शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर सरकार कोण चालवणार? कायदा काय सांगतो? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 15:03 IST

CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

CM Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वी दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर आता आज त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. पुढील दोन दिवसांनी केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. येत्या दोन दिवसांत विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून, नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल, अशी माहिती केजरीवालांनी दिली. आता प्रश्न पडतो की, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याची जबाबदारी कोणाकडे असते? किंवा सरकार कोण चालवते? जाणून घ्या...

मुख्यमंत्र्यांचा राजीनामादिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा जाहीर केला आहे. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, जोपर्यंत मी जनतेच्या कोर्टात जिंकत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदावर बसणार नाही. दिल्लीच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. जनतेने कौल देऊन मला विजयी केल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन. मात्र, दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजकीय वर्तुळात अनेक नावांची चर्चा होत आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' पाच नावे चर्चेतअरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर राखी बिर्ला यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. राखी बिर्ला या अनुसूचित जातीचा चेहरा असून मागासवर्गीयांना लक्षात घेऊन त्यांना खुर्ची दिली जाऊ शकते. याशिवाय, दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी मार्लेना यांचेही नाव पुढे जात आहे. तिसरे नाव सौरभ भारद्वाज यांचे आहे. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी सरकारच्या कामाची जबाबदारी स्वीकारली होती. दिल्लीचे परिवहन आणि पर्यावरण मंत्री कैलाश गेहलोत यांचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. याशिवाय अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचेही नाव चर्चेत आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्य कोण चालवते?अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार आणि नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत राज्याचा कारभार कोण पाहणार आहे. माहितीनुसार, कोणताही मुख्यमंत्री आपला राजीनामा राज्यपाल/नायब राज्यपालांकडे सोपवतो. परंतु राजीनामा दिल्यानंतर आणि नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत, विद्यमान मुख्यमंत्री राज्याचे हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम सांभाळतात. मुख्यमंत्री राजीनामा देतात, तेव्हा राज्यपाल/नायब राज्यपाल नवीन मुख्यमंत्री नियुक्त होईपर्यंत राज्याची जबाबदारी सांभाळण्याचे निर्देश देतात.

राष्ट्रपती राजवटआता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की, राष्ट्रपती राजवटीत राज्याची जबाबदारी कोण सांभाळते. राष्ट्रपती राजवटीत राज्याची जबाबदारी राज्यपाल/नायब राज्यपालांकडे असते आणि ते राज्याशी संबंधित सर्व कामांसाठी जबाबदार असतात. मात्र, कार्यवाह मुख्यमंत्र्यांचे अधिकार मर्यादित होतात. या कालावधीत ते कोणतीही नवीन योजना सुरू करू शकत नाही. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे अशा बाबींवर ते सूचना देऊ शकतात.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्ली