शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चीनचे सैन्य अगदी हाकेच्या अंतरावर; तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 06:27 IST

काही ठिकाणी तर चिनी सैन्य हाकेच्या अंतरावर म्हणजे ५०० फूट अंतरावर आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: अरुणाचलमधील सीमावादावरून चीनबरोबर १७व्या चर्चेच्या फेरीनंतर चीनला हा तणाव कमी करण्यात रस नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे दोन्ही बाजूंकडील सैन्य अगदी जवळ एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र आहे. चीनचे सैन्य अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

गृहमंत्रालय आणि सुरक्षा मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, यंदाच्या हिवाळ्यात चीनचे २ लाख सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) तैनात आहेत. भारतीय सेना आणि आईबीपीचे एवढेच जवान तैनात आहेत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रेही सीमेवर जमा केली आहेत. भारताने नुकतेच १७ उच्च रिझॉल्युशनचे कॅमेरे खरेदीचीही ऑर्डर दिली आहे. हे कॅमेरे आयटीबीपीला देण्यात येणार असून, चीनवर नजर ठेवण्यात येईल. 

अंतर केवळ ५०० फुटांचे

सूत्रांचे म्हणणे आहे की, तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडील सैन्यातील अंतर अत्यंत कमी राहिले आहे. काही ठिकाणी तर चिनी सैन्य हाकेच्या अंतरावर म्हणजे ५०० फूट अंतरावर आहे.  

१७ हजार फुटांवर अतिरिक्त सैनिक

आयटीबीपीने अरुणाचल प्रदेशातील वादग्रस्त भागांजवळ अतिरिक्त चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यांगत्सेच्या १७ हजार फूट उंच शिखरावर अतिरिक्त सैन्य तैनात केले जाईल, जिथे चिनी सैनिकांनी घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या नौटंकी पाहता, आयटीबीपीचे ९० हजार जवान आधीच विविध क्षेत्रांत तैनात आहेत. विवादित सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी १९९७ नंतर भारतासोबत केलेले जवळपास सर्व करार चीनने धाब्यावर बसविले आहेत. यामध्ये २०१३ मध्ये झालेल्या समितीचा समावेश आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशindia china faceoffभारत-चीन तणाव