शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

चीनने माझ्या भविष्याची चिंता करु नये - दलाई लामा

By admin | Updated: April 8, 2017 18:42 IST

तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला खडे बोल सुनावत आपल्या भविष्याचा निर्णय अनुयायी करतील चीन नाही असं स्पष्ट केलं आहे

ऑनलाइन लोकमत
तवांग, दि. 8 - तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांनी चीनला खडे बोल सुनावत आपल्या भविष्याचा निर्णय अनुयायी करतील चीन नाही असं स्पष्ट केलं आहे. दलाई लामा यांनी चीनचं नाव न घेता आपल्यानंतर आपलं पद कायम राहणार की नाही हे माझे अनुयायी ठरवतील दुसरं कोणी नाही असं म्हटलं आहे. दलाई लामा यांनी चीनवर निशाणा साधला असून दलाई लामांच्या मृत्यूनंतर त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. दलाई लामांनी चीनच्या दाव्याला फेटाळत खडे बोल सुनावले आहेत. 
 
दलाई लामा यांनी शनिवारी अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे अनुयायांना संबोधित केलं. तिबेटियन बौद्धांसाठी तवांग महत्वाची जागा मानली जाते. आपला उत्तराधिकारी कुठे जन्माला येईल याची माहिती आपल्याकडे असल्याच्या वृत्ताला त्यांनी फेटाळलं आहे. जेव्हा त्यांनी तुमचा उत्तराधिकारी एक महिला असू शकते का ? असं विचारलं असता हेदेखील शक्य आहे असं त्यांना सांगितलं आहे.
 
(दलाई लामांच्या भारत भेटीवर चीनची आगपाखड)
(दलाई लामा हे भ्रामक अभिनेते- चीन)
(भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन चिडण्याची शक्यता)
 
तिबेटियन बौद्धांच्या परंपरेनुसार अध्यात्मिक गुरुच्या निधनानंतर वरिष्ठ भिक्षुक त्या तरुण मुलाची ओळख करुन देतात ज्याच्यामध्ये दिवंगत गुरुचा अवतार असल्याची लक्षणं दिसतात. चीनमध्ये नैसर्गिक आपत्ती आली असताना दलाई लामा मात्र अरुणाचल प्रदेशच्या दौ-यावर आहेत. अरुणाचल प्रदेश हा विवादास्पद भाग असून तो आपल्या अख्त्यारित येतो असा चीनचा पहिल्यापासून दावा आहे. 
 
तिबेटीयन धर्मगुरु दलाई लामा यांचा अरुणाचल प्रदेश प्रवेश रोखू न शकल्याने चिडलेल्या चीनने भारताला ही तुमची मोठी चूक असल्याचं सांगितलं आहे. सीमारेषेवरील राज्यात दलाई लामांना प्रवेश देण चूक असल्याचं सांगत चीन भारताविरोधातील आपला राग व्यक्त करत आहे. "दलाई लामांना अरुणाचल प्रदेशात प्रवेश दिल्याने द्विपक्षीय संबंधांवर याचा फरक पडेल", अशी धमकीचं चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी दिली होती. अरुणाचल प्रदेशात दलाई लामांनी कोणतीही हालचाल करणं चीनच्या पचनी पडत नसून त्यांनी वारंवार यासंबंधी भारताकडे आपला निषेध व्यक्त केला असल्याचंही ते बोलले आहेत.
 
गेल्यावर्षीच धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवत परवनागी दिली होती. भारताने दलाई लामांच्या दौ-याला परवानगी दिल्याने चीन मात्र चिडण्याची शक्यता होती, त्याप्रमाणे चीनने आपला राग व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्याही अरुणाचल प्रदेश दौ-याला चीनने याअगोदर विरोध केला होता. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या या आक्षेपाला फेटाळलं होता. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक असल्याचं भारताने स्पष्ट सांगितलं होतं.
 
चीनने 2009 मध्येदेखील दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याला विरोध केला होता. चीन विरुद्धचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा याच दिवशी १७ मार्च १९५९ रोजी भारतात येण्यासाठी निघाले होते. हिमालयीन पर्वतरागांमधून १५ दिवस पायी प्रवास करुन चीनी सैनिकांना चुकवत दलाई लामा भारतात दाखल झाले होते.
 
अरुणाचल प्रदेश भारत आणि चीनमधील वादग्रस्त भाग असल्याने अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरुणाचल प्रदेश दौ-याचा आपण विरोध करतो असं चीनने म्हटलं होतं. तवांग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी वर्मा यांनी हा दौरा केला होता. 
चीनने अगोदरपासून अरुणाचल प्रदेशावर दावा केला असून हा भारताचा भाग असल्याचं मानत नाही. राज्यातील 83,500 चौ.कि.मी परिसरावर चीनने दावा केलेला आहे.