शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"माझ्या बॅगेत बॉम्ब..."; कोची विमानतळावर खळबळ, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 15:08 IST

कोची विमानतळावर एअर इंडियाच्या एका प्रवाशाने सुरक्षा कर्मचाऱ्यांची चिंता वाढवली. हा प्रवासी कोचीहून मुंबईला जात होता.

केरळमधील कोची विमानतळावर एअर इंडियाच्या एका प्रवाशाने सुरक्षा कर्मचाऱ्यांची चिंता वाढवली. हा प्रवासी कोचीहून मुंबईला जात होता. यावेळी विमानतळावरील एक्स-रे बॅगेज इन्स्पेक्शन सिस्टीम (XBIS) चेकपॉईंटवर एका प्रवाशाने सीआयएसएफ जवानांना विचारलं की, "माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का?" हे ऐकताच एकच खळबळ उडाली. 

प्रवाशाच्या या विचित्र प्रश्नाने शेजारी उभ्या असलेल्या जवानांना मोठा धक्का बसला आणि तात्काळ प्रवाशाला अटक करण्यात आली. प्रवाशाची कसून तपासणी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. रिपोर्टनुसार, बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल सक्वॅड (BDDS) प्रवाशाच्या सामानाचीही तपासणी केली. तपास पूर्ण झाल्यानंतर विमान वेळेवर निघालं.

बॅगमध्ये काय सापडलं? 

प्रवाशाच्या बॅगेत काहीही सापडलं नसून बॅगेत बॉम्ब असल्याबाबत त्याने विनाकारण प्रश्न विचारल्याचं म्हटलं आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, युजर्स असंही म्हणत आहेत की, खूप वेळ असणाऱ्या तपास प्रक्रियेमुळे प्रवाशाने असा प्रश्न विचारला असावा. काही युजर्स या प्रवाशाविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत बोलत आहेत.

काय म्हणाले अधिकारी?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशाला पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. एअर इंडियाचं विमान एआय ६८२ च्या टेकऑफपूर्वी विमानतळावर ही घटना घडल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. मनोज असं या प्रवाशाचं नाव आहे. असा प्रश्न विचारण्यामागचं कारण मनोजला विचारण्यात आलं. याआधीही फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवा अनेक वेळा समोर आल्या आहेत. तसेच अनेक प्रवाशांनी फ्लाइट आणि चेकिंग दरम्यान बॅगेत बॉम्ब असल्याच्या धमक्या दिल्या आहेत.

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ