शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:25 IST

तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. फिलीपींसने त्यांचे शब्द मागे घ्यायला हवेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा चीनने दिला आहे.

बीजिंग - भारताच्या दौऱ्यावर आलेले फिलीपींसचे राष्ट्रपती फेरदिनांद मार्कोस ज्यूनिअर यांनी तैवानसोबत युद्धावरून मोठी घोषणा केली आहे. जर चीन आणि तैवान यांच्यात युद्ध झाले तर फिलीपींस त्यापासून दूर राहू शकत नाही असं त्यांनी म्हटले. जर तैवानसोबत युद्ध झाले तर अमेरिकन सैन्याला तुमच्या मालमत्तेचा आणि सैन्य ठिकाणांचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी त्यांच्या देशाची महत्त्वाची भौगोलिक स्थितीचा उल्लेख केला. मार्कोस ज्यूनिअर यांच्या विधानानंतर चीनचा तीळपापड झाला आहे.

मार्कोस यांनी भारतीय माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चीन आणि तैवान युद्धाबाबत व्यावहारिक होण्याची गरज आहे. जर तैवानसाठी चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्ष झाला तर फिलीपींस यातून बाहेर राहील हा प्रश्नच येत नाही. त्यामागचे कारण म्हणजे आमची भौगोलिक स्थिती आहे. तैवानचा काओहसिंग परिसर फिलीपींसच्या लाओआगवरून विमानाने ४० मिनिटांच्या अंतरावर आहे. जर तुम्ही हा विचार करत असाल, पूर्ण युद्ध सुरू झाले तर आम्ही त्यात सहभागी होऊ शकतो. तर निश्चितच आम्हाला आमचा भाग आणि अखंडतेचे रक्षण करावे लागेल असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय फिलीपींसचे लोक मोठ्या प्रमाणात तैवानमध्ये काम करतात. जर चीनने हल्ला केला तर फिलीपींसवर हे मोठे मानवी संकट असेल. तैवानमध्ये शेकडो फिलीपींसचे लोक आहेत. आम्ही आमच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा वापर करू असंही फिलीपींसचे राष्ट्रपती मार्कोस यांनी म्हटलं आहे. फिलीपींस राष्ट्रपतींच्या या विधानावर चीनचं परराष्ट्र मंत्रालय संतापले आहे. आम्ही त्यांच्या विधानाचा कडाडून विरोध करतो असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. 

तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. फिलीपींसने त्यांचे शब्द मागे घ्यायला हवेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील. फिलीपींस सातत्याने चुकीचं आणि उकसवणारे विधान करत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. फिलीपींसला तैवानमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या लोकांचा हवाला देत दुसऱ्या देशाच्या सांप्रदायिकेत हस्तक्षेप करण्याची गरज नाही. फिलीपींसने आगीशी खेळणे बंद करावे असा इशारा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारत