शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

अत्याचाराविरोधात CISF च्या 200 जवानांची उच्च न्यायालयात धाव

By admin | Updated: April 3, 2017 11:59 IST

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी (सीआयएसएफ) वारंवार आपल्याला होणारा त्रास, खराब जेवण, कठिण परिस्थितींमध्ये करावं लागणार काम, वेळेत पगार न मिळणे याची तक्रार केली आ

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 3 - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी (सीआयएसएफ) वारंवार आपल्याला होणारा त्रास, खराब जेवण, कठिण परिस्थितींमध्ये करावं लागणार काम, वेळेत पगार न मिळणे याची तक्रार केली आहे. खात्याअंतर्गत तक्रार करण्यापासून ते पंतप्रधानांना पत्र लिहिण्यापर्यंत सर्व काही प्रयत्न करत जवानांनी आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता बंगळुरुमधील कॅम्पे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या 200 जवानांनी आपल्यावर होणा-या अत्याचाराविरोधात आवाज उठवत कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जवानांच्या तक्रारींवरुन केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाला कशा प्रकारच्या सुविधा मिळत असून, कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं समोर आलं आहे. 
 
(केरळमध्ये CRPF च्या 400 जवानांना अन्नातून विषबाधा)
 
गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 3 वर्षात निमलष्करी दलाच्या 344 जवानांनी आत्महत्या केली आहे. यामधील 15 जवानांनी वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यातच आत्महत्या केली आहे. आकडेवारीनुसार आत्महत्या करणा-या जवानांमधील 15 टक्के म्हणजे 53 जवान सीआयएसएफचे होते. याशिवाय 25 घटना अशा आहेत जिथे जवानांनी आपल्या सहका-याची हत्या केली किंवा त्याच्यावर गोळी झाडली. अशा घटनांमध्ये सामील असणा-या जवानांमधील 13 जवान सीआयएसएफचे होते. 
 
याचवर्षी जानेवारी महिन्यात कॅम्पे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका जवानाने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी खासगी कारणांमुळे जवानाने आत्महत्या केल्याचं सांगितलं होतं. कॅम्पे गौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील असुविधांवर बोलताना एका सीआयएसएफ जवानाने सांगितलं की, "जेवणाचा दर्जा अत्यंत खराब आहे. आम्हाला शिफ्टदरम्यान एकही ब्रेक दिला जात नाही. आम्हाला घर तसंच वाहतूक भत्ताही मिळत नाही. वरिष्ठांकडून आम्हाला योग्य वागणूकही मिळत नाही. तसंच हवं तेव्हा आमचा पगार कापला जात असतो".