शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

CAA Protest: 'हाँगकाँग पॅटर्न' जोरात; इंटरनेट बंदीवर आंदोलकांनी शोधला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 11:02 IST

सरकार, प्रशासनाच्या इंटरनेट बंदीवर आंदोलकांचा तोडगा

चेन्नई: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशातलं वातावरण तापलं आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू असून काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र आंदोलकांनी यावरही तोडगा शोधून काढला आहे. आंदोलकांनी इंटरनेटशिवाय चालणाऱ्या ब्रिजफाय, फायर चॅटसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर सुरू केला आहे. चीनविरोधात रस्त्यावर उतरलेल्या हाँगकाँगमधील आंदोलकांनीदेखील याच मार्गाचा वापर केला होता. हाँगकाँमध्ये आंदोलनादरम्यान ब्रिजफाय, फायर चॅटचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला होता. ब्रिजफाय, फायर चॅटच्या मदतीनं ब्लू टूथच्या माध्यमातून काही अंतरावरील व्यक्तींना मेसेज करता येतात. आसाम आणि मेघालयात १२ डिसेंबरपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून ब्रिजफाय डाऊनलोड करण्याचं प्रमाण ८० टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी अमेरिकन अ‍ॅप इंटेलिजन्स फर्म ऐपोटॉपियानं दिली आहे. आसाम आणि मेघालयानंतर देशाच्या इतर राज्यांमध्येही सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरू झाली. त्यामुळे आसाम आणि मेघालयापाठोपाठ इतर अनेक राज्यांमध्येही इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. त्यामुळे या राज्यांतही ब्रिजफाय, फायर चॅटसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. इंटरनेट सेवा खंडित होण्याच्या आधी देशात दिवसाकाठी सरासरी २५ जण ब्रिजफाय अ‍ॅप डाऊनलोड करायचे. १३ डिसेंबरनंतर यात १०० टक्क्यांनी वाढ झाली. सध्या दर दिवशी जवळपास २६०९ जण ब्रिजफाय अ‍ॅप डाऊनलोड करत आहेत. ब्रिजफाय अ‍ॅपच्या अ‍ॅक्टिव्ह यूजर्सची संख्यादेखील ६५ पटीनं वाढली आहे. ११ डिसेंबरच्या आधी ब्रिजफाय अ‍ॅप १८४ जण वापरायचे. १२ डिसेंबरपासून हा आकडा वाढून १२,११८ वर पोहोचला आहे. एकट्या दिल्लीत या अ‍ॅपच्या डाऊनलोड आणि वापराचं प्रमाण ३० पटीनं वाढलं आहे.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक