगाने आता सन १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली एक विशेष तरतूद रद्द करण्याची शिफारस केली आहे़ आणीबाणीदरम्यान हा कायदा अस्तित्वात आला होता़ लोकनियुक्त कुठलाही लोकप्रतिनिधी पंतप्रधान वा लोकसभा अध्यक्ष झाला असेल वा होणार असेल तर त्याच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देता येणार नाही, असा हा कायदा सांगतो़आणीबाणीच्या ३७ वर्षांनंतर नरेंद्र मोदी सरकारने हा ‘विवादित निवडणूक(पंतप्रधान आणि लोकसभाध्यक्ष) कायदा १९७७’ संपुष्टात आणण्याची तयारी चालवली आहे़ अनुच्छेद ३२९ अ अन्वये राज्यघटनेत ही विशेष तरतूद समाविष्ट करण्यात आली होती़ त्यानुसार निवडून आलेला लोकप्रतिनिधी पंतप्रधान वा लोकसभाध्यक्ष असेल वा होणार असेल तर त्याच्याविरुद्ध अन्य कुठलाही कायदा लागू होणार नाही़ अशा स्थितीत ‘विवादित निवडणूक (पंतप्रधान आणि लोकसभाध्यक्ष) कायदा १९७७’ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश एक स्वतंत्र प्राधिकरण म्हणून संबंधित लोकप्रतिनिधीविरुद्धच्या निवडणूक याचिकेची सुनावणी करेल़ या प्राधिकरणाचा निर्णय अंतिम असेल़आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या जनता दलाच्या सरकारने या कायद्याचा मूळ स्रोत असलेली अनुच्छेद ३२९अ ची घटनादुरुस्ती रद्द केली. परंतु त्यानुसार केला गेलेला हा कायदा अद्यापही अस्तित्वात आहे़ मात्र आता राज्यघटनेचे पाठबळ नसल्याने आता या कायद्याची संवैधानिकता ‘संदिग्ध’ असल्याचे सांगून कायदा आयोगाने हा कायदा रद्दबातल ठरविण्याची शिफारस केली आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)