शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

हिंसक आंदोलनाला मुख्यमंत्रीच जबाबदार; शिवसेनेचा संसदेत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:06 IST

मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचारासाठी शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचारासाठी शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले. लोकसभेत सेना खासदार विनायक राऊत यांनी मराठा आंदोलनाचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अयशस्वी ठरल्याची आगपाखड केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांनी राऊत यांचीच रि ओढली. राज्यसभेत छत्रपती संभाजी राजेंनी मराठा समुदायाचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन सूचना केल्या.औरंगाबादमध्ये एका युवकाने आत्महत्या केली. त्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, आरक्षणाच्या मगाणीकडे केवळ न्यायालयाची ढाल करून राज्य सरकार टोलवाटोलवी करीत आहे. आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा आम्ही जलसमाधी घेणार, असे पत्र मराठा आंदोलकांनी प्रशासनाला दिले होते. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळेच आताचे आंदोलन चिघळल्याचा थेट आरोप राऊत यांनी केला. महाडिक म्हणाले, मराठा समाजाच्या मागणीचा विचार झाला नाही. आंदोलकांनी इशारा देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने, युवकाने जलसमाधी घेतली.संभाजीराजेंनी मराठीत भाषण केले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने भावना तीव्र झाल्या आहेत. आंदोलन चिघळले आहे. संभाजीराजेंनी दोन सूचना केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समजातील सर्व घटकांना बोलवून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सर्व राजकीय पक्षांशी त्यासाठी चर्चा करावी, असे पर्याय त्यांनी सुचविले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना