शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

चीनने माझ्या भविष्याची चिंता करु नये - दलाई लामा

By admin | Updated: April 8, 2017 18:42 IST

तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला खडे बोल सुनावत आपल्या भविष्याचा निर्णय अनुयायी करतील चीन नाही असं स्पष्ट केलं आहे

ऑनलाइन लोकमत
तवांग, दि. 8 - तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला खडे बोल सुनावत आपल्या भविष्याचा निर्णय अनुयायी करतील चीन नाही असं स्पष्ट केलं आहे. दलाई लामा यांनी चीनचं नाव न घेता आपल्यानंतर आपलं पद कायम राहणार की नाही हे माझे अनुयायी ठरवतील दुसरं कोणी नाही असं म्हटलं आहे. दलाई लामा यांनी चीनवर निशाणा साधला असून दलाई लामांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. दलाई लामांनी चीनच्या दाव्याला फेटाळत खडे बोल सुनावले आहेत. 
 
दलाई लामा यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे अनुयायांना संबोधित केलं. तिबेटियन बौद्धांसाठी तवांग महत्वाची जागा मानली जाते. आपला उत्तराधिकारी कुठे जन्माला येईल याची माहिती आपल्याकडे असल्याच्या वृत्ताला त्यांनी फेटाळलं आहे. जेव्हा त्यांनी तुमचा उत्तराधिकारी एक महिला असू शकते का ? असं विचारलं असता हेदेखील शक्य आहे असं त्यांना सांगितलं आहे.
 
(दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड)
(दलाई लामा हे भ्रामक अभिनेते- चीन)
(भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन चिडण्याची शक्यता)
 
तिबेटियन बौद्धांच्या परंपरेनुसार अध्यात्मिक गुरुच्या निधनानंतर वरिष्ठ भिक्षुक त्या तरुण मुलाची ओळख करुन देतात ज्याच्यामध्ये दिवंगत गुरुचा अवतार असल्याची लक्षणं दिसतात. चीनमध्ये नैसर्गिक आपत्ती आली असताना दलाई लामा मात्र अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर आहेत. अरुणाचल प्रदेश हा विवादास्पद भाग असून तो आपल्या अख्त्यारित येतो असा चीनचा पहिल्यापासून दावा आहे. 
 
तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांचा अरुणाचल प्रदेश प्रवेश रोखू न शकल्याने चिडलेल्या चीनने भारताला ही तुमची मोठी चूक असल्याचं सांगितलं आहे. सीमारेषेवरील राज्यात दलाई लामांना प्रवेश देण चूक असल्याचं सांगत चीन भारताविरोधातील आपला राग व्यक्त करत आहे. "दलाई लामांना अरुणाचल प्रदेशात प्रवेश दिल्याने द्विपक्षीय संबंधांवर याचा फरक पडेल", अशी धमकीचं चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी दिली होती. अरुणाचल प्रदेशात दलाई लामांनी कोणतीही हालचाल करणं चीनच्या पचनी पडत नसून त्यांनी वारंवार यासंबंधी भारताकडे आपला निषेध व्यक्त केला असल्याचंही ते बोलले आहेत.
 
गेल्यावर्षीच धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवत परवनागी दिली होती. भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन मात्र चिडण्याची शक्यता होती, त्याप्रमाणे चीनने आपला राग व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्याही अरुणाचल प्रदेश दौ-याला चीनने याअगोदर विरोध केला होता. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या आक्षेपाला फेटाळलं होता. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक असल्याचं भारताने स्पष्ट सांगितलं होतं.
 
चीनने 2009 मध्येदेखील दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला विरोध केला होता. चीन विरुद्धचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा याच दिवशी १७ मार्च १९५९ रोजी भारतात येण्यासाठी निघाले होते. हिमालयीन पर्वतरागांमधून १५ दिवस पायी प्रवास करुन चीनी सैनिकांना चुकवत दलाई लामा भारतात दाखल झाले होते.
 
अरुणाचल प्रदेश भारत आणि चीनमधील वादग्रस्त भाग असल्याने अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याचा आपण विरोध करतो असं चीनने म्हटलं होतं. तवांग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी वर्मा यांनी हा दौरा केला होता. 
चीनने अगोदरपासून अरुणाचल प्रदेशावर दावा केला असून हा भारताचा भाग असल्याचं मानत नाही. राज्यातील 83,500 चौ.कि.मी परिसरावर चीनने दावा केलेला आहे.