शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दिल्ली विमानतळाची सुरक्षा सर्वोत्तम, जागतिक संस्थेकडून CISF चं कौतुक

By admin | Updated: July 3, 2017 12:14 IST

दिल्ली विमानतळाची सुरक्षा लॉज एंजेलिस, दुबई आणि पॅरिसमधील विमानतळांपेक्षाही उत्तम आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) पुरवण्यात येणारी सुरक्षा जगातील सर्वोत्तम सुरक्षा आहे. वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने सीआयएसएफला प्रमाणपत्र दिलं असून लवकरच त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दल सीआयएसएफने राखलेला दर्जा सर्वोत्तम असून वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून त्यांची दखल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वतंत्रपणे कार्यरत असणा-या वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने आतापर्यंत खासगी क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांना कामांचा दर्जा पाहता सन्मानित केलं आहे. 6 जुलै रोजी वार्षिक कार्यक्रमात सीआयएसएफला अवॉर्ड देत सन्मानित करण्यात येणार आहे. 
 
दिल्ली विमानतळावरुन दरवर्षी किमान 56 दशलक्ष प्रवासी प्रवास करत असतात. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेने विमानतळ सर्व्हिस रेटिंगमध्ये दिल्ली विमानतळाचा दर्जा उत्तम असल्याचं सांगितलं होतं. दिल्ली विमानतळाची सुरक्षा लॉज एंजेलिस, दुबई आणि पॅरिसमधील विमानतळांपेक्षाही उत्तम असल्याची नोंद यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच आता वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून सीआयएसफचं कौतुक करण्यात आलं आहे. यानिमित्ताने अजून एक मानाचा तुरा दिल्ली विमानतळ आणि सीआयएसफच्या शिरपेचात रोवला जाणार आहे. 
 
सीआयएसएफचे महासंचालक ओ पी सिंह यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "सेवा आणि सुरक्षेच्या बाबतीत जवानांनी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. विमानतळावर रोज हजारो प्रवाशांचा सामना करताना, धोक्यांची काळजी घेत असताना जवानांनी नेहमीच आपल्यातील नेतृत्वगुण दाखवत उत्तम कामगिरी केली आहे". 
 
दिल्ली विमानतळावर रोज 4000 सीआयएसएफ जवान दिवसरात्र सुरक्षेसाठी तैनात असतात. "सुरक्षेसाठी तैनात जवानांना अनेकदा जेवण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठीही वेळ नाही मिळत. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी ते सतत तत्पर असताता", असं एका वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे. 
 
दिल्लीसह मुबई, चेन्नई आणि कोलकाता विमानतळ संवेदनशील असून नेहमी रडारवर असतात. दहशतवादी कारवाया करण्यासाठी नेहमीच या विमानतळांना टार्गेट केलं जातं. त्यामुळे यांची सुरक्षा जास्त महत्वाची असते.