शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हिंसक आंदोलनाला मुख्यमंत्रीच जबाबदार; शिवसेनेचा संसदेत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:06 IST

मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचारासाठी शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचारासाठी शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले. लोकसभेत सेना खासदार विनायक राऊत यांनी मराठा आंदोलनाचा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अयशस्वी ठरल्याची आगपाखड केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडिक यांनी राऊत यांचीच रि ओढली. राज्यसभेत छत्रपती संभाजी राजेंनी मराठा समुदायाचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन सूचना केल्या.औरंगाबादमध्ये एका युवकाने आत्महत्या केली. त्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, आरक्षणाच्या मगाणीकडे केवळ न्यायालयाची ढाल करून राज्य सरकार टोलवाटोलवी करीत आहे. आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवा अन्यथा आम्ही जलसमाधी घेणार, असे पत्र मराठा आंदोलकांनी प्रशासनाला दिले होते. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळेच आताचे आंदोलन चिघळल्याचा थेट आरोप राऊत यांनी केला. महाडिक म्हणाले, मराठा समाजाच्या मागणीचा विचार झाला नाही. आंदोलकांनी इशारा देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने, युवकाने जलसमाधी घेतली.संभाजीराजेंनी मराठीत भाषण केले. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने भावना तीव्र झाल्या आहेत. आंदोलन चिघळले आहे. संभाजीराजेंनी दोन सूचना केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समजातील सर्व घटकांना बोलवून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सर्व राजकीय पक्षांशी त्यासाठी चर्चा करावी, असे पर्याय त्यांनी सुचविले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना