शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विमानतळाची सुरक्षा सर्वोत्तम, जागतिक संस्थेकडून CISF चं कौतुक

By admin | Updated: July 3, 2017 12:14 IST

दिल्ली विमानतळाची सुरक्षा लॉज एंजेलिस, दुबई आणि पॅरिसमधील विमानतळांपेक्षाही उत्तम आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) पुरवण्यात येणारी सुरक्षा जगातील सर्वोत्तम सुरक्षा आहे. वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने सीआयएसएफला प्रमाणपत्र दिलं असून लवकरच त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दल सीआयएसएफने राखलेला दर्जा सर्वोत्तम असून वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून त्यांची दखल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वतंत्रपणे कार्यरत असणा-या वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने आतापर्यंत खासगी क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांना कामांचा दर्जा पाहता सन्मानित केलं आहे. 6 जुलै रोजी वार्षिक कार्यक्रमात सीआयएसएफला अवॉर्ड देत सन्मानित करण्यात येणार आहे. 
 
दिल्ली विमानतळावरुन दरवर्षी किमान 56 दशलक्ष प्रवासी प्रवास करत असतात. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेने विमानतळ सर्व्हिस रेटिंगमध्ये दिल्ली विमानतळाचा दर्जा उत्तम असल्याचं सांगितलं होतं. दिल्ली विमानतळाची सुरक्षा लॉज एंजेलिस, दुबई आणि पॅरिसमधील विमानतळांपेक्षाही उत्तम असल्याची नोंद यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच आता वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून सीआयएसफचं कौतुक करण्यात आलं आहे. यानिमित्ताने अजून एक मानाचा तुरा दिल्ली विमानतळ आणि सीआयएसफच्या शिरपेचात रोवला जाणार आहे. 
 
सीआयएसएफचे महासंचालक ओ पी सिंह यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "सेवा आणि सुरक्षेच्या बाबतीत जवानांनी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. विमानतळावर रोज हजारो प्रवाशांचा सामना करताना, धोक्यांची काळजी घेत असताना जवानांनी नेहमीच आपल्यातील नेतृत्वगुण दाखवत उत्तम कामगिरी केली आहे". 
 
दिल्ली विमानतळावर रोज 4000 सीआयएसएफ जवान दिवसरात्र सुरक्षेसाठी तैनात असतात. "सुरक्षेसाठी तैनात जवानांना अनेकदा जेवण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठीही वेळ नाही मिळत. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी ते सतत तत्पर असताता", असं एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे. 
 
दिल्लीसह मुबई, चेन्नई आणि कोलकाता विमानतळ संवेदनशील असून नेहमी रडारवर असतात. दहशतवादी कारवाया करण्यासाठी नेहमीच या विमानतळांना टार्गेट केलं जातं. त्यामुळे यांची सुरक्षा जास्त महत्वाची असते.