शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

शहरं रक्ताळली.. NH 4 डागाळला ! पुणे, कोल्हापूर, धारवाड अन् बेंगलोर हत्याकांड एकाच 'हायवे"वर

By सचिन जवळकोटे | Updated: September 6, 2017 14:47 IST

दक्षिण भारतातील विकासाचा महामार्ग म्हणून ओळखला जाणारा 'नॅशनल हायवे क्रमांक चार' सामाजिक कार्यकर्त्यांच्या रक्तानं डागाळला जात असल्याचं स्पष्ट झालंय.

ठळक मुद्देचार शहरात गोळ्या झाडून केली गेलेली हत्या पाहता 'हायवे'शी संबंधित हा योगायोग म्हणायचा की सुनियोजित कट, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

सातारा, दि. 6 - दक्षिण भारतातील विकासाचा महामार्ग म्हणून ओळखला जाणारा 'नॅशनल हायवे क्रमांक चार' सामाजिक कार्यकर्त्यांच्या रक्तानं डागाळला जात असल्याचं स्पष्ट झालंय. पुणे ते बेंगलोर दरम्यानच्या चार शहरात गोळ्या झाडून केली गेलेली हत्या पाहता 'हायवे'शी संबंधित हा योगायोग म्हणायचा की सुनियोजित कट, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

चार वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात पाठीमागून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात शेवटपर्यंत खरे खुनी सापडलेच नाहीत. दाभोलकर हे मूळचे साता-याचे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या सातारा शहरातील नागरिकांना चार वर्षांनंतरही दाभोलकर हत्येच्या वेदना लपविता आलेल्या नाहीत.

त्यानंतर कोल्हापूर येथे ‘शिवाजी कोण होता ?’ या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे यांचीही सकाळी फिरायला गेल्यानंतर गोळ्या झाडूनच हत्या करण्यात आली. त्या प्रकरणातीलही खरे खुनी समाजासमोर अद्याप आलेले नाहीत. विशेष म्हणजे, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच कोल्हापूर शहर आहे. पानसरे यांच्या खुनाची चर्चा अजून विरली नाही, तोच धारवाड येथे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचाही गोळ्या झाडूनच खून करण्यात आला. धारवाड हे शहरही पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच वसले आहे. 

या तीन खुनांची दहशत देशभर माजलेली असतानाच मंगळवारी बेंगलोर येथे पत्रकार गौरी लंकेश यांचीही गोळ्या झाडूनच हत्या करण्यात आली. पुण्यातून निघालेला हायवे क्रमांक चार बेंगलोरमध्ये समाप्त होतो. त्यामुळे दाभोलकरांच्या रुपात पुण्यातून सुरू झालेली हत्येची मालिका बेंगलोरमध्ये संमाप्त झाली, असे म्हणायचे की, यापुढेही डागाळलेला हा हायवे रक्ताळलेलाच दिसणार..याची भीतीयुक्त चर्चा साता-यात सुरू झाली आहे.