शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

India China FaceOff: भारताच्या पवित्र्यानं चीन घाबरला; म्हणे, परस्पर लाभासाठी भारत-चीनने पावले टाकावीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 08:07 IST

लडाखच्या LACवर भारतानं चीनला मागे जाण्यास भाग पाडलं असून, आक्रमक असलेल्या चीनची भारतासंदर्भात भूमिका अचानक बदलली आहे. 

नवी दिल्लीः लडाखमधील रक्तरंजित संघर्षानंतर भारत अन् चीनमधील वाद विकोपाला गेला आहे. चीननं आक्रमकपणा कायम ठेवल्यानं भारतानंही त्याला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. लडाखच्या LACवर भारतानं चीनला मागे जाण्यास भाग पाडलं असून, आक्रमक असलेल्या चीनची भारतासंदर्भात भूमिका अचानक बदलली आहे. भारत-चीनने पावले परस्पर लाभासाठी टाकावीत, असं भारतातले चिनी राजदूत सन विडोंग यांनी म्हणाले आहेत. भारत आणि चीनने परस्पर सहकार्याची अशी पावले उचलावीत, ज्यामुळे या दोघांना फायदा होईल. तसेच अशा गोष्टी करू नयेत ज्यामुळे दोघांना त्रास होईल. दोन्ही बाजूंना मान्य असणारा तोडगा काढण्यासाठी भारत-चीन सीमा विवाद शांततापूर्ण वाटाघाटीद्वारे सोडवावेत, असे निवेदन विडोंग यांनी दिले. चिनी राजदूत म्हणाले, भूतकाळातील सीमा विवाद हा एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. समान चर्चा आणि शांततापूर्ण वाटाघाटीद्वारे योग्य व तार्किक समाधान शोधणे आवश्यक आहे, जे दोन्ही देशांना मान्य असतील.'विडोंग यांनी आपल्या निवेदनाद्वारे भारत आणि चीनमधील मैत्रीपूर्ण संबंधांसाठी तीन सूचना केल्या आहेत. प्रथम भारत आणि चीन हे प्रतिस्पर्धी नव्हे, तर भागीदार देश असले पाहिजेत. दुसरे म्हणजे भारत आणि चीनने संघर्ष नव्हे तर शांतता प्रस्थापित केली पाहिजे,  तिसरे म्हणजे  भारत आणि चीनने परस्पर हितसंबंध जोपासण्यासाठी पावले उचलायला हवीत, जेणेकरून दोघांनाही नुकसान होणार नाही. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चिनी सैन्यांदरम्यान झालेल्या रक्तरंजित चकमकीवरही विडोंग यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, ही अशी परिस्थिती आहे जी भारत किंवा चीनला दोन्ही देशांना पाहायची नाही.  कमांडर स्तरावरील चर्चेत झालेल्या कराराच्या आधारे आता आमच्या सैन्याने माघार घेतली आहे.भारतीयांमध्ये वाढत्या अविश्वासाची चीनला भीती?चीनच्या राजदूतानेही याची दखल घेतली की, गलवानमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांची फसवणूक केल्यानंतर भारतीयांचा चीनवर अविश्वास वाढला आहे. विडोंग यांनी नुकसानीच्या भीतीने चीननं केलेल्या कृत्यासंदर्भात  स्पष्टीकरणही दिलं आहे. ते म्हणाले, गलवान खोऱ्यात नुकत्याच घडलेल्या घटनांनंतर भारतीयांच्या काही घटकांनी भारत-चीन संबंधांबद्दल चुकीची धारणा निर्माण करण्यास सुरुवात केली असून, दोन्ही नेत्यांमध्ये (भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग) यांच्यात झालेल्या सहमतीबद्दल शंका निर्माण झाली आहे. यामुळे द्विपक्षीय संबंधांना बाधा पोहोचत आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन