शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

ये हादसों का शहर है...

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

अपघाताची जीवघेणी मालिका सुरूच : ४० तासांत ८ बळी

अपघाताची जीवघेणी मालिका सुरूच : ४० तासांत ८ बळी
नागपूर : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अपघाताची जीवघेणी मालिका सुरूच आहे. बेदरकारपणे वाहन चालविणारे निरपराध नागरिकांचे बळी घेत आहेत. या दोन अपघातामुळे गेल्या ४० तासांत अपघातात ठार झालेल्यांची संख्या ८ झाली आहे.
मोरभवन परिसरात सोमवारी दुपारी ४.३० च्या सुमारास भीषण अपघात घडला. लकीनारायण कालीचरण कुर्मी (वय ६४) आणि त्यांची पत्नी लीलाबाई (वय ६०, दोघेही रा. इंदिरा मातानगर, एमआयडीसी) उपचारासाठी मेडिकलमध्ये गेले होते. हे गरीब दाम्पत्य घरी जाण्यासाठी मोरभवन बसस्थानकावर आले. दोघेही एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडत असताना एसटी बसने (एमएच ४०/एन ८७१८) लीलाबाईंना चिरडले. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. सीताबर्डी पोलिसांनी लकीनारायण कुर्मी यांच्या तक्रारीवरून आरोपी बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
सोमवारी क्वॉर्टर परिसरातील रहिवासी रामदास सोनबाजी गाडगे (वय ६४) हे पत्नीसह रविवारी सकाळी ११.१५ ला चिंचभुवन परिसरात लग्नाला जात होते. सोनेगावच्या उड्डाणपुलावर त्यांच्या प्लेझर दुचाकीला एका कारचालकाने कट मारला. त्यामुळे गाडगे दाम्पत्य खाली पडून जबर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता मेडिकलमध्ये नेले असता सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास डॉक्टरांनी रामदास गाडगे यांना मृत घोषित केले. जितेंद्र नामदेवरावजी डांगोरे (वय ३६, रा. पारडसिंगा,ता, काटोल) यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे.

---
कसे थांबणार अपघात
एकीकडे शहरातील रस्ते गुळगुळीत करण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे बेदरकारपणे वाहन चालविणारे या रस्त्यावर रक्ताच्या चिरकांड्या उडवीत आहेत. अवघ्या ४० तासांत उपराजधानीच्या विविध भागात एका चिमुकल्यासह ८ जणांचे बळी गेले तर, ९ जण गंभीर जखमी आहेत. मृतात धमतीर(छत्तीसगड)मधील लोढा परिवारातील ४ सदस्य, दिघोरी नाक्याजवळचा सम्यक देवीदास मेश्राम, फौजिया रशीद अली ही यशोधरानगरातील तरुणी तसेच उपरोक्त दोघांचा समावेश आहे. जखमींमध्ये लोढा परिवारातील ५ जण, फौजियाच्या बहिणीचा पती, रामदास गाडगे यांची पत्नी आणि गोरक्षणसमोर भरधाव कारचालकाने धडक दिलेले दोघे दुचाकीस्वार यांचा समावेश आहे. या अपघाताच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, कसे थांबणार अपघात, असा प्रश्न चर्चेला आला आहे.