शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Bharat Jodo Yatra: २ हजार किमी भूभागावर चीनचा कब्जा, सैनिक, लडाखमधील नागरिकांचे म्हणणे ऐका - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 07:35 IST

Bharat Jodo Yatra: मी सेवानिवृत्त सैनिक आणि लडाखमधील नागरिकांना भेटल्यानंतर ते म्हणाले की, चीनने आपली २ हजार किलोमीटर जमीन घेतली आहे. भारतातील अनेक गस्ती चौक्या चीनने बळकावल्या आहेत.

श्रीनगर : मी सेवानिवृत्त सैनिक आणि लडाखमधील नागरिकांना भेटल्यानंतर ते म्हणाले की, चीनने आपली २ हजार किलोमीटर जमीन घेतली आहे. भारतातील अनेक गस्ती चौक्या चीनने बळकावल्या आहेत. सरकारने येथील नागरिकांचे म्हणणे नाकारणे अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे चीनचा आत्मविश्वास वाढेल, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा प्रदान करणे तसेच तिथे लोकशाही प्रक्रिया पुन्हा सुरू करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने सरकारने पहिले पाऊल उचलायला हवे, असे राहुल यांनी सांगितले.

लाल चौकात गांधी यांनी तिरंगा ध्वज फडकाविला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, प्रेम, आपुलकी, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याबाबतीत भूतकाळात ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल मी आता काही भाष्य करणार नाही. मला भविष्यकाळाचे वेध लागले आहेत.

भारत जोडोच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले. लोकांना एकत्र आणणे, द्वेष संपवणे, हे यात्रेचे ध्येय होते. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव आहे... प्रवास इथेच संपत नाही, तर ती पहिली पायरी आहे, ही सुरुवात आहे.- राहुल गांधी, काँग्रेस खासदार

‘घरी आल्यासारखे वाटले’ राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी, युवक अशा सर्वांची मी भेट घेतली. त्यापैकी कोणीही काश्मीरमधील सध्याच्या स्थितीबद्दल समाधानी नाही. आमचे घराणे मूळचे काश्मीरचे आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये येताना मला विलक्षण आनंद झाला. आपल्या घरी आल्यासारखे वाटले. 

३७० कलम...३७० कलम रद्द करण्याबाबतच्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, याबाबत काँग्रेसने आपली भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा द्यायला हवा. लोकशाही प्रक्रिया सुरू होणे हा तेथील जनतेचा मूलभूूत अधिकार आहे.

काश्मीरमध्ये निरपराध लोकांच्या हत्याराहुल  म्हणाले की, काश्मीरमध्ये अद्यापही निरपराध लोकांच्या हत्या सुरू असून, बॉम्बस्फोट घडविले जात आहेत. त्यामुळे काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा झाल्याचा भाजपचा दावा फोल आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राJammu Kashmirजम्मू-काश्मीर