शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

अरुणाचलच्या सीमेवर चिनी सैन्याची जमवाजमव, भारतीय सैन्याला हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 05:34 IST

लडाखप्रमाणे या ठिकाणाहूनही घुसखोरी करण्याचा चीनचा कट असू शकतो, असे गृहीत धरून भारतही तयारीला लागला आहे.

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनच्या सैन्याने मोठ्या प्रमाणावर जमवाजमव सुरू केल्याने भारतीय लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. एलएसीजवळील केवळ २० किलोमीटर अंतरावर चीनने बांधकामही सुरू केल्याने भारताच्या बाजूने सतर्कता बाळगण्यात येत आहे. लडाखप्रमाणे या ठिकाणाहूनही घुसखोरी करण्याचा चीनचा कट असू शकतो, असे गृहीत धरून भारतही तयारीला लागला आहे.अरुणाचल प्रदेशच्या असाफिला, तुतिंग, चांग त्से व फिशटेल-२ सेक्टरमध्ये चीनच्या सैन्याची जमवाजमव सुरू आहे. विशेष म्हणजे हा भाग एलएसीपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर आहे व तेथे चीनने काही बांधकामही सुरू केलेले आहे. या ठिकाणी चीनने कोणतीही आगळीक केली तरी भारत त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे व भारतानेही या भागात आपली तैनाती वाढवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे लडाखजवळील स्पांगूर गॅपमध्येही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. तेथे चीनने रणगाडे, तोफा व सैनिकांची तैनाती केली आहे. भारतानेही आपल्या बाजूने तेथे पूर्ण सज्जता केली आहे. त्यापाठोपाठ आता अरुणाचलातही दोन्ही सैन्य समोरासमोर उभे राहण्याची शक्यता आहे.संरक्षणमंत्री : भारतीय जवान सज्जभारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. ते म्हणाले, परिस्थिती पाहता यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. चीनने मोठ्या संख्येत लष्कर तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे, असेही ते म्हणाले.लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत व चीनच्या सैनिकांत रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्या वेळी चीनचे ६० पेक्षा अधिक सैनिक भारताने ठार केल्याचे आता समोर आले आहे. तो कट भारताने हाणून पाडल्यानेच चीनकडून आता अरुणाचलात दुसरा कट रचला जातोय, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.चीनचे सैनिक गस्त घालण्यासाठी एलएसीच्या अगदी जवळ येत असल्याचेही निरीक्षण भारताने नोंदवलेले आहे. तसेच चीनकडून होत असलेल्या बांधकामाचीही गंभीर नोंद घेतलेली आहे.काही वर्षांपूर्वी चीनने डोकलाम भागात भूतानच्या भूभागावर रस्ते बांधल्याने भारताने तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे भारताच्या सिलीगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होत आहे, असेही भारताने म्हटले होते.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीन