शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:25 IST

तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. फिलीपींसने त्यांचे शब्द मागे घ्यायला हवेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा चीनने दिला आहे.

बीजिंग - भारताच्या दौऱ्यावर आलेले फिलीपींसचे राष्ट्रपती फेरदिनांद मार्कोस ज्यूनिअर यांनी तैवानसोबत युद्धावरून मोठी घोषणा केली आहे. जर चीन आणि तैवान यांच्यात युद्ध झाले तर फिलीपींस त्यापासून दूर राहू शकत नाही असं त्यांनी म्हटले. जर तैवानसोबत युद्ध झाले तर अमेरिकन सैन्याला तुमच्या मालमत्तेचा आणि सैन्य ठिकाणांचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी त्यांच्या देशाची महत्त्वाची भौगोलिक स्थितीचा उल्लेख केला. मार्कोस ज्यूनिअर यांच्या विधानानंतर चीनचा तीळपापड झाला आहे.

मार्कोस यांनी भारतीय माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चीन आणि तैवान युद्धाबाबत व्यावहारिक होण्याची गरज आहे. जर तैवानसाठी चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्ष झाला तर फिलीपींस यातून बाहेर राहील हा प्रश्नच येत नाही. त्यामागचे कारण म्हणजे आमची भौगोलिक स्थिती आहे. तैवानचा काओहसिंग परिसर फिलीपींसच्या लाओआगवरून विमानाने ४० मिनिटांच्या अंतरावर आहे. जर तुम्ही हा विचार करत असाल, पूर्ण युद्ध सुरू झाले तर आम्ही त्यात सहभागी होऊ शकतो. तर निश्चितच आम्हाला आमचा भाग आणि अखंडतेचे रक्षण करावे लागेल असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय फिलीपींसचे लोक मोठ्या प्रमाणात तैवानमध्ये काम करतात. जर चीनने हल्ला केला तर फिलीपींसवर हे मोठे मानवी संकट असेल. तैवानमध्ये शेकडो फिलीपींसचे लोक आहेत. आम्ही आमच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा वापर करू असंही फिलीपींसचे राष्ट्रपती मार्कोस यांनी म्हटलं आहे. फिलीपींस राष्ट्रपतींच्या या विधानावर चीनचं परराष्ट्र मंत्रालय संतापले आहे. आम्ही त्यांच्या विधानाचा कडाडून विरोध करतो असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. 

तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. फिलीपींसने त्यांचे शब्द मागे घ्यायला हवेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील. फिलीपींस सातत्याने चुकीचं आणि उकसवणारे विधान करत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. फिलीपींसला तैवानमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या लोकांचा हवाला देत दुसऱ्या देशाच्या सांप्रदायिकेत हस्तक्षेप करण्याची गरज नाही. फिलीपींसने आगीशी खेळणे बंद करावे असा इशारा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारत