शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"त्या सैनिकाला ताबडतोब सोडा"; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी

By देवेश फडके | Updated: January 10, 2021 12:04 IST

पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देभारतीय लष्कराने ताब्यात घेतलेल्या सैनिकाला सोडण्याची चीनची मागणीअंधारामुळे रस्ता चुकल्याची सबब केली पुढेभारतीय लष्कराने नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना

लडाख : पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातून एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे. 

भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या एका चीनी सैनिकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती शनिवारी अधिकृतरित्या भारतीय लष्कराकडून देण्यात आली. पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील चुशूल सेक्टरमध्ये असलेल्या गुरंग भागात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली होती. या चिनी सैनिकाने कोणत्या परिस्थितीत सीमा पार केली याचा शोध भारतीय लष्कराकडून घेतला जात आहे.  

अंधार असल्यामुळे तो सैनिक रस्ता चुकला. कठीण भौगिलिक परिस्थितीमुळे तो सैनिक भारत-चीन सीमेवर बेपत्ता झाला होता. त्या सैनिकाचा शोध घेता यावा, म्हणून याबाबतची माहिती भारतीय लष्कराला देण्यात आली होती, अशी माहिती चीनच्या लष्कराकडून एका ऑनलाइन साइटवर टाकण्यात आली होती. दोन तासांनंतर भारतीय लष्कराकडून यासंदर्भात प्रतिसाद देण्यात आला. चीनचा बेपत्ता झालेला सैनिक सापडल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. सक्षम प्राधिकरणाकडून निर्देश येतील, त्यानुसार त्या सैनिकाला पुन्हा चीनकडे सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 

एका कराराची आठवण करून देत या वेबसाइटने लिहिले आहे की, भारतीय लष्कराने प्रासंगिक कराराचे तंतोतंत पालन केले पाहिजे आणि वेळ न दवडता त्या सैनिकाला पुन्हा चीनकडे पाठवले पाहिजे. जेणेकरून दोन्ही देशात सुरू असलेला तणाव कमी करण्यात सकारात्मक पावले उचलली जाऊ शकतील आणि दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित केली जाऊ शकेल.

दरम्यान, यापूर्वी १९ ऑक्टोबर २०२० रोजी लडाखमधील डेमचोक सेक्टरमध्ये एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, निर्धारित नियमावलीचे पालन करून त्याला पुन्हा चीनकडे सुपूर्द करण्यात आले होते. सन २०२० च्या पूर्वार्धापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला भारत आणि चीनचे सैन्य तैनात करण्यात आले आहे. सध्या दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, त्यावर समाधानकारक तोडगा अद्याप निघालेला नाही. कडाक्याच्या थंडीमुळे चिनी सैन्याच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वातावरण मात्र तापलेलेच आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखchinaचीनIndian Armyभारतीय जवान