शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार
2
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: PSI परीक्षेचा निकाल जाहीर, कोणी पटकावला प्रथम क्रमांक?
3
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
4
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
5
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
6
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
7
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
8
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
9
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
10
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
11
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
12
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
13
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

कथित गोरक्षकांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले पेहलू खान यांच्या मारेक-यांना क्लीन चीट, मृत्यूपुर्वी सांगितली होती नावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 1:05 PM

1 एप्रिल रोजी दूधव्यवसायिक असलेले पेहलू खान गाई-गुरांची खरेदी करुन राजस्थानहून हरियाणाला चालले होते. यावेळी काही कथित गोरक्षकांनी गाईंची हत्या करण्यासाठी घेऊन जात असल्याचा आरोप करत पेहलू खान आणि इतरांना जबरदस्त मारहाण केली होती. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पेहलू खान यांचा दोन दिवसांनी मृत्यू झाला होता.

ठळक मुद्देकथित गोरक्षकांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले पेहलू खान यांच्या मारेक-यांना राजस्थान पोलिसांकडून क्लीन चीट दिली 1 एप्रिल रोजी दूधव्यवसायिक पेहलू खान यांना गाईंची तस्करी करत असल्याचा आरोपाखाली मारहाण करण्यात आली होतीदोन दिवसांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता

जयपूर, दि. 14 - कथित गोरक्षकांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले पेहलू खान यांच्या मारेक-यांना राजस्थान पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. विशेष म्हणजे पेहलू खान यांनी मृत्यूपुर्वी या सहा मारेक-यांची नावे उघड केली होती. 1 एप्रिल रोजी दूधव्यवसायिक असलेले पेहलू खान गाई-गुरांची खरेदी करुन राजस्थानहून हरियाणाला चालले होते. यावेळी काही कथित गोरक्षकांनी गाईंची हत्या करण्यासाठी घेऊन जात असल्याचा आरोप करत पेहलू खान आणि इतरांना जबरदस्त मारहाण केली होती. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पेहलू खान यांचा दोन दिवसांनी मृत्यू झाला होता. 

पेहलू खान यांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला होता. यावेळी पेहलू खान यांनी हुकूम चंद, नवीन शर्मा, जगमल यादव, ओम प्रकाश, सुधीर आणि राहुल सैनी यांनी हल्ला केल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. मात्र आता पोलिसांनी या सहा जणांना क्लीन चीट दिली आहे.

 

अलवरचे पोलीस अधिक्षक राहुल प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व सहा आरोपींवर पाच हजार रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. मात्र आता तपास पथकाने क्लीन चीट दिली असल्याने हे बक्षीस मागे घेण्यात येत आहे. जुलै महिन्यात अलवर पोलिसांकडून तपास काढत राजस्थान सीआयडीकडे तपास सोपवण्यात आला होता. 

सीआयडीने अलवर पोलिसांना तपास अहवाल पाठवला असून, तपासादरम्यान आरोपी दोषी असल्याचं सिद्ध झालं नसल्याने आरोपी म्हणून त्याचं नाव काढण्यात यावं असं सांगण्यात आलं आहे. गौशाळेचे कर्मचारी आणि काही पोलिसांचा जबाब घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पेहलू खान यांच्या मुलाने हा धोका असल्याचं सांगत आम्ही पुन्हा तपास करण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं आहे. 

पोलिसांनी पेहलू खान यांच्या हत्येप्रकरणी इतर सात जणांना अटक केली होती. यामधील पाच जणांना जामीन मिळाला आहे. 

काय आहे नेमकी घटना?हरियाणातील मेवात येथील दुग्धउत्पादक शेतकरी पेहलू खान (५५) यांनी दुभती म्हैस विकत घेण्याऐवजी दुभती गाय विकत घेतली आणि त्यांना तस्कर समजून कथिक गोरक्षकांनी ठारच मारले.  पेहलू खान यांना गाईंची तस्करी करत असल्याच्या आरोपाखाली काही जणांकडून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या पेहलू खान यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.  पेहलू खान यांच्यासहित एकूण पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. 

पेहलू खान यांना एक म्हैस विकत घ्यायची होती.  दुग्धउत्पादक शेतकरी असल्याने रमजान महिन्यात दुध उत्पादन वाढवून जास्तीत जास्त नफा मिळवावा यासाठी ते प्रयत्न करत होते. पण पेहलू खान यांना विक्रेत्याने त्यांच्यासमोर एका गाईचं 12 लिटर दूध काढून दाखवलं, आणि त्यांनी ती गाय विकत घेण्याचा निर्णय घेतला. विक्रेत्याने माफक किंमत सांगितल्याने पेहलू खान तयार झाले आणि ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. पेहलू खान यांचा मुलगा इरशादही त्यादिवशी दुस-या पिकअप ट्रकमधून प्रवास करत होता. त्या ट्रकमध्ये दोन गाई आणि वासरं होती. "वडिलांना गाडीतून खेचून बाहेर काढत मारहाण करण्यात आली. त्यांना काठ्या, पट्ट्याने मारहाण सुरु होती. त्यांच्यासोबत इतर चौघांनाही मारण्यात आलं", असं इरशाद सांगतो. "घटनेनंतर अर्ध्या तासाने पोलीस पोहोचले", असल्याचा आरोप इरशादने केला होता. तोपर्यंत वडील पूर्णपणे बेशुद्ध झाले होते.  पेहलू खान हरियाणाचे रहिवासी होते. पशु मेळामधून त्यांनी या गाईंना विकत घेतलं होतं. त्यांनी कागदपत्रं सादर करुनही त्यांना मारहाण करण्यात आली. गाडीतून बाहेर खेचून, पाठलाग करुन त्यांना मारहाण करण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी त्यांच्या पिक अप व्हॅनचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी आपले वडील आणि इतरांकडील 35 हजार रुपयेही लुटून नेण्यात आल्याचा आरोप इरशादने केला. 

टॅग्स :Crimeगुन्हा