शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:25 IST

तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. फिलीपींसने त्यांचे शब्द मागे घ्यायला हवेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा चीनने दिला आहे.

बीजिंग - भारताच्या दौऱ्यावर आलेले फिलीपींसचे राष्ट्रपती फेरदिनांद मार्कोस ज्यूनिअर यांनी तैवानसोबत युद्धावरून मोठी घोषणा केली आहे. जर चीन आणि तैवान यांच्यात युद्ध झाले तर फिलीपींस त्यापासून दूर राहू शकत नाही असं त्यांनी म्हटले. जर तैवानसोबत युद्ध झाले तर अमेरिकन सैन्याला तुमच्या मालमत्तेचा आणि सैन्य ठिकाणांचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी त्यांच्या देशाची महत्त्वाची भौगोलिक स्थितीचा उल्लेख केला. मार्कोस ज्यूनिअर यांच्या विधानानंतर चीनचा तीळपापड झाला आहे.

मार्कोस यांनी भारतीय माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चीन आणि तैवान युद्धाबाबत व्यावहारिक होण्याची गरज आहे. जर तैवानसाठी चीन आणि अमेरिका यांच्यात संघर्ष झाला तर फिलीपींस यातून बाहेर राहील हा प्रश्नच येत नाही. त्यामागचे कारण म्हणजे आमची भौगोलिक स्थिती आहे. तैवानचा काओहसिंग परिसर फिलीपींसच्या लाओआगवरून विमानाने ४० मिनिटांच्या अंतरावर आहे. जर तुम्ही हा विचार करत असाल, पूर्ण युद्ध सुरू झाले तर आम्ही त्यात सहभागी होऊ शकतो. तर निश्चितच आम्हाला आमचा भाग आणि अखंडतेचे रक्षण करावे लागेल असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय फिलीपींसचे लोक मोठ्या प्रमाणात तैवानमध्ये काम करतात. जर चीनने हल्ला केला तर फिलीपींसवर हे मोठे मानवी संकट असेल. तैवानमध्ये शेकडो फिलीपींसचे लोक आहेत. आम्ही आमच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा वापर करू असंही फिलीपींसचे राष्ट्रपती मार्कोस यांनी म्हटलं आहे. फिलीपींस राष्ट्रपतींच्या या विधानावर चीनचं परराष्ट्र मंत्रालय संतापले आहे. आम्ही त्यांच्या विधानाचा कडाडून विरोध करतो असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. 

तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. फिलीपींसने त्यांचे शब्द मागे घ्यायला हवेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील. फिलीपींस सातत्याने चुकीचं आणि उकसवणारे विधान करत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. फिलीपींसला तैवानमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या लोकांचा हवाला देत दुसऱ्या देशाच्या सांप्रदायिकेत हस्तक्षेप करण्याची गरज नाही. फिलीपींसने आगीशी खेळणे बंद करावे असा इशारा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारत