शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

India China FaceOff: भारताच्या पवित्र्यानं चीन घाबरला; म्हणे, परस्पर लाभासाठी भारत-चीनने पावले टाकावीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 08:07 IST

लडाखच्या LACवर भारतानं चीनला मागे जाण्यास भाग पाडलं असून, आक्रमक असलेल्या चीनची भारतासंदर्भात भूमिका अचानक बदलली आहे. 

नवी दिल्लीः लडाखमधील रक्तरंजित संघर्षानंतर भारत अन् चीनमधील वाद विकोपाला गेला आहे. चीननं आक्रमकपणा कायम ठेवल्यानं भारतानंही त्याला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. लडाखच्या LACवर भारतानं चीनला मागे जाण्यास भाग पाडलं असून, आक्रमक असलेल्या चीनची भारतासंदर्भात भूमिका अचानक बदलली आहे. भारत-चीनने पावले परस्पर लाभासाठी टाकावीत, असं भारतातले चिनी राजदूत सन विडोंग यांनी म्हणाले आहेत. भारत आणि चीनने परस्पर सहकार्याची अशी पावले उचलावीत, ज्यामुळे या दोघांना फायदा होईल. तसेच अशा गोष्टी करू नयेत ज्यामुळे दोघांना त्रास होईल. दोन्ही बाजूंना मान्य असणारा तोडगा काढण्यासाठी भारत-चीन सीमा विवाद शांततापूर्ण वाटाघाटीद्वारे सोडवावेत, असे निवेदन विडोंग यांनी दिले. चिनी राजदूत म्हणाले, भूतकाळातील सीमा विवाद हा एक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. समान चर्चा आणि शांततापूर्ण वाटाघाटीद्वारे योग्य व तार्किक समाधान शोधणे आवश्यक आहे, जे दोन्ही देशांना मान्य असतील.'विडोंग यांनी आपल्या निवेदनाद्वारे भारत आणि चीनमधील मैत्रीपूर्ण संबंधांसाठी तीन सूचना केल्या आहेत. प्रथम भारत आणि चीन हे प्रतिस्पर्धी नव्हे, तर भागीदार देश असले पाहिजेत. दुसरे म्हणजे भारत आणि चीनने संघर्ष नव्हे तर शांतता प्रस्थापित केली पाहिजे,  तिसरे म्हणजे  भारत आणि चीनने परस्पर हितसंबंध जोपासण्यासाठी पावले उचलायला हवीत, जेणेकरून दोघांनाही नुकसान होणार नाही. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चिनी सैन्यांदरम्यान झालेल्या रक्तरंजित चकमकीवरही विडोंग यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, ही अशी परिस्थिती आहे जी भारत किंवा चीनला दोन्ही देशांना पाहायची नाही.  कमांडर स्तरावरील चर्चेत झालेल्या कराराच्या आधारे आता आमच्या सैन्याने माघार घेतली आहे.भारतीयांमध्ये वाढत्या अविश्वासाची चीनला भीती?चीनच्या राजदूतानेही याची दखल घेतली की, गलवानमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांची फसवणूक केल्यानंतर भारतीयांचा चीनवर अविश्वास वाढला आहे. विडोंग यांनी नुकसानीच्या भीतीने चीननं केलेल्या कृत्यासंदर्भात  स्पष्टीकरणही दिलं आहे. ते म्हणाले, गलवान खोऱ्यात नुकत्याच घडलेल्या घटनांनंतर भारतीयांच्या काही घटकांनी भारत-चीन संबंधांबद्दल चुकीची धारणा निर्माण करण्यास सुरुवात केली असून, दोन्ही नेत्यांमध्ये (भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग) यांच्यात झालेल्या सहमतीबद्दल शंका निर्माण झाली आहे. यामुळे द्विपक्षीय संबंधांना बाधा पोहोचत आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन