शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

मामा शिवराजच्या राशीेला ‘गुरू’ वक्री; ५३ बंडखोरांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 05:55 IST

व्यापमं घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेसने आधीच टीकेची झोड उठवली असताना केळकर यांच्या या विधानाने विरोधी पक्षाच्या हाती कोलितच मिळाले आहे.

- गजानन चोपडे

जबलपूर : राज्यात भाजपाला चौथ्यांदा सत्ता मिळवायची असेल तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा सरकारविषयीचा रोष भाजपाला महागात पडू शकतो, असा सल्ला मुख्यमंत्र्यांचे राजकीय गुरू व ज्येष्ठ संघ प्रचारक सूर्यकांत केळकर यांनी दिल्याने ‘मामा’ शिवराज सिंग चौहान यांच्या अडचणीत भर पडली आहे.व्यापमं घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेसने आधीच टीकेची झोड उठवली असताना केळकर यांच्या या विधानाने विरोधी पक्षाच्या हाती कोलितच मिळाले आहे. केळकर यांच्या मते पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी आणि सरकारविषयीचा रोष हे फॅक्टर भाजपाला अडचणीत आणू शकतात. त्यामुळे पक्षाने वेळीच पाऊल उचलणे आवश्यक आहे. पक्षाध्यक्षांप्रमाणे नगरसेवक, आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाह केवळ दोनदाच संधी द्यायला हवी. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांना संधी मिळेल.यापूर्वी मुख्यमंत्री चौहान यांच्याविषयी माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर आणि माजी केंद्रीय मंत्री सरताज सिंग यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मतदानाला १० दिवस शिल्लक असताना संघाचे ज्येष्ठ प्रचारक केळकर यांचा हा सल्ला महत्त्वाचा मानला जात आहे. भाजपामध्ये यंदा बंडखोरांची मोठी फौज दिसत आहे. काहींची समजूत घालण्याचा प्रयत्न होत असला तरी ही मंडळी उमेदवारांच्या प्रचारात उतरलेली नाहीत. आतापर्यंत भाजपाने बंडखोरीमुळे राज्यातील ५३ स्थानिक नेत्यांना पक्षातून बाहेर काढले आहे.मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला बुधनी मतदारसंघात त्यांच्या पत्नी साधना सिंग व मुलगा कार्तिकेय यांच्या विरोधात सोशल मीडियावर रान उठल्याने मुख्यमंत्री चिंतेत आहेत. त्यांच्या विरोधात आधी अर्जुन आर्य यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार होती. मात्र वातावरण बदलत असल्याने काँग्रेसने येथून अरुण यादव यांना उतरवून नवीन व्यूहरचना केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मतदारसंघाकडेही अधिक लक्ष द्यावे लागत आहे. बुधनीमध्ये शिवराज सिंंहांनी प्रचाराची धुरा पत्नी व मुलावर सोपविली होती. परंतु आता या दोघांनाच विरोधाचा सामना करावा लागत असल्याने काँग्रेसच्या आशा काहीशह पल्लवित झाल्या आहेत.राहुल गांधी यांनी प्रचारातव्यापंम घोटाळ्याला ‘स्कॅम आॅफ द सेन्च्युरी’ म्हणत शिवराज सिंग चौहानांना फैलावर घेतले आहे. शिवराज स्वत:ला ‘मामा’ म्हणत असले तरी ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांची तुलना ‘कंस’ व ‘शकुनी’शी केली आहे. शिवराज यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह त्यांचे कौतुक करीत आहेत. शिवराज सिंग यांच्या कार्यकाळात राज्याचा जेवढा विकास झाला तेवढा काँग्रेस ४० वर्षात करू शकली नाही, असा दावा मोदींनी केल्याने भाजपात उत्साह आहे. मोदी आता २५ नोव्हेंबर या काळात १० सभा घेणार आहेत.‘व्यापमं’चा आरोपी रिंगणातदेशभरात गाजलेल्या व्यापमं घोटाळ्यातील एक आरोपी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बसपाने भिंडच्या गोहाद मतदारसंघातून डॉ. जगदीश सागर यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील इतर उमेदवारांच्या तुलनेत डॉ. सागर सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सव्वा सात कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहान