शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

युतीचा काडीमोड भाजपाच्या पथ्यावर

By admin | Updated: September 26, 2014 00:09 IST

पाचवरून संख्याबळ नऊ होणार

पाचवरून संख्याबळ नऊ होणारनाशिक : आगामी ४ ऑक्टोबरला होणार्‍या जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपदासाठी निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ अचानक चारवरून नऊवर जाण्याची शक्यता बळावली आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे चार समर्थक जिल्हा परिषद सदस्यही भाजपाच्या गोटात जाण्याची शक्यता आहे.आमदार माणिकराव कोकाटे यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे समर्थकही साहजिकच भाजपावासी होणार आहेत. जिल्हा परिषदेत सिन्नर तालुक्यातून आमदार माणिकराव कोकाटे समर्थक चार, तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य निवडून आले आहेत. त्यातच कोकाटे समर्थक चारपैकी राजेश नवाळे यांना मागील अडीच वर्षांत कॉँग्रेसकडून समाजकल्याण सभापतिपदी संधी मिळाली आहे. तसेच दुसरे समर्थक केरू पवार यांनाही उपाध्यक्षपदासाठी कॉँग्रेसने संधी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रकाश वडजे यांनी त्यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत केले होते. आता आमदार माणिकराव कोकाटे भाजपात गेल्याने त्यांचे समर्थक सदस्य माजी सभापती राजेश नवाळे, केरू पवार, शीला गवारे व ताईबाई गायकवाड हे चारही सदस्य भाजपात जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत भाजपाचे केदा अहेर, कलावती चव्हाण, सुनीता पाटील व मनीषा बोडके हे चार, तर अद्वय हिरे हे भाजपात गेल्याने त्यांच्या जनराज्य पक्षाकडून निवडून आलेल्या स्वाती पवन ठाकरे याही भाजपावासी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाची संख्या पाच झालेली असतानाच आता आमदार माणिकराव कोकाटे भाजपात गेल्याने त्यांचे चार समर्थकही भाजपावासी झाले तर भाजपाची संख्या आता नऊ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विषय समिती सभापतिपदासाठी भाजपाकडून उमेदवारी घेऊन प्रसंगी बांधकाम व अर्थ समिती सभापतिपदासाठी जोरदार लॉबिंग होऊ शकते. (प्रतिनिधी)