शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Climate Change Report: भारतावर घोर संकट! ही शहरे जाणार पाण्याखाली; हिमालय वितळणार, दुष्काळ पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 11:34 IST

Climate Change Report on India: युनायटेड नेशन्स इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या अहवालानुसार जगातील निम्म्या लोकसंख्येला धोका आहे. सर्व प्रयत्न करूनही पर्यावरणात सुधारणा होताना दिसत नाही.

जलवायु परिवर्तन (Climate Change) जगातील निम्म्या लोकसंख्येवर मोठे संकट घेऊन कोसळणार आहे. देशातील समुद्र किनाऱ्यावरील शहरे आणि हिमालयावर याचे गंभीर परिणाम होणार आहेत. इंटरगवर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंज (IPCC) च्या रिपोर्टनुसार आता उशिर करून चालणार नाही, नाहीतर जगासाठी परिणाम खूप धोकादायक असतील. 

हवामान बदलल्यामुळे अतिवृष्टी किंवा दुष्काळ, महापूर आणि उष्माघातासारखे प्रकार घडू शकतात. तसेच भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होणार असून उत्पादन कमी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

आयपीसीसी अहवाल तयार करणाऱ्यांमध्ये सहभागी असलेले अंजल प्रकाश म्हणाले की, येत्या वर्षभरात शहरी लोकसंख्येची संख्या झपाट्याने वाढणार आहे. पुढील 15 वर्षांत, देशाच्या लोकसंख्येपैकी 60 कोटी लोक शहरांमध्ये राहतील, जे सध्याच्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट असेल. देशाला 7,500 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम, पुरी आणि गोवा यांसारख्या भागात अधिक उष्णता जाणवू शकते. या भागांना समुद्राची पातळी वाढल्याने पूर सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एवढेच नाही तर येथे चक्री वादळाचा धोकाही निर्माण होणार आहे.

युनायटेड नेशन्स इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या अहवालानुसार जगातील निम्म्या लोकसंख्येला धोका आहे. सर्व प्रयत्न करूनही पर्यावरणात सुधारणा होताना दिसत नाही. तापमान 1-4 अंश सेल्सिअसने वाढले तर भारतात तांदूळ उत्पादनात 10 ते 30 टक्के, तर मक्याचे उत्पादन 25 ते 70 टक्क्यांनी घटू शकते, असे त्यात म्हटले आहे. आशियातील कृषी आणि अन्न व्यवस्थेशी संबंधित संकटे हळूहळू वाढतील, हवामान बदलासह संपूर्ण प्रदेशावर वेगवेगळे परिणाम होतील, असा इशारा अहवालात दिला आहे.

या अहवालात लोकांना त्याच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आणि त्यांच्या राहणीमानात सुधारणा करण्याच्या मार्गांचे वर्णन केले आहे. सुरत, इंदूर आणि भुवनेश्वर ही भारतीय शहरे हवामान बदलाला कोणत्या मार्गाने सामोरे जात आहेत याचाही या अहवालात उल्लेख आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात