शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

Climate Change Report: भारतावर घोर संकट! ही शहरे जाणार पाण्याखाली; हिमालय वितळणार, दुष्काळ पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 11:34 IST

Climate Change Report on India: युनायटेड नेशन्स इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या अहवालानुसार जगातील निम्म्या लोकसंख्येला धोका आहे. सर्व प्रयत्न करूनही पर्यावरणात सुधारणा होताना दिसत नाही.

जलवायु परिवर्तन (Climate Change) जगातील निम्म्या लोकसंख्येवर मोठे संकट घेऊन कोसळणार आहे. देशातील समुद्र किनाऱ्यावरील शहरे आणि हिमालयावर याचे गंभीर परिणाम होणार आहेत. इंटरगवर्नमेंटल पॅनल ऑन क्लाइमेट चेंज (IPCC) च्या रिपोर्टनुसार आता उशिर करून चालणार नाही, नाहीतर जगासाठी परिणाम खूप धोकादायक असतील. 

हवामान बदलल्यामुळे अतिवृष्टी किंवा दुष्काळ, महापूर आणि उष्माघातासारखे प्रकार घडू शकतात. तसेच भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होणार असून उत्पादन कमी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

आयपीसीसी अहवाल तयार करणाऱ्यांमध्ये सहभागी असलेले अंजल प्रकाश म्हणाले की, येत्या वर्षभरात शहरी लोकसंख्येची संख्या झपाट्याने वाढणार आहे. पुढील 15 वर्षांत, देशाच्या लोकसंख्येपैकी 60 कोटी लोक शहरांमध्ये राहतील, जे सध्याच्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट असेल. देशाला 7,500 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, विशाखापट्टणम, पुरी आणि गोवा यांसारख्या भागात अधिक उष्णता जाणवू शकते. या भागांना समुद्राची पातळी वाढल्याने पूर सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एवढेच नाही तर येथे चक्री वादळाचा धोकाही निर्माण होणार आहे.

युनायटेड नेशन्स इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या अहवालानुसार जगातील निम्म्या लोकसंख्येला धोका आहे. सर्व प्रयत्न करूनही पर्यावरणात सुधारणा होताना दिसत नाही. तापमान 1-4 अंश सेल्सिअसने वाढले तर भारतात तांदूळ उत्पादनात 10 ते 30 टक्के, तर मक्याचे उत्पादन 25 ते 70 टक्क्यांनी घटू शकते, असे त्यात म्हटले आहे. आशियातील कृषी आणि अन्न व्यवस्थेशी संबंधित संकटे हळूहळू वाढतील, हवामान बदलासह संपूर्ण प्रदेशावर वेगवेगळे परिणाम होतील, असा इशारा अहवालात दिला आहे.

या अहवालात लोकांना त्याच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आणि त्यांच्या राहणीमानात सुधारणा करण्याच्या मार्गांचे वर्णन केले आहे. सुरत, इंदूर आणि भुवनेश्वर ही भारतीय शहरे हवामान बदलाला कोणत्या मार्गाने सामोरे जात आहेत याचाही या अहवालात उल्लेख आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात