शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

1998 साली कारगिलमध्ये होते चिनी सैन्य ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 13:51 IST

1999 साली कारगिलमध्ये युद्ध लढले गेले. पण त्याच्या एकवर्षआधी 1998 साली कारगिलमध्ये चिनी सैनिकांना पाहण्यात आले होते.

ठळक मुद्देएकवर्षआधी 1998 साली कारगिलमध्ये चिनी सैनिकांना पाहण्यात आले होते. 25 ऑगस्ट 1998 रोजी यासंबंधीचा अहवाल त्या भागाच्या जनरल कमांडीग ऑफीसर जेओसींना पाठवला होता.

नवी दिल्ली, दि. 26 - भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली कारगिलमध्ये चौथे युद्ध लढले गेले. पण त्याच्या एकवर्षआधी 1998 साली कारगिलमध्ये चिनी सैनिकांना पाहण्यात आले होते. त्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात लष्कराने तयार केलेल्या नऊ पानी गुप्तचर अहवालात चिनी सैनिक दिसल्याचा उल्लेख आहे. कारगिल युद्ध संपल्यानंतर 121 इनफँट्री ब्रिगेडचे ब्रिगेडीयर सुरींदर सिंह यांना गोपनीय माहिती लीक केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले होते. 

ब्रिगेडीयर सिंह यांनी 25 ऑगस्ट 1998 रोजी यासंबंधीचा अहवाल त्या भागाच्या जनरल कमांडीग ऑफीसर जेओसींना पाठवला होता. ब्रिगेडीयर सिंह यांनी त्यांच्या निलंबनाला आव्हान दिले असून, चंदीगडच्या लष्करी लवादासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. मे 1999 साली या भागात भारत -पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटले. 26 जुलै 1999 रोजी हे युद्ध संपले. ६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. १९६५ आणि १९७१ पेक्षा या युध्दाचे स्वरुप वेगळे होते. 

त्यावेळच्या वरिष्ठ लष्करी अधिका-यांनी ब्रिगेडीयर सिंह यांचा दावा फेटाळून लावला होता. कारगिल युद्धात चीनचा सहभाग असल्याचे आपण पहिल्यांदाच ऐकत आहोत असे त्यावेळी लष्करी अधिका-यांनी म्हटले होते. लष्कराच्या पश्चिम विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल के.जे.सिंह यांनी चीनच्या सहभागाचा दावा फेटाळून लावला. पाकिस्तान काही करत असेल तर, चीन त्यात तात्काळ उडी घेणार नाही असे त्यांनी सांगितले. चीनने असा काही प्रयत्न केला असता तर, पाकिस्तानने नक्कीच त्याचा फायदा उठवला असता. चीनची त्यावेळी भूमिका तटस्थतेची होती असे एका निवृत्त अधिका-यांनी सांगितले. 

1965 आणि 1971 या दोन्ही युद्धांमध्ये भारतीय सैन्य सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. पण कारगिल युद्धाच्यावेळी भारताने आपल्या हद्दीत राहून पाकिस्तानी सैन्याने बळकावलेली ठाणी आणि भूप्रदेश पुन्हा ताब्यात  ताब्यात घेतला. कारगिल युद्धामध्ये भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वोच्च पराक्रम दाखवला. ज्यामुळे शत्रू फक्त  चीत झाला नाही तर, त्याला तिथून पळ काढावा लागला.  या लढाईत तोलोलिंग आणि टायगर हिलवरील ताब्यानंतर कारगिल युद्धाचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने वळले. चार जुलैला भारताने टायगर हिलवर ताबा मिळवला. हा पाकिस्तानसाठी रणनितीक आणि मानसिक दृष्टया मोठा धक्का होता.