शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

अरुणाचलच्या सीमेवर चिनी सैन्याची जमवाजमव, भारतीय सैन्याला हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 05:34 IST

लडाखप्रमाणे या ठिकाणाहूनही घुसखोरी करण्याचा चीनचा कट असू शकतो, असे गृहीत धरून भारतही तयारीला लागला आहे.

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनच्या सैन्याने मोठ्या प्रमाणावर जमवाजमव सुरू केल्याने भारतीय लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. एलएसीजवळील केवळ २० किलोमीटर अंतरावर चीनने बांधकामही सुरू केल्याने भारताच्या बाजूने सतर्कता बाळगण्यात येत आहे. लडाखप्रमाणे या ठिकाणाहूनही घुसखोरी करण्याचा चीनचा कट असू शकतो, असे गृहीत धरून भारतही तयारीला लागला आहे.अरुणाचल प्रदेशच्या असाफिला, तुतिंग, चांग त्से व फिशटेल-२ सेक्टरमध्ये चीनच्या सैन्याची जमवाजमव सुरू आहे. विशेष म्हणजे हा भाग एलएसीपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर आहे व तेथे चीनने काही बांधकामही सुरू केलेले आहे. या ठिकाणी चीनने कोणतीही आगळीक केली तरी भारत त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे व भारतानेही या भागात आपली तैनाती वाढवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे लडाखजवळील स्पांगूर गॅपमध्येही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. तेथे चीनने रणगाडे, तोफा व सैनिकांची तैनाती केली आहे. भारतानेही आपल्या बाजूने तेथे पूर्ण सज्जता केली आहे. त्यापाठोपाठ आता अरुणाचलातही दोन्ही सैन्य समोरासमोर उभे राहण्याची शक्यता आहे.संरक्षणमंत्री : भारतीय जवान सज्जभारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. ते म्हणाले, परिस्थिती पाहता यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. चीनने मोठ्या संख्येत लष्कर तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे, असेही ते म्हणाले.लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत व चीनच्या सैनिकांत रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्या वेळी चीनचे ६० पेक्षा अधिक सैनिक भारताने ठार केल्याचे आता समोर आले आहे. तो कट भारताने हाणून पाडल्यानेच चीनकडून आता अरुणाचलात दुसरा कट रचला जातोय, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.चीनचे सैनिक गस्त घालण्यासाठी एलएसीच्या अगदी जवळ येत असल्याचेही निरीक्षण भारताने नोंदवलेले आहे. तसेच चीनकडून होत असलेल्या बांधकामाचीही गंभीर नोंद घेतलेली आहे.काही वर्षांपूर्वी चीनने डोकलाम भागात भूतानच्या भूभागावर रस्ते बांधल्याने भारताने तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होत आहे, असेही भारताने म्हटले होते.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीन