शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

"त्या सैनिकाला ताबडतोब सोडा"; चीनची भारतीय लष्कराकडे मागणी

By देवेश फडके | Updated: January 10, 2021 12:04 IST

पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देभारतीय लष्कराने ताब्यात घेतलेल्या सैनिकाला सोडण्याची चीनची मागणीअंधारामुळे रस्ता चुकल्याची सबब केली पुढेभारतीय लष्कराने नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना

लडाख : पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातून एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराच्या सैनिकाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या सैनिकाला तात्काळ सोडावे, अशी मागणी आता चीनकडून करण्यात आली आहे. 

भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या एका चीनी सैनिकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती शनिवारी अधिकृतरित्या भारतीय लष्कराकडून देण्यात आली. पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील चुशूल सेक्टरमध्ये असलेल्या गुरंग भागात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली होती. या चिनी सैनिकाने कोणत्या परिस्थितीत सीमा पार केली याचा शोध भारतीय लष्कराकडून घेतला जात आहे.  

अंधार असल्यामुळे तो सैनिक रस्ता चुकला. कठीण भौगिलिक परिस्थितीमुळे तो सैनिक भारत-चीन सीमेवर बेपत्ता झाला होता. त्या सैनिकाचा शोध घेता यावा, म्हणून याबाबतची माहिती भारतीय लष्कराला देण्यात आली होती, अशी माहिती चीनच्या लष्कराकडून एका ऑनलाइन साइटवर टाकण्यात आली होती. दोन तासांनंतर भारतीय लष्कराकडून यासंदर्भात प्रतिसाद देण्यात आला. चीनचा बेपत्ता झालेला सैनिक सापडल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. सक्षम प्राधिकरणाकडून निर्देश येतील, त्यानुसार त्या सैनिकाला पुन्हा चीनकडे सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 

एका कराराची आठवण करून देत या वेबसाइटने लिहिले आहे की, भारतीय लष्कराने प्रासंगिक कराराचे तंतोतंत पालन केले पाहिजे आणि वेळ न दवडता त्या सैनिकाला पुन्हा चीनकडे पाठवले पाहिजे. जेणेकरून दोन्ही देशात सुरू असलेला तणाव कमी करण्यात सकारात्मक पावले उचलली जाऊ शकतील आणि दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित केली जाऊ शकेल.

दरम्यान, यापूर्वी १९ ऑक्टोबर २०२० रोजी लडाखमधील डेमचोक सेक्टरमध्ये एका चिनी सैनिकाला भारतीय लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, निर्धारित नियमावलीचे पालन करून त्याला पुन्हा चीनकडे सुपूर्द करण्यात आले होते. सन २०२० च्या पूर्वार्धापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला भारत आणि चीनचे सैन्य तैनात करण्यात आले आहे. सध्या दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, त्यावर समाधानकारक तोडगा अद्याप निघालेला नाही. कडाक्याच्या थंडीमुळे चिनी सैन्याच्या हालचाली मंदावल्या असल्या तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वातावरण मात्र तापलेलेच आहे. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखchinaचीनIndian Armyभारतीय जवान