शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"त्या सैनिकाला ताबडतोब सोडा"; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी

By देवेश फडके | Updated: January 10, 2021 12:04 IST

पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देभारतीय लष्कराने ताब्यात घेतलेल्या सैनिकाला सोडण्याची चीनची मागणीअंधारामुळे रस्ता चुकल्याची सबब केली पुढेभारतीय लष्कराने नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना

लडाख : पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातून एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे. 

भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या एका चीनी सैनिकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती शनिवारी अधिकृतरित्या भारतीय लष्कराकडून देण्यात आली. पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील चुशूल सेक्टरमध्ये असलेल्या गुरंग भागात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली होती. या चिनी सैनिकाने कोणत्या परिस्थितीत सीमा पार केली याचा शोध भारतीय लष्कराकडून घेतला जात आहे.  

अंधार असल्यामुळे तो सैनिक रस्ता चुकला. कठीण भौगिलिक परिस्थितीमुळे तो सैनिक भारत-चीन सीमेवर बेपत्ता झाला होता. त्या सैनिकाचा शोध घेता यावा, म्हणून याबाबतची माहिती भारतीय लष्कराला देण्यात आली होती, अशी माहिती चीनच्या लष्कराकडून एका ऑनलाइन साइटवर टाकण्यात आली होती. दोन तासांनंतर भारतीय लष्कराकडून यासंदर्भात प्रतिसाद देण्यात आला. चीनचा बेपत्ता झालेला सैनिक सापडल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. सक्षम प्राधिकरणाकडून निर्देश येतील, त्यानुसार त्या सैनिकाला पुन्हा चीनकडे सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 

एका कराराची आठवण करून देत या वेबसाइटने लिहिले आहे की, भारतीय लष्कराने प्रासंगिक कराराचे तंतोतंत पालन केले पाहिजे आणि वेळ न दवडता त्या सैनिकाला पुन्हा चीनकडे पाठवले पाहिजे. जेणेकरून दोन्ही देशात सुरू असलेला तणाव कमी करण्यात सकारात्मक पावले उचलली जाऊ शकतील आणि दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित केली जाऊ शकेल.

दरम्यान, यापूर्वी १९ ऑक्टोबर २०२० रोजी लडाखमधील डेमचोक सेक्टरमध्ये एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, निर्धारित नियमावलीचे पालन करून त्याला पुन्हा चीनकडे सुपूर्द करण्यात आले होते. सन २०२० च्या पूर्वार्धापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला भारत आणि चीनचे सैन्य तैनात करण्यात आले आहे. सध्या दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, त्यावर समाधानकारक तोडगा अद्याप निघालेला नाही. कडाक्याच्या थंडीमुळे चिनी सैन्याच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वातावरण मात्र तापलेलेच आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखchinaचीनIndian Armyभारतीय जवान