शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

पाकच्या गोळीबारामुळे सीमाभागातील 200 शाळा बंद

By admin | Updated: November 2, 2016 14:38 IST

पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे जम्मू आणि काश्मीरच्या सीमाभागातील 200 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
 जम्मू, दि. 2 -  पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेला गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या सीमाभागातील 200 शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 
भारताने नियंत्रण रेषा पार केल्यापासून सीमाभागात तणावाचे वातावरण असून, पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येत आहे.  या गोळीबारात काही भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सीमाभागातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  जम्मू विभागातील 174 तर सांबा विभागातील 45 शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. असे अधिकृत सूत्रांनी मंगळवारी सांगितले. " आंतरराष्ट्रीय सरहद्द आणि नियंत्रण रेषेवर  सुरू असलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुढील आदेश येईपर्यंत या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत," जम्मूच्या उपायुक्त सिमरन दीप सिंह म्हणाल्या.
हे आदेश सर्व शासकीय आणि खाजगी शाळांना बंधनकारक असेल. नियंत्रण रेषेजवळ असलेल्या खौर, जौरियान, मार्ह, आर.एस.पुरा, अरनिया, सतवाती (मंडाल, माखवाल, लाल्याल), अखनूर, बिस्हानाह आणि मिरान साहिब या भागातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. 
(काश्मिरात शाळा जाळल्या) 
(काश्मीरमधील शाळा सुरू करा) 
 
जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही काळापासून निर्माणा झालेल्या अशांततेमुळे काश्मीर खोऱ्यातील शाळा बंद आहेत. तसेच खोऱ्यामध्ये 27 शाळा जाळण्यात आल्याच्या घटनाही घडल्या आहेत.