शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर सरकार कोण चालवणार? कायदा काय सांगतो? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 15:03 IST

CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

CM Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वी दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर आता आज त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. पुढील दोन दिवसांनी केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. येत्या दोन दिवसांत विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून, नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल, अशी माहिती केजरीवालांनी दिली. आता प्रश्न पडतो की, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याची जबाबदारी कोणाकडे असते? किंवा सरकार कोण चालवते? जाणून घ्या...

मुख्यमंत्र्यांचा राजीनामादिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा जाहीर केला आहे. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, जोपर्यंत मी जनतेच्या कोर्टात जिंकत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर बसणार नाही. दिल्लीच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. जनतेने कौल देऊन मला विजयी केल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. मात्र, दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा होत आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' पाच नावे चर्चेतअरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर राखी बिर्ला यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. राखी बिर्ला या अनुसूचित जातीचा चेहरा असून मागासवर्गीयांना लक्षात घेऊन त्यांना खुर्ची दिली जाऊ शकते. याशिवाय, दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी मार्लेना यांचेही नाव पुढे जात आहे. तिसरे नाव सौरभ भारद्वाज यांचे आहे. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी सरकारच्या कामाची जबाबदारी स्वीकारली होती. दिल्लीचे परिवहन आणि पर्यावरण मंत्री कैलाश गेहलोत यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. याशिवाय अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचेही नाव चर्चेत आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्य कोण चालवते?अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आणि नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत राज्याचा कारभार कोण पाहणार आहे. माहितीनुसार, कोणताही मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपाल/नायब राज्यपालांकडे सोपवतो. परंतु राजीनामा दिल्यानंतर आणि नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत, विद्यमान मुख्यमंत्री राज्याचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम सांभाळतात. मुख्यमंत्री राजीनामा देतात, तेव्हा राज्यपाल/नायब राज्यपाल नवीन मुख्यमंत्री नियुक्त होईपर्यंत राज्याची जबाबदारी सांभाळण्याचे निर्देश देतात.

राष्ट्रपती राजवटआता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की, राष्ट्रपती राजवटीत राज्याची जबाबदारी कोण सांभाळते. राष्ट्रपती राजवटीत राज्याची जबाबदारी राज्यपाल/नायब राज्यपालांकडे असते आणि ते राज्याशी संबंधित सर्व कामांसाठी जबाबदार असतात. मात्र, कार्यवाह मुख्यमंत्र्यांचे अधिकार मर्यादित होतात. या कालावधीत ते कोणतीही नवीन योजना सुरू करू शकत नाही. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे अशा बाबींवर ते सूचना देऊ शकतात.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली