शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

भारताच्या सीमेवर चीनने आणला प्रचंड दारूगोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:21 IST

भारत, चीन व भूतानच्या सीमेवर असलेल्या डोकलाम भागात भारत आणि चिनी सैन्यामध्ये महिनाभर तणाव सुरू असतानाच, चीनने आता तिबेट उत्तर भागामध्ये

- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत, चीन व भूतानच्या सीमेवर असलेल्या डोकलाम भागात भारत आणि चिनी सैन्यामध्ये महिनाभर तणाव सुरू असतानाच, चीनने आता तिबेट उत्तर भागामध्ये प्रचंड प्रमाणात दारूगोळा आणून ठेवल्याचे वृत्त आहे. मुख्य म्हणजे हे वृत्त चीन सरकारच्या मालकीच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनेच दिले आहे.तिथे दारूगोळा का नेण्यात आला, त्याचे कोणतेही कारण चीनतर्फे देण्यात आले नाही, हे विशेष.चीनने हा दारूगोळा जिथे आणून ठेवला आहे, तो भाग सिक्किमपासून ७०० किलोमीटर अंतरावर आहे. आतापर्यंत जिथे दारूगोळा आणण्याची आवश्यकता भासली नाही, तिथे चीनने तो आणल्याने तणावात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. चीननं या भागात मोठ्या प्रमाणात रस्तेबांधणी करीत आहे. त्यामुळे रस्त्यानेही ७00 किलोमीटरचे उत्तर तिबेट ते सिक्किमचे अंतर सात तासांवर आले आहे. शिवाय गेल्या महिन्यापासून सिक्किम डोकलाम भागात चीनने रस्तेबांधणी सुरू केली आहे. किंबहुना त्यातूनच भारत व चीन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने जे वृत्त प्रसिद्ध केले आहे, त्यानुसार कुनलुन या डोंगराळ प्रदेशात गेल्या महिन्यामध्ये दारूगोळा रवाना झाला आहे. हा भाग उत्तर तिबेटमध्ये येतो. मध्यंतरी याच भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट कमांडने युद्धसराव केल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. चीनने आता सिक्किममधील वादानंतर काश्मीरमधील लडाख, अरुणाचल प्रदेशातील तवांग या भागांबरोबरच भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेविषयीच वाद निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. सिक्किममधील डोकलाम भागात घुसखोरी करणाऱ्या चीनने तेथून भारतानेच माघार घ्यावी, असे अनेकदा सांगितले आहे. डोकलाम हा भाग आमचाच आहे, अशी भूमिका चीनने घ्यायला सुरुवात केली आहे. भारताने माघार घेतली, तरच भारताशी संवाद सुरू होऊ शकतो, असे सांगत चीनने तसे न झाल्यास तणाव कायमच राहील, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. चीनच खरा शत्रू : मुलायमसिंगदोन देशातील तणावाचे पडसाद बुधवारी लोकसभेतही उमटले. शून्य प्रहरात हा विषय उपस्थित करताना माजी संरक्षणमंत्री व समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांनी चीनने भारतावर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, भारताचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान नसून चीन आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. चीन आता पाकिस्तानच्या मदतीने भारतात अस्थिरता निर्माण करीत असल्याचेही यादव म्हणाले. चीनच्या कुरापतींबाबत यादव म्हणाले, की, चीन आता भारतातील सिक्किम तसेच शेजारचा छोटा देश असलेल्या भूतानवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहे. अशा वेळी तिबेटबाबत बोटचेपी भूमिका घेता कामा नये. कोणत्याही परिस्थिती तिबेट चीनच्या ताब्यात देता कामा नये होते. तिबेट चीनच्या ताब्यात देऊन मोठी चूक केली गेली. आता भारताने तिबेटच्या स्वातंत्र्याचे आक्रमकपणे समर्थन केले पाहिजे. त्यासाठी भारताने दलाई लामा यांची सर्वतोपरी मदतही केली पाहिजे.