शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मामा शिवराजच्या राशीेला ‘गुरू’ वक्री; ५३ बंडखोरांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 05:55 IST

व्यापमं घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेसने आधीच टीकेची झोड उठवली असताना केळकर यांच्या या विधानाने विरोधी पक्षाच्या हाती कोलितच मिळाले आहे.

- गजानन चोपडे

जबलपूर : राज्यात भाजपाला चौथ्यांदा सत्ता मिळवायची असेल तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलल्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा सरकारविषयीचा रोष भाजपाला महागात पडू शकतो, असा सल्ला मुख्यमंत्र्यांचे राजकीय गुरू व ज्येष्ठ संघ प्रचारक सूर्यकांत केळकर यांनी दिल्याने ‘मामा’ शिवराज सिंग चौहान यांच्या अडचणीत भर पडली आहे.व्यापमं घोटाळ्यामुळे मध्य प्रदेश सरकारवर काँग्रेसने आधीच टीकेची झोड उठवली असताना केळकर यांच्या या विधानाने विरोधी पक्षाच्या हाती कोलितच मिळाले आहे. केळकर यांच्या मते पक्ष कार्यकर्त्यांची नाराजी आणि सरकारविषयीचा रोष हे फॅक्टर भाजपाला अडचणीत आणू शकतात. त्यामुळे पक्षाने वेळीच पाऊल उचलणे आवश्यक आहे. पक्षाध्यक्षांप्रमाणे नगरसेवक, आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाह केवळ दोनदाच संधी द्यायला हवी. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांना संधी मिळेल.यापूर्वी मुख्यमंत्री चौहान यांच्याविषयी माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर आणि माजी केंद्रीय मंत्री सरताज सिंग यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मतदानाला १० दिवस शिल्लक असताना संघाचे ज्येष्ठ प्रचारक केळकर यांचा हा सल्ला महत्त्वाचा मानला जात आहे. भाजपामध्ये यंदा बंडखोरांची मोठी फौज दिसत आहे. काहींची समजूत घालण्याचा प्रयत्न होत असला तरी ही मंडळी उमेदवारांच्या प्रचारात उतरलेली नाहीत. आतापर्यंत भाजपाने बंडखोरीमुळे राज्यातील ५३ स्थानिक नेत्यांना पक्षातून बाहेर काढले आहे.मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला बुधनी मतदारसंघात त्यांच्या पत्नी साधना सिंग व मुलगा कार्तिकेय यांच्या विरोधात सोशल मीडियावर रान उठल्याने मुख्यमंत्री चिंतेत आहेत. त्यांच्या विरोधात आधी अर्जुन आर्य यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार होती. मात्र वातावरण बदलत असल्याने काँग्रेसने येथून अरुण यादव यांना उतरवून नवीन व्यूहरचना केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मतदारसंघाकडेही अधिक लक्ष द्यावे लागत आहे. बुधनीमध्ये शिवराज सिंंहांनी प्रचाराची धुरा पत्नी व मुलावर सोपविली होती. परंतु आता या दोघांनाच विरोधाचा सामना करावा लागत असल्याने काँग्रेसच्या आशा काहीशह पल्लवित झाल्या आहेत.राहुल गांधी यांनी प्रचारातव्यापंम घोटाळ्याला ‘स्कॅम आॅफ द सेन्च्युरी’ म्हणत शिवराज सिंग चौहानांना फैलावर घेतले आहे. शिवराज स्वत:ला ‘मामा’ म्हणत असले तरी ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांची तुलना ‘कंस’ व ‘शकुनी’शी केली आहे. शिवराज यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह त्यांचे कौतुक करीत आहेत. शिवराज सिंग यांच्या कार्यकाळात राज्याचा जेवढा विकास झाला तेवढा काँग्रेस ४० वर्षात करू शकली नाही, असा दावा मोदींनी केल्याने भाजपात उत्साह आहे. मोदी आता २५ नोव्हेंबर या काळात १० सभा घेणार आहेत.‘व्यापमं’चा आरोपी रिंगणातदेशभरात गाजलेल्या व्यापमं घोटाळ्यातील एक आरोपी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बसपाने भिंडच्या गोहाद मतदारसंघातून डॉ. जगदीश सागर यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील इतर उमेदवारांच्या तुलनेत डॉ. सागर सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सव्वा सात कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहान